शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:04 IST

सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.

सांगली : आईच्या सक्त भूमिकेमुळे मला वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहिले पाहिजे. जगण्याची आशा निर्माण करणारे लेखन असावे. मैत्री, वाचन, मनन, संवादातूनच माणून संपन्न होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. सांगलीत त्यांनी वाचकांशी दिलखुलास संवाद साधला.‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात अनुवादक लीना सोहनी यांनी त्यांची मुलाखत घेतली. योजना यादव यांनी निवेदन केले. साहिल मेहता यांनी स्वागत केले. सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.त्या म्हणाल्या की, आईच्या सक्त भूमिकेमुळे वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. समाजात वावरताना जे अनुभवले, पाहिले, तेच लिहिले. तुम्हीही कधीतरी अनुभवलेले असते, फक्त त्या-त्यावेळी लिहीत चला, तुम्हीही लिहू शकता. दहा पुस्तके वाचाल, तेव्हा एक परिच्छेद तुम्ही लिहू शकाल. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहावे. लेखनात जगण्याची आशा निर्माण करण्याची शक्ती असते. आशा हेच आयुष्य आहे. कष्ट आणि कष्टातून बाहेर येण्याचे सूत्र मी मांडते. त्यामुळे वाचकांचे प्रेम मिळाले आहे.टेल्को कंपनीत मुलगी आणि मशीन विरुद्धार्थी शब्द होते, तेथेच आज कारनिर्मितीसाठी २०० मुलींचे स्वतंत्र युनिट असल्याचे सांगतानाच, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण, नोकरीतील वाटेला आलेली अवहेलना, खडतर परिस्थितीतून काढलेला मार्ग या साऱ्याचे अनुभवही त्यांनी वाचकांसमोर उलघडला. मुलांना ॲडजेस्टमेंट शिकवा, त्यांच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका, असा सल्ला पालकांना देत, आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रापंचिक गुंत्यातून मुक्त व्हाल, तर आनंदी जीवन जगाल, असे कानमंत्रही त्यांनी ज्येष्ठांना दिला.

व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताचसध्या पिढी शिक्षण खेळ, वाचन यापासून दूर चालली आहे. ती व्हॉट्सॲपमध्ये अडकत आहे, हे चुकीचे आहे. व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताच करा, त्यात अडकून पडू नका, असा सल्लाही सुधा मूर्ती यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSudha Murtyसुधा मूर्ती