शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

तीन कारखाने ५ कोटी देणार, ताकारी योजना शुक्रवारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 11:22 IST

ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अ‍ॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर  कारखाने प्रत्येकी १ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देणार आहेत. 

कडेगाव- ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अ‍ॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर  कारखाने प्रत्येकी १ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देणार आहेत. 

ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी  योजनेची ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी महावितरणकडे भरून योजना शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी सुरू केली जाणार आहे. तसेच टेंभू योजनेचीही   वीजबिल थकबाकी भरून आवर्तन सुरू करण्याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असा निर्णय झाला.

कडेगाव येथे पत्रकारांच्या पुढाकाराने सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, केन अ‍ॅग्रो कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर तसेच ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ताकारी आणि टेंभू योजनांच्या वीजबिल थकबाकीबाबत तसेच आवर्तन सुरू करण्याबाबत यशस्वी चर्चा झाली.

ताकारी योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. यापैकी ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी भरल्यास वीजपुरवठा पूर्ववत जोडला जाणार आहे. सध्या योजनेकडे पाणीपट्टीचे कारखान्यांकडून जमा झालेले जवळपास १ कोटी २३ लाख रुपये जमा आहेत. आता सोनहिरा, उदगिरी, क्रांती, केन अ‍ॅग्रो आणि गोपूज कारखान्यांकडून प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकंदरीत ५ कोटी रुपये जमा होतील. ही रक्कम मंगळवार व बुधवार या दोन दिवसात देणार आहे, असे आमदार मोहनराव कदम, अरुण लाड व पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.

गुरुवारी ५ कोटी १८ लाख वीज बिल थकबाकी महावितरणकडे भरली जाणार आहे. थकबाकी भरल्यावर वीजपुरवठा पूर्ववत होईल व ताकारी योजना २९ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय झाला.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते आदींसह पत्रकार उपस्थित होते.

‘टेंभू’साठीही एकत्र येण्याची गरज : बाबरकडेगाव पलूस तालुक्यातील नेते आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड हे राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले. या तिन्ही नेत्यांसह टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील अन्य नेते व कारखानदार सर्व एकत्र आल्यास आवर्तनाचा मार्ग मोकळा होईल. शासनाकडून येणारी टंचाई  निधीची रक्कम आणि पाणीपट्टी वसुलीशिवाय गरज पडल्यास अ‍ॅडव्हान्स घेऊन टेंभू योजनेचे आवर्तनही तातडीने सुरू करता येईल, असे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.

बाहेरील कारखान्यांनी पाणीपट्टी वसूल करावीताकारी आणि टेंभू योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील काही कारखाने योजनांची पाणीपट्टी वसूल करून देत नाहीत. परंतु ऊस मात्र नेतात. अशा कारखान्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस देऊन त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करून घ्यावी. शेतकºयांनीही अशा कारखान्यांना ऊस देऊ नये. अशा कारखान्यांच्या ऊसतोडीस  शेतकºयांनी एकसंधपणे विरोध केला पाहिजे, अशी या बैठकीत चर्चा झाली.