शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

अंजनी येथे तीन एकर द्राक्षबाग कोसळली-अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:51 IST

तासगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने, प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले. त्यामुळे तालुक्याला सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देवायफळे, आरवडे, सावर्डे, लोढे, चिंचणी, अंजनीसह अनेक गावांतील काही घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले

तासगाव : तासगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने, प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले. त्यामुळे तालुक्याला सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. स्टेजिंगची तार तुटून अंजनी येथील तीन एकर द्राक्षबाग कोसळून जमीनदोस्त झाली. चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळाखोलीचे पत्रे उडून गेले. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये वादळी वाºयामुळे घरांची पडझड झाली आहे. 

अंजनी-गव्हाण रस्त्यालगत असलेल्या दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या अनुष्का जातीच्या एक एकर द्राक्षबागेच्या स्टेजिंगचा तोल बिघडला व द्राक्षांचे वजन न पेलल्याने द्राक्षबाग कोसळली. यात ९ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अंजनी येथील विठोबा पाटील वस्तीवरील बापू मारुती माने आणि संजय रामचंद्र पाटील या दोघांची माणिक चमण जातीची प्रत्येकी     एक एकर द्राक्षबाग कोसळली. माने यांना १६ ते १८ टन, तर पाटील       यांना २० ते २२ टन द्राक्षांचे उत्पन्न अपेक्षित होते. बापू माने यांचे अंदाजे  ९ लाख २० हजार रुपयांचे, तर       संजय पाटील  यांचे अंदाजे ११ लाख ५० हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.

सावळजच्या शिवाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळाखोलीचे पत्रे उडून गेले. वायफळे, आरवडे, सावर्डे, लोढे, चिंचणी, अंजनीसह अनेक गावांतील काही घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले. यामध्ये घरगुती साहित्यासह शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी