शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:56 IST

शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले.

ठळक मुद्देनेर्लेतील युवकांचा उपक्रम : जीवनोपयोगी साहित्य, औषधांचा सांगली, कोल्हापुरात पुरवठा

सांगली : सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास संकटग्रस्तांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट नेर्ले (ता. वाळवा) येथील तरुणांनी दाखवून दिली. पूरग्रस्त गरीब कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्यासाठी राज्यभरातील हजारावर लोकांनी त्यांच्याकडे नोंदणी केली आहे. साहित्यरूपी मदत, औषधांचा पुरवठा करण्यातही या ग्रुपने मध्यस्थाची भूमिका पार पाडली.

नेर्ले येथील नीलेश साठे, डॉ. विजय चांदणे, प्रा. विजय लोहार, सुरेश पाटील, तानाजी साठे यांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मोठा सेतू सोशल मीडियाद्वारे उभारला. नीलेश साठे यांना ही संकल्पना सुचली. त्यांनी सुरुवातीला पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपासाठी राज्यभरातील काही मित्रांचा व्हॉट्स अ‍ॅपवर ‘पूरग्रस्त मदत ग्रुप’ सुरू केला. प्रत्येकाने शंभर रुपये जमा करावेत आणि कोणाचे आणखी मित्र मदतीसाठी इच्छुक असतील, त्यांना या ग्रुपवर समाविष्ट करण्याचे आवाहन केले. शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले. त्याची छायाचित्रे ग्रुपवर प्रसिद्ध केली. ग्रुपने जिंकलेल्या विश्वासामुळे मदत करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

शिरगाव येथील महिलेचे घर महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ ग्रुपवरून व्हायरल केला. महिलेचे नाव, तिचा बँक खाते क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून दीड लाखाची मदत तिच्या खात्यावर जमा झाली. अशाचपद्धतीने त्यांनी गरीब पूरग्रस्तांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना दत्तक घेण्यास कुणी इच्छुक आहे का, अशी विचारणा ग्रुपवरून केली. या विद्यार्थ्यांच्या किंवा तिच्या आईच्या बँक खात्यावर शैक्षणिक वर्षाचे दीड हजार जमा करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत राज्यभरातून एक हजारावर लोकांनी दत्तक योजनेसाठी नोंदणी केली.थेट लाभाची यंत्रणासांगलीतील आरोग्य विभागाला औषधांचाही मोठ्या प्रमाणावर या ग्रुपने पुरवठा केला. अनेक शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटना या ग्रुपशी संपर्क करून आवश्यक गोष्टींची मागणी करीत आहेत. पूरग्रस्तांना थेट लाभ देण्याची यंत्रणा या ग्रुपने उभारली आहे. आजअखेर २0 हजार पूरग्रस्तांच्या घरांपर्यंत हा ग्रुप पोहोचला आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली