शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:56 IST

शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले.

ठळक मुद्देनेर्लेतील युवकांचा उपक्रम : जीवनोपयोगी साहित्य, औषधांचा सांगली, कोल्हापुरात पुरवठा

सांगली : सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास संकटग्रस्तांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट नेर्ले (ता. वाळवा) येथील तरुणांनी दाखवून दिली. पूरग्रस्त गरीब कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्यासाठी राज्यभरातील हजारावर लोकांनी त्यांच्याकडे नोंदणी केली आहे. साहित्यरूपी मदत, औषधांचा पुरवठा करण्यातही या ग्रुपने मध्यस्थाची भूमिका पार पाडली.

नेर्ले येथील नीलेश साठे, डॉ. विजय चांदणे, प्रा. विजय लोहार, सुरेश पाटील, तानाजी साठे यांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मोठा सेतू सोशल मीडियाद्वारे उभारला. नीलेश साठे यांना ही संकल्पना सुचली. त्यांनी सुरुवातीला पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपासाठी राज्यभरातील काही मित्रांचा व्हॉट्स अ‍ॅपवर ‘पूरग्रस्त मदत ग्रुप’ सुरू केला. प्रत्येकाने शंभर रुपये जमा करावेत आणि कोणाचे आणखी मित्र मदतीसाठी इच्छुक असतील, त्यांना या ग्रुपवर समाविष्ट करण्याचे आवाहन केले. शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले. त्याची छायाचित्रे ग्रुपवर प्रसिद्ध केली. ग्रुपने जिंकलेल्या विश्वासामुळे मदत करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

शिरगाव येथील महिलेचे घर महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ ग्रुपवरून व्हायरल केला. महिलेचे नाव, तिचा बँक खाते क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून दीड लाखाची मदत तिच्या खात्यावर जमा झाली. अशाचपद्धतीने त्यांनी गरीब पूरग्रस्तांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना दत्तक घेण्यास कुणी इच्छुक आहे का, अशी विचारणा ग्रुपवरून केली. या विद्यार्थ्यांच्या किंवा तिच्या आईच्या बँक खात्यावर शैक्षणिक वर्षाचे दीड हजार जमा करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत राज्यभरातून एक हजारावर लोकांनी दत्तक योजनेसाठी नोंदणी केली.थेट लाभाची यंत्रणासांगलीतील आरोग्य विभागाला औषधांचाही मोठ्या प्रमाणावर या ग्रुपने पुरवठा केला. अनेक शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटना या ग्रुपशी संपर्क करून आवश्यक गोष्टींची मागणी करीत आहेत. पूरग्रस्तांना थेट लाभ देण्याची यंत्रणा या ग्रुपने उभारली आहे. आजअखेर २0 हजार पूरग्रस्तांच्या घरांपर्यंत हा ग्रुप पोहोचला आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली