शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:12 IST

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ...

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ३० हजार नागरिक पुराच्या विळख्यात असून काहींना होड्या पाठवून बाहेर काढण्यात आले.सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी मंदगतीने ओसरत आहे. पन्नासवर प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १०० गावे महापुराने बाधित आहेत. यातील एकाही गावाची अद्याप सुटका झालेली नाही.अडकलेल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी शुक्रवारी जादा कुमक मागवून प्रयत्न करण्यात आले. अनेक पूरग्रस्तांना सोडविण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस यश आले असले, तरी पुरात अडकलेल्या लोकांची संख्या अजूनही ३० हजाराच्या घरात आहे. हरिपूर, सांगलीवाडी येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकून आहेत. त्यांना अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरने देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची अजूनही कसरत सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दिवसभरात केवळ ३ इंच घट : सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळीत दिवसभरात केवळ तीन इंचांची घट झाली. सकाळी ७ वाजता ५७.५ फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळी केवळ ५७.३ फूट झाली. पूर मंदगतीने ओसरत असल्याने जनजीवन ठप्पच आहे.टँकरने पाणीपुरवठा : पूरग्रस्तांचे जेथे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याठिकाणी महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने सर्व प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ पाणीपुरवठा बंदचाच गजर सुरू केला आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर