शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:12 IST

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ...

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ३० हजार नागरिक पुराच्या विळख्यात असून काहींना होड्या पाठवून बाहेर काढण्यात आले.सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी मंदगतीने ओसरत आहे. पन्नासवर प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १०० गावे महापुराने बाधित आहेत. यातील एकाही गावाची अद्याप सुटका झालेली नाही.अडकलेल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी शुक्रवारी जादा कुमक मागवून प्रयत्न करण्यात आले. अनेक पूरग्रस्तांना सोडविण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस यश आले असले, तरी पुरात अडकलेल्या लोकांची संख्या अजूनही ३० हजाराच्या घरात आहे. हरिपूर, सांगलीवाडी येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकून आहेत. त्यांना अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरने देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची अजूनही कसरत सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दिवसभरात केवळ ३ इंच घट : सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळीत दिवसभरात केवळ तीन इंचांची घट झाली. सकाळी ७ वाजता ५७.५ फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळी केवळ ५७.३ फूट झाली. पूर मंदगतीने ओसरत असल्याने जनजीवन ठप्पच आहे.टँकरने पाणीपुरवठा : पूरग्रस्तांचे जेथे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याठिकाणी महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने सर्व प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ पाणीपुरवठा बंदचाच गजर सुरू केला आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर