शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी-म्हैसाळ’च्या भूसंपादनास सहाशे कोटी

By admin | Updated: October 26, 2016 00:11 IST

केंद्राकडून निधी : सोळाशे कोटी मंजूर

सांगली : जिल्ह्यातील ताकारी आणि म्हैसाळ योजनांचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला असून, १ हजार ६०० कोटींच्या खर्चासही मंजुरी मिळाली आहे. परंतु, या योजना कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. यासाठी सहाशे कोटींचा निधी सुधारित अंदाजपत्रकात मंजूर केला आहे. अपूर्ण सर्व कामे पूर्ण करून तीन वर्षात शंभर टक्के क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे. पंतप्रधान सिंचन योजना, नाबार्ड आणि राज्य शासन यांच्यातील करारानुसार ताकारी आणि म्हैसाळ योजनेसाठी कर्जस्वरुपात ही रक्कम प्राप्त झाली आहे. कर्जाची परतफेड शासन करणार आहे. कर्ज मिळाले म्हणून व्याजाचा १ रुपयाचाही भुर्दंड शेतकऱ्यांवर बसणार नाही. ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या माध्यमातून कडेगाव, पलूस, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील १ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या दोन्ही योजनांच्या मुख्य कालव्याची ८० टक्के कामे पूर्ण आहेत. या कालव्यांचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेले नाही. पोटकालव्यांची कामे मात्र मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत.योजना कार्यान्वित करण्यासाठी कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागेल. त्याचीही तरतूद झाली आहे. वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी चारशे कोटींची तरतूद नव्या प्रस्तावात आहे. याचबरोबर मुख्य कालव्याची दुरुस्ती, अस्तरीकरण करण्यासाठी पाचशे कोटी आणि पंपग्रह बसविण्यासाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे. म्हैसाळ योजनेवरून पुन्हा आगळगाव आणि जाखापूर स्वतंत्र योजना करून कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील गावांना पाणी देण्याचेही नियोजन केले आहे. ताकारी सिंचन योजनेच्या शेवटच्या चाळीस किलोमीटरचे बहुतांशी काम राहिले आहे. यामध्ये काही नवीन गावांचा समावेश झाल्यामुळे येथील कामेही प्राधान्याने पूर्ण होणार असून, निधीची तरतूद झाली आहे. (प्रतिनिधी)जतला दिलासा....म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील ४२ गावांंचाही विचार झालेला आहे. उर्वरित कामे पूर्ण करताना संखपर्यंत जे पाणी जाणार आहे, ते ९० किलोमीटरच्या एका कालव्याद्वारे दिले जाणार असून, त्यामध्ये जवळपास २५ ते २७ गावे समाविष्ट होतील. उर्वरित जी १५ ते १६ गावे राहतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणी योजना राबविण्याबाबतही यशस्वी चर्चा झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जत तालुका दुष्काळमुक्त होईल.