शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

अण्णा भाऊंच्या विचारांचा जन्मशताब्दीत जागर व्हावा -- सतीश चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:43 IST

जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र लोकांसमोर येऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. - सतीश चौगुले --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

ठळक मुद्दे--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद शासनाकडून शंभर कोटींचा विशेष निधी

युनुस शेख।संयुक्त महाराष्ट्राची हाक राज्यभर पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आॅगस्ट रोजी साजरी झाली. लोकशाहीर अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे, तसेच अण्णा भाऊंच्या कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, म्हणून जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रमांसाठी तब्बल शंभर कोटीची घोषणा करण्यात आली आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा, अशी अपेक्षा इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र व साहित्याचे अभ्यासक सतीश चौगुले यांनी व्यक्त केली.

प्रश्न : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. या स्मारकात काय अपेक्षित असावे?

उत्तर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही एक व्यक्ती नसून, तो वंचित-उपेक्षित, कष्टकऱ्यांचा हुंकार आणि विचार आहे. त्यादृष्टीने अण्णा भाऊ ज्या मुद्द्यावर लढले त्यावर प्रकाशझोत पडला पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत जे अतुलनीय कार्य केले, ते पुन्हा समाजासमोर आले पाहिजे. उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना प्रस्थापित वर्गाबरोबर आणण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, गं्रथालय, अभ्यासिका अशी प्रेरणा देणारी व्यवस्था स्मारकात असावी.

प्रश्न : आजच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या साहित्याची कशी गरज आहे?उत्तर : देश आणि राज्यात सध्या असलेल्या वातावरणावर मात करण्यासाठी अण्णा भाऊंचे साहित्य हेच उत्तर आहे. अण्णा भाऊ जगले तो काळ आणि आजचा काळ सारखाच आहे. पूर्वी ते ब्रिटिशांविरोधात लढले, भांडवलदारांची गुलामगिरी होती, आता जाती-धर्माच्या नावाखाली धर्मांध शक्तींची गुलामगिरी करावी लागत आहे. या सर्व प्रश्नांशी लढण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचा हुंकार उमटणे महत्त्वाचे ठरते.

  • साहित्याचे पुनर्मुद्रण करा

अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एक तर अण्णा भाऊंचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये असून, ते दुर्मिळ झाले आहे. मराठीतील त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करून ते नव्या पिढीसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच विविध देशांच्या राजदूतांमार्फत त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित केल्यास भारतासाठी ती अभिमानाची बाब ठरेल. अण्णा भाऊंवर डॉक्युमेंटरीसुद्धा केली पाहिजे. 

  • वाटेगावात स्मारक हवे

वाटेगावमधील पत्र्याचे शेड हे स्मारक होऊच शकत नाही. ज्या अण्णा भाऊंनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळीत भाग घेतला; त्यांच्या साहित्यामधून माणसाला उभा राहण्याची ताकद मिळाली. त्यामुळे शासनाने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, त्याला कृतीची जोड देऊन अण्णा भाऊंचा उचित सन्मान होईल, असे प्रेरणादायी स्मारक उभे करायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र