शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंच्या विचारांचा जन्मशताब्दीत जागर व्हावा -- सतीश चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:43 IST

जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र लोकांसमोर येऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. - सतीश चौगुले --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

ठळक मुद्दे--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद शासनाकडून शंभर कोटींचा विशेष निधी

युनुस शेख।संयुक्त महाराष्ट्राची हाक राज्यभर पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आॅगस्ट रोजी साजरी झाली. लोकशाहीर अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे, तसेच अण्णा भाऊंच्या कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, म्हणून जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रमांसाठी तब्बल शंभर कोटीची घोषणा करण्यात आली आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा, अशी अपेक्षा इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र व साहित्याचे अभ्यासक सतीश चौगुले यांनी व्यक्त केली.

प्रश्न : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. या स्मारकात काय अपेक्षित असावे?

उत्तर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही एक व्यक्ती नसून, तो वंचित-उपेक्षित, कष्टकऱ्यांचा हुंकार आणि विचार आहे. त्यादृष्टीने अण्णा भाऊ ज्या मुद्द्यावर लढले त्यावर प्रकाशझोत पडला पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत जे अतुलनीय कार्य केले, ते पुन्हा समाजासमोर आले पाहिजे. उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना प्रस्थापित वर्गाबरोबर आणण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, गं्रथालय, अभ्यासिका अशी प्रेरणा देणारी व्यवस्था स्मारकात असावी.

प्रश्न : आजच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या साहित्याची कशी गरज आहे?उत्तर : देश आणि राज्यात सध्या असलेल्या वातावरणावर मात करण्यासाठी अण्णा भाऊंचे साहित्य हेच उत्तर आहे. अण्णा भाऊ जगले तो काळ आणि आजचा काळ सारखाच आहे. पूर्वी ते ब्रिटिशांविरोधात लढले, भांडवलदारांची गुलामगिरी होती, आता जाती-धर्माच्या नावाखाली धर्मांध शक्तींची गुलामगिरी करावी लागत आहे. या सर्व प्रश्नांशी लढण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचा हुंकार उमटणे महत्त्वाचे ठरते.

  • साहित्याचे पुनर्मुद्रण करा

अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एक तर अण्णा भाऊंचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये असून, ते दुर्मिळ झाले आहे. मराठीतील त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करून ते नव्या पिढीसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच विविध देशांच्या राजदूतांमार्फत त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित केल्यास भारतासाठी ती अभिमानाची बाब ठरेल. अण्णा भाऊंवर डॉक्युमेंटरीसुद्धा केली पाहिजे. 

  • वाटेगावात स्मारक हवे

वाटेगावमधील पत्र्याचे शेड हे स्मारक होऊच शकत नाही. ज्या अण्णा भाऊंनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळीत भाग घेतला; त्यांच्या साहित्यामधून माणसाला उभा राहण्याची ताकद मिळाली. त्यामुळे शासनाने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, त्याला कृतीची जोड देऊन अण्णा भाऊंचा उचित सन्मान होईल, असे प्रेरणादायी स्मारक उभे करायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र