शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंच्या विचारांचा जन्मशताब्दीत जागर व्हावा -- सतीश चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:43 IST

जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र लोकांसमोर येऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. - सतीश चौगुले --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

ठळक मुद्दे--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद शासनाकडून शंभर कोटींचा विशेष निधी

युनुस शेख।संयुक्त महाराष्ट्राची हाक राज्यभर पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आॅगस्ट रोजी साजरी झाली. लोकशाहीर अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे, तसेच अण्णा भाऊंच्या कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, म्हणून जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रमांसाठी तब्बल शंभर कोटीची घोषणा करण्यात आली आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा, अशी अपेक्षा इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र व साहित्याचे अभ्यासक सतीश चौगुले यांनी व्यक्त केली.

प्रश्न : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. या स्मारकात काय अपेक्षित असावे?

उत्तर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही एक व्यक्ती नसून, तो वंचित-उपेक्षित, कष्टकऱ्यांचा हुंकार आणि विचार आहे. त्यादृष्टीने अण्णा भाऊ ज्या मुद्द्यावर लढले त्यावर प्रकाशझोत पडला पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत जे अतुलनीय कार्य केले, ते पुन्हा समाजासमोर आले पाहिजे. उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना प्रस्थापित वर्गाबरोबर आणण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, गं्रथालय, अभ्यासिका अशी प्रेरणा देणारी व्यवस्था स्मारकात असावी.

प्रश्न : आजच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या साहित्याची कशी गरज आहे?उत्तर : देश आणि राज्यात सध्या असलेल्या वातावरणावर मात करण्यासाठी अण्णा भाऊंचे साहित्य हेच उत्तर आहे. अण्णा भाऊ जगले तो काळ आणि आजचा काळ सारखाच आहे. पूर्वी ते ब्रिटिशांविरोधात लढले, भांडवलदारांची गुलामगिरी होती, आता जाती-धर्माच्या नावाखाली धर्मांध शक्तींची गुलामगिरी करावी लागत आहे. या सर्व प्रश्नांशी लढण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचा हुंकार उमटणे महत्त्वाचे ठरते.

  • साहित्याचे पुनर्मुद्रण करा

अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एक तर अण्णा भाऊंचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये असून, ते दुर्मिळ झाले आहे. मराठीतील त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करून ते नव्या पिढीसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच विविध देशांच्या राजदूतांमार्फत त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित केल्यास भारतासाठी ती अभिमानाची बाब ठरेल. अण्णा भाऊंवर डॉक्युमेंटरीसुद्धा केली पाहिजे. 

  • वाटेगावात स्मारक हवे

वाटेगावमधील पत्र्याचे शेड हे स्मारक होऊच शकत नाही. ज्या अण्णा भाऊंनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळीत भाग घेतला; त्यांच्या साहित्यामधून माणसाला उभा राहण्याची ताकद मिळाली. त्यामुळे शासनाने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, त्याला कृतीची जोड देऊन अण्णा भाऊंचा उचित सन्मान होईल, असे प्रेरणादायी स्मारक उभे करायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र