शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘म्हैसाळ’ प्रश्नावर आंदोलन छेडणार

By admin | Updated: October 4, 2015 23:52 IST

राजू शेट्टी : चुकीचा निर्णय हाणून पाडू

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी टापूमध्ये टंचाई परिस्थिती गंभीर बनली असताना, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला थोडाफार दिलासा मिळत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.शेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करीत आहे. राज्यभर असलेले शेतकरी आत्महत्येचे लोण या जिल्ह्यातही पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी शेतीसाठी लाभदायी ठरत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रिया चालू केली आहे. हा निर्णय शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. अशा परिस्थितीत संघटना पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी संघटनेच्यावतीने स्वतंत्रपणे आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांकडून थकबाकीस मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादाबाबत शेट्टी म्हणाले, या भागातील शेतकरी पाणी फुकट न मागता पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून वसूल होणारी रक्कम शासनापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार असल्याने, पाटबंधारे विभागाने वसुलीसाठी सक्षम यंत्रणा राबवावी. वसुलीची यंत्रणा योग्य ठेवल्यास थकबाकी वसुलीस अडचण येणार नाही. यावेळी सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)संचालकांच्या सात-बारावर बोजा चढवा!म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी, प्रशासनाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढविण्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाज संचालकांच्या सात-बारावर थकबाकी चढवावी, अशी मागणी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून तीन टप्प्याच्या एफआरपीसाठी जिल्हा बॅँकेने अधिकार लिहून घेणे हे बेकायदेशीर असून, शेतकऱ्यांची कोणतीही कपात सुरू केल्यास जिल्हा बॅँकेविरोधात ‘आरबीआय’कडे तक्रार करणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. गरज पडल्यास या प्रश्नावर लोकसभेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.