शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’ प्रश्नावर आंदोलन छेडणार

By admin | Updated: October 4, 2015 23:52 IST

राजू शेट्टी : चुकीचा निर्णय हाणून पाडू

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी टापूमध्ये टंचाई परिस्थिती गंभीर बनली असताना, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला थोडाफार दिलासा मिळत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.शेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करीत आहे. राज्यभर असलेले शेतकरी आत्महत्येचे लोण या जिल्ह्यातही पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी शेतीसाठी लाभदायी ठरत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रिया चालू केली आहे. हा निर्णय शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. अशा परिस्थितीत संघटना पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी संघटनेच्यावतीने स्वतंत्रपणे आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांकडून थकबाकीस मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादाबाबत शेट्टी म्हणाले, या भागातील शेतकरी पाणी फुकट न मागता पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून वसूल होणारी रक्कम शासनापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार असल्याने, पाटबंधारे विभागाने वसुलीसाठी सक्षम यंत्रणा राबवावी. वसुलीची यंत्रणा योग्य ठेवल्यास थकबाकी वसुलीस अडचण येणार नाही. यावेळी सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)संचालकांच्या सात-बारावर बोजा चढवा!म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी, प्रशासनाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढविण्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाज संचालकांच्या सात-बारावर थकबाकी चढवावी, अशी मागणी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून तीन टप्प्याच्या एफआरपीसाठी जिल्हा बॅँकेने अधिकार लिहून घेणे हे बेकायदेशीर असून, शेतकऱ्यांची कोणतीही कपात सुरू केल्यास जिल्हा बॅँकेविरोधात ‘आरबीआय’कडे तक्रार करणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. गरज पडल्यास या प्रश्नावर लोकसभेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.