शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

ऊस दरावर कायमचा तोडगा हवा

By admin | Updated: November 9, 2014 23:40 IST

संजय पाटील : पन्नास खासदारांचे शिष्टमंडळ मोदींना भेटणार

सांगली : ऊस दराच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याकरिता महाराष्ट्र व कर्नाटकातील ५0 खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्यादृष्टीने योग्य भूमिका मांडली असली तरी, कारखानदारांचेही काही प्रश्न आहेत. त्यांना ते दर परवडणार आहेत का, या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे. दोन्ही बाजूंनी योग्य समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज आहे. साखर उद्योग टिकावा, यासाठी कायमस्वरुपी दराच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची गरज आहे. त्यासाठी दोन-तीन प्रस्ताव तयार करून ते केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील. पन्नास खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटून कायमस्वरूपी तोडग्याची मागणी करणार आहे. राज्यातही आता ऊस दर नियंत्रण समिती स्थापन झाली आहे. समितीची बैठक झाल्यानंतर या विषयीची भूमिका आम्ही केंद्र शासनापुढे मांडू. जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या चौकशीबाबत ते म्हणाले की, राज्यातील ज्या सहकारी संस्थांची कलम ८८ अंतर्गत चौकशी चालू होती, त्यास यापूर्वीच्या सरकारने स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेल्या चौकशा आता सुरू होतील. त्यातून सत्य बाहेर येईल. त्यामुळे शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीमार्फत सक्षम अन्नपुरवठा यंत्रणा उभारण्यासंदर्भात प्रस्ताव दिला जाईल. सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून मी सध्या या यंत्रणेचा आढावा घेत आहे. बायोमेट्रिक पद्धतीने पुरवठा करण्याच्या यंत्रणेतील त्रुटी व चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून त्याविषयी प्रस्तावात उल्लेख करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आरेवाडी गाव दत्तकमी आरेवाडी गाव दत्तक घेतले आहे. याठिकाणी प्रसिद्ध बिरोबा मंदिरासह इस्कॉनचे मंदिरही आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा बळकट करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दरवर्षी एक गाव दत्तक घेण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. नेहमी आर. आर. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या संजय पाटील यांनी आज त्यांच्याविषयी सावध भूमिका घेतली. जनतेचा कौल मान्य करून आता टीकेपेक्षा विकास कामांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी आर. आर. पाटील यांच्यावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. राज्याच्या मंत्रिमंडळात पूर्वीपासून सांगली जिल्ह्याला दोन-तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. भाजप सरकारमध्येही आता जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळावीत, अशी आग्रही मागणी आम्ही केली आहे. सरकार स्थापनेविषयीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याविषयी निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.