शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

म्हणे, पैशाशिवाय ‘म्हैसाळ’चे पाणी नाही!

By admin | Updated: April 7, 2015 01:10 IST

आडमुठ्या धोरणाचा फटका : बळीराजाची हाक कोण ऐकणार?

दादा खोत-सलगरे -शासनाची पाणी सोडण्याबद्दलची उदासीनता, वीजबिल आणि पाणीपट्टी थकबाकी या चक्रव्यूहात सापडलेल्या म्हैसाळ योजनेचे ग्रहण कधी सुटणार, याच्या प्रतीक्षेत पूर्व भागातील शेतकरी आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर या भागात ऊसशेती व द्राक्षशेतीत वाढ झाली असतानाच, यावर्षी सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला आहे. पाणी सोडण्याच्या विलंबामुळे पाणी पातळी कमालीची खालावली आहे. विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बी हंगामामध्ये पाणी न सोडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या हक्काच्या पिकांवर पाणी सोडावयास पाटबंधारे विभागाने भाग पाडले आहे. पाण्याची थकबाकी व वीजबिल या चक्रव्यूहात सापडलेल्या योजनेला आता सरकारच्या उदासीनतेची जोड मिळाली आहे. अवकाळीचे संकट व पाण्याची टंचाई या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला पाण्याची थकबाकी भरल्याशिवाय पाणी नाही, या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यातच पाण्याच्या अनियमित वेळापत्रकाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळीपेक्षाही जास्त नुकसान अनियमित पाणीपुरवठ्यामुळे झाल्याचे चित्र आहे. मध्यावर पिके वाळू लागल्याने कूपनलिकेसारख्या गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांनी योजनेची पाणीपट्टी भरावयास हवी हे जरी सत्य असले तरी, योजनेचे नक्की लाभक्षेत्र, लाभ घेतलेले शेतकरी व त्या शेतकऱ्यांना पाण्याचा नक्की किती लाभ मिळाला, सोडलेले आवर्तन नियमित होते का, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. योजनेचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कोण करणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींना हे प्रश्न केव्हा कळणार?पिके वाया गेल्यानंतर योजनेचे पाणी सोडून काय साध्य करणार?आजपर्यंत योजनेचे पाणी किती टक्के शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले?अनिश्चित पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले?शेतकऱ्याला पिकांची निवड करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक कधी जाहीर केले होते काय?योजनेचे एकूण लाभक्षेत्र आणि वर्षभरातील सोडलेले पाणी पूर्ण पीक निघेपर्यंत पुरेसे होते काय?शेतकऱ्यांच्या हक्काच्या रब्बी हंगामासाठी किती वेळा पाणी सोडले?