शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

म्हणे, पैशाशिवाय ‘म्हैसाळ’चे पाणी नाही!

By admin | Updated: April 7, 2015 01:10 IST

आडमुठ्या धोरणाचा फटका : बळीराजाची हाक कोण ऐकणार?

दादा खोत-सलगरे -शासनाची पाणी सोडण्याबद्दलची उदासीनता, वीजबिल आणि पाणीपट्टी थकबाकी या चक्रव्यूहात सापडलेल्या म्हैसाळ योजनेचे ग्रहण कधी सुटणार, याच्या प्रतीक्षेत पूर्व भागातील शेतकरी आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर या भागात ऊसशेती व द्राक्षशेतीत वाढ झाली असतानाच, यावर्षी सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला आहे. पाणी सोडण्याच्या विलंबामुळे पाणी पातळी कमालीची खालावली आहे. विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बी हंगामामध्ये पाणी न सोडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या हक्काच्या पिकांवर पाणी सोडावयास पाटबंधारे विभागाने भाग पाडले आहे. पाण्याची थकबाकी व वीजबिल या चक्रव्यूहात सापडलेल्या योजनेला आता सरकारच्या उदासीनतेची जोड मिळाली आहे. अवकाळीचे संकट व पाण्याची टंचाई या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला पाण्याची थकबाकी भरल्याशिवाय पाणी नाही, या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यातच पाण्याच्या अनियमित वेळापत्रकाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळीपेक्षाही जास्त नुकसान अनियमित पाणीपुरवठ्यामुळे झाल्याचे चित्र आहे. मध्यावर पिके वाळू लागल्याने कूपनलिकेसारख्या गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांनी योजनेची पाणीपट्टी भरावयास हवी हे जरी सत्य असले तरी, योजनेचे नक्की लाभक्षेत्र, लाभ घेतलेले शेतकरी व त्या शेतकऱ्यांना पाण्याचा नक्की किती लाभ मिळाला, सोडलेले आवर्तन नियमित होते का, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. योजनेचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कोण करणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींना हे प्रश्न केव्हा कळणार?पिके वाया गेल्यानंतर योजनेचे पाणी सोडून काय साध्य करणार?आजपर्यंत योजनेचे पाणी किती टक्के शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले?अनिश्चित पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले?शेतकऱ्याला पिकांची निवड करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक कधी जाहीर केले होते काय?योजनेचे एकूण लाभक्षेत्र आणि वर्षभरातील सोडलेले पाणी पूर्ण पीक निघेपर्यंत पुरेसे होते काय?शेतकऱ्यांच्या हक्काच्या रब्बी हंगामासाठी किती वेळा पाणी सोडले?