शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘त्यांना’ संस्था उभी करायचीही अक्कल नाही! : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:45 IST

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला.

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल; इस्लामपुरात राष्ट्रवादीची सभा; जयंतरावांचे शक्तिप्रदर्शन

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला. गोतावळ्यातच कृषी अवजारांचा घोटाळा करणाऱ्यांनी जयंतरावांच्या नादाला लागू नये, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्र वादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात कार्यकर्ते आणि जनतेच्या गर्दीने खचाखच भरलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल यात्रेतील ६३ वी सभा झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बॅँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंडे म्हणाले, शुक्रवारी भाजपचा स्थापना दिवस आहे. मुंबईतील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला इस्लामपुरात होणारी हल्लाबोलची ही विक्रमी सभा राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवून टाकणारी ठरेल. राज्यातील जनता या फसव्या सरकारला कंटाळली आहे. अच्छे दिनच्या नावावर मोदींनी फसवले. त्यांच्या फसवेगिरीमुळे जनतेच्या बॅँक खात्यात नव्हे, तर डोक्यावर १५ लाखांचे कर्ज होईल. देशासमोर असंख्य प्रश्न असताना हे सरकार धार्मिक मुद्दे चर्चेला ठेवत आहे. मोदी-फडणवीसांनी तरुणांची, शेतकºयांची, व्यापाºयांची फसवणूक केली आहे. हे सर्व घटक मोदींना संपवणार आहेत. देशाच्या राजकारणात भाजप दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करूया.

आ. जयंत पाटील म्हणाले, उंदरात पण पैसे खाता येतात, हे दाखविणारे भाजप सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरही पांघरूण घालत आहे. आमच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचारी म्हणून भुई थोपटली. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र गेल्या चार वर्षांत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. जनतेची फसवणूक करणाºया केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा जनाधार कमी झाला आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला जनता, इतर राजकीय पक्ष आणि न्यायाधीशही कंटाळले आहेत. इंदिरा गांधी, वाजपेयी यांचे सरकार जनतेने उलथवले, तेथे मोदी-फडणवीसांची काय गोष्ट आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सुमनताई पाटील, प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, संग्राम कोते-पाटील, सुरेखा ठाकरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, शहाजी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सुरेंद्र पाटील, प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील, चिपळूणच्या सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. विजय पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी आभार मानले.भाजपचे नाकाम सरकार बदला : पवारमाजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपचे नाकाम सरकार बदलण्याची वेळ आली आहे. भाजप-सेना एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्नच माहीत नाहीत आणि छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करतात. छत्रपतींच्या बदनामीचा निषेध करणाºयांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरून त्यांचा बेगडीपणा स्पष्ट होतो. चंद्रकांतदादा कर्नाटकावर प्रेम करतात, तर सुभाष देशमुख सरळ सरळ खोटे बोलतात. त्यावरून हे दरिद्री सरकार बेजबाबदारपणे काम करीत असल्याचे स्पष्ट होते. या सरकारला सत्तेवरून बाजूला करण्यासाठी जनतेने राष्टÑवादी कॉँग्रेसला साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडे