शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

‘त्यांना’ संस्था उभी करायचीही अक्कल नाही! : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:45 IST

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला.

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल; इस्लामपुरात राष्ट्रवादीची सभा; जयंतरावांचे शक्तिप्रदर्शन

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला. गोतावळ्यातच कृषी अवजारांचा घोटाळा करणाऱ्यांनी जयंतरावांच्या नादाला लागू नये, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्र वादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात कार्यकर्ते आणि जनतेच्या गर्दीने खचाखच भरलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल यात्रेतील ६३ वी सभा झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बॅँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंडे म्हणाले, शुक्रवारी भाजपचा स्थापना दिवस आहे. मुंबईतील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला इस्लामपुरात होणारी हल्लाबोलची ही विक्रमी सभा राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवून टाकणारी ठरेल. राज्यातील जनता या फसव्या सरकारला कंटाळली आहे. अच्छे दिनच्या नावावर मोदींनी फसवले. त्यांच्या फसवेगिरीमुळे जनतेच्या बॅँक खात्यात नव्हे, तर डोक्यावर १५ लाखांचे कर्ज होईल. देशासमोर असंख्य प्रश्न असताना हे सरकार धार्मिक मुद्दे चर्चेला ठेवत आहे. मोदी-फडणवीसांनी तरुणांची, शेतकºयांची, व्यापाºयांची फसवणूक केली आहे. हे सर्व घटक मोदींना संपवणार आहेत. देशाच्या राजकारणात भाजप दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करूया.

आ. जयंत पाटील म्हणाले, उंदरात पण पैसे खाता येतात, हे दाखविणारे भाजप सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरही पांघरूण घालत आहे. आमच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचारी म्हणून भुई थोपटली. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र गेल्या चार वर्षांत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. जनतेची फसवणूक करणाºया केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा जनाधार कमी झाला आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला जनता, इतर राजकीय पक्ष आणि न्यायाधीशही कंटाळले आहेत. इंदिरा गांधी, वाजपेयी यांचे सरकार जनतेने उलथवले, तेथे मोदी-फडणवीसांची काय गोष्ट आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सुमनताई पाटील, प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, संग्राम कोते-पाटील, सुरेखा ठाकरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, शहाजी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सुरेंद्र पाटील, प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील, चिपळूणच्या सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. विजय पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी आभार मानले.भाजपचे नाकाम सरकार बदला : पवारमाजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपचे नाकाम सरकार बदलण्याची वेळ आली आहे. भाजप-सेना एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्नच माहीत नाहीत आणि छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करतात. छत्रपतींच्या बदनामीचा निषेध करणाºयांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरून त्यांचा बेगडीपणा स्पष्ट होतो. चंद्रकांतदादा कर्नाटकावर प्रेम करतात, तर सुभाष देशमुख सरळ सरळ खोटे बोलतात. त्यावरून हे दरिद्री सरकार बेजबाबदारपणे काम करीत असल्याचे स्पष्ट होते. या सरकारला सत्तेवरून बाजूला करण्यासाठी जनतेने राष्टÑवादी कॉँग्रेसला साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडे