शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२०१९ च्या महापुराची भरपाई अद्याप नाही, यंदाची तरी मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 18:55 IST

Flood Sangli : २०१९ मधील प्रलंयकारी महापुरातील नुकसान भरपाईची रक्कम अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही, या स्थितीत यावर्षी पुन्हा महापुराने दणका दिला आहे. या वर्षीची मदत तरी हमखास मिळणार का? याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत. गेल्या महापुरातील नुकसानीपोटी जिल्ह्याला सुमारे ३०० कोटी रुपयांची प्रतिक्षा आहे.

ठळक मुद्दे२०१९ च्या महापुराची भरपाई अद्याप नाही, यंदाची तरी मिळणार का?गेल्या महापुरातील नुकसानीपोटी ३०० कोटी रुपयांची प्रतिक्षा

संतोष भिसेसांगली : २०१९ मधील प्रलंयकारी महापुरातील नुकसान भरपाईची रक्कम अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही, या स्थितीत यावर्षी पुन्हा महापुराने दणका दिला आहे. या वर्षीची मदत तरी हमखास मिळणार का? याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत. गेल्या महापुरातील नुकसानीपोटी जिल्ह्याला सुमारे ३०० कोटी रुपयांची प्रतिक्षा आहे.२०१९ च्या महापुरामध्ये पूरग्रस्तांना तातडीची १५ हजारांची मदत मिळाली. व्यापाऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले. काही काळानंतर मात्र शासनाने हात आखडते घेतले. अनेक व्यापारी आणि कुटुंबे मदतीपासून वंचितच राहिली. मिरजेच्या तहसीलदार कार्यालयात सुमारे सात कोटी रुपयांचे वैयक्तीक मदतीचे प्रस्ताव निर्णयाधीन अवस्थेत आहेत. पैसे नसल्याचे सांगितले जात आहे.महापालिकेने २०८ कोटी रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव पाठविला, पण एक रुपयादेखील मिळाला नाही. जिल्हा परिषदेने ६८ कोटी ४३ लाख रुपयांच्या नुकसानीचा अहवाल दिला होता, ती भरपाई मिळण्यापूर्वीच पुन्हा महापुराचा दणका बसला आहे.सांगलीत शामरावनगरमधील अनेक घरांना पुराने वेढले होते. तेथील रहिवासी आणि व्यापारी मदतीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. दोन वर्षांपूर्वीची मदत मिळण्यापूर्वीच ते पुन्हा महापुरात अडकले आहेत.२०१९ ची प्रलंबित भरपाई अशी

  • महापालिका २०८ कोटी
  • जिल्हा परिषद ६८ कोटी ४३ लाख
  • महापालिका क्षेत्रातील दुकाने व कुटुंबे ७ कोटी
  • जिल्ह्यातील शेती व घरे - सुमारे २० कोटी

२०१९ च्या महापुराचा फटका बसलेल्या काही कुटुंबांना अजूनही मदत मिळालेली नाही. नुकसान झालेल्या प्रत्येक घरासाठी ९५ हजार १०० रुपये जाहीर केले होते, काही कुटुंबांना मदत अजूनही मिळालेली नाही.- संदीप राजोबा,शेतकरी संघटना

शामरावनगर व परिसरातील रहिवासी व दुकानांची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. मदतीसाठी आम्ही दोन वर्षांपासून तहसीलदार कर्यालयाकडे हेलपाटे मारत आहोत, पण फाईल पुढे सरकलेली नाही. निधी नसल्याचे सांगितले जात आहे.- निलेश जगदाळे,रहिवासी, शामरावनगर, सांगली.

२०१९ च्या महापुरात रस्ते, शासकीय इमारती, शाळा, बंधारे, पुलांची मोठी हानी झाली होती. त्याचे पैसे शासनाने अद्याप दिलेले नाहीत. जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्याने रस्त्यांची दुरुस्ती पूर्णपणे करता आलेली नाही. यावर्षीच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी तरी शासनाने मदत करावी.- प्राजक्ता कोरे,अध्यक्षा, जिल्हा परिषद

टॅग्स :floodपूरSangliसांगली