शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर

By अशोक डोंबाळे | Updated: July 16, 2024 19:05 IST

त्यांना पडलेली १२ मते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचीच

सांगली : भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव त्यांना मतांचे गणित जुळवताना न आल्यामुळे झाला आहे. परंतु, त्यांच्या या अपयशाचे खापर त्यांनी माझ्यावर फोडण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिले.शेकापचे जयंत पाटील यांनी 'आमदार मानसिंगराव नाईक यांचं मत फुटलं' असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मानसिंगराव नाईक बोलत होते. नाईक म्हणाले, जयंत पाटील यांचे स्वत:चे एकही मत नाही. तरीही ते विधान परिषदेच्या निवडणूकीत उतरले. त्यांनी मताचे गणित जुळवायला पाहिजे होते.

त्यांनी एमआयएम पक्षासह अन्य छोट्या पक्षांची मते मिळणार असे सांगितले होते. परंतु, त्यांना त्यापैकी एकही मत मिळाले नाही. काँग्रेसकडूनही उध्दवसेनेला मदत झाली. म्हणूनच जयंत पाटील यांचा पराभव झाला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची १२ मतेच त्यांना मिळाली असून उर्वरित एकही मत त्यांना मिळाले नाही. असे असतांना त्यांनी माझ्यावर त्यांच्या पराभवाचे खापर फोडणे योग्य वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्याकडूनही विचारणाशरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शेकापचे जयंत पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ''आमच्या आमदारांवर मत फुटल्याचे आरोप कशाच्या आधारावर केला आहे?'' अशी विचारणा केली आहे. यावर त्यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही. सध्या त्यांची चूक लक्षात आल्यावर दुसरेच नाव घेत आहेत, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.लोकसभा निवडणुकीचाही फटकारायगड लोकसभा निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांनी मदत केली नाही, म्हणून उद्धवसेना नाराज होती. म्हणूनच उद्धवसेनेकडून उमेदवार उभा केला. या उमेदवारास काँग्रेसकडून मदत झाली, म्हणून ते विजय झाले आणि जयंत पाटील पराभूत झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMansingrao Naikमानसिंगराव नाईकJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस