शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Sangli: मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचे फायर ऑडिटच नाही, अग्निरोधक यंत्रणेशिवाय नाट्यगृह सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 16:11 IST

कोल्हापुरातील दुर्घटनेपासून बोध घ्या

सदानंद औंधे

मिरज : मिरजेत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहात मोठ्या आगीपासून सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नाही. कोल्हापुरातील दुर्घटनेनंतर मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आगीपासून सुरक्षेची यंत्रणा नसतानाही मनपा प्रशासनाने नाट्यगृह सुरू केल्याने प्रेक्षकांचा जीव धोक्यात आहे. कोल्हापुरातील दुर्घटनेपासून महापालिका प्रशासनाने बोध घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले बालगंधर्व नाट्यगृहाचे फायर ऑडिट झाले नसल्याने नाट्यगृह अनेक वर्षे सुरू झाले नव्हते. कलाकार, नाट्य रसिकांच्या आग्रहामुळे अग्नी सुरक्षा यंत्रणेची पूर्तता करण्याच्या अटीवर नाट्यगृह सुरू केले. मात्र, त्यानंतरही वाळूच्या बादल्या व अग्निरोधक सिलिंडर यावरच नाट्यगृह सुरू आहे. नाट्यपंढरी म्हणून ख्याती असलेल्या मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहाची हेळसांड खेदजनक आहे. अनावश्यक कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असताना नाट्यगृहाच्या सुरक्षेबाबत मात्र उदासीनता आहे.बालगंधर्व नाट्यगृह मिरज शहरातील एकमेव नाट्यगृह आहे. पूर्वीच्या हंसप्रभा थिएटरला मोठी परंपरा आहे. बालगंधर्वांनी येथे रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावर आपली कला सादर केली. संस्थान काळात संगीत नाटकांनी या ठिकाणी रात्री जागविलेले जुने लाकडी हंसप्रभा नाट्यगृह पाडून तेथे सुमारे एक हजार प्रेक्षक क्षमतेचे मोठे अत्याधुनिक नाट्यगृह उभारले, मात्र आराखड्याप्रमाणे अनेक कामे पूर्ण न करताच नाट्यगृह सुरू केले. नाट्यगृहाभोवती रिंगरोड दाखविण्यात आला. त्यासाठी बाहेरील आवारातील नाट्यगृहाला अडचण होणारी दुकाने न पाडता काही कारभाऱ्यांच्या हस्तक्षेपाने या दुकानांना अभय मिळाले.यामुळे आणीबाणीच्या वेळी नाट्यगृहाच्या एकाच बाजूने अग्निशामक दलाचे वाहन आत जाऊ शकते. याविरुद्ध मिरजेतील काही जागरूक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने महापालिकेला आराखड्याप्रमाणे कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले, तरीही याबाबत चालढकल झाल्याने नाट्यगृहाचा परवाना नूतनीकरण रखडला होता. अग्निरोधक यंत्रणा बसवण्याच्या अटीवर नाट्यगृह सुरू करण्याचा परवाना मिळाला, मात्र आजतागायत ही यंत्रणा बसवली नाही.नाट्यगृहासमोरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे, हातगाड्या, विक्रेते, मोकाट जनावरे यामुळे वाहतूककोंडी नेहमीचीच आहे. नाट्यगृह सांभाळण्यास मनपाने केवळ एक कर्मचारी नेमला आहे. मिरजेची सांस्कृतिक ओळख असलेल्या या नाट्यगृहातील गैरसोयी दूर करून अग्निसुरक्षा यंत्रणेची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नाट्यगृहाच्या आवारातील दुकाने व समोर रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिक वर्षानुवर्षे करीत आहेत. मात्र, बालगंधर्वची उपेक्षा संपत नसल्याने मिरजेतील नाट्यरसिक व नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास मोठी हानीनाट्यगृहात नाट्यप्रयोगासाठी ही ध्वनियंत्रणेसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने कलाकार, नाट्यसंस्था, प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे येथे विविध शाळांची स्नेहसंमेलन व गेट-टुगेदर कार्यक्रम होत आहेत. येथे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने कोल्हापुरातील दुर्घटनेपासून महापालिका प्रशासनाने बोध घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज