शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सांगलीतील बहे गावात १०० वर्षांपासून स्मशानभूमीच नाही, दहनवेळी नातेवाईकच भोगतायत मरण यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 16:22 IST

अशोक पाटील इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी बहे (ता. वाळवा) येथे कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. ...

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी बहे (ता. वाळवा) येथे कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. गावाचा चेहरा-मोहरा बदलला, असा स्थानिक नेत्यांचा दावा आहे; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून स्मशानभूमीच नाही, त्यामुळे पवित्र रामलिंग बेटाच्या परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांना मरणयातना भोगाव्या लागतात.दिवंगत मंत्री यशवंतराव मोहिते दिवंगत मंत्री राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणेतून कृष्णा खोऱ्यात दोन साखर कारखाने उभे राहिले. याच माध्यमातून कृष्णा काठी वसलेल्या बहे गावाची प्रगती २१व्या शतकाकडे झेपावली; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून येथे स्मशानभूमीच नाही.कृष्णेला पूर आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. यासाठी इस्लामपूर बहे रोडवर २००८ साली चार कोटी रुपये खर्च करून पूल उभा करण्यात आला. रामलिंग बेटाला पौराणिक इतिहास आहे. येथे ११ मारुतींपैकी एक देवस्थान आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही पर्यटनाला गती नाही.गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने १०० वर्षांपासून नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते. पावसाळ्यात स्मशानभूमीमध्ये पाणी आल्यानंतर ग्रामस्थ पुलाच्या रस्त्यावरच दहन विधी उरकतात. यावेळी नातेवाइकांचे मोठे हाल होतात. उन्हाळ्यातही अशीच अवस्था असते. एकंदरीत २१व्या शतकाकडे झुकणाऱ्या गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

स्मशानभूमीसाठी जागा नाही हा दावा चुकीचा मानला जातो. आधुनिक काळात समुद्रातही मोठे पिलर्स उभे राहतात. नदीच्या पात्रातच पिलर उभे करून पुलाबरोबरीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभी राहू शकते. त्यामुळे रामलिंग बेटाच्या सौंदर्यातही भर पडेल.

तत्कालीन सरपंच छायाताई पाटील यांच्या कारकिर्दीत स्मशानभूमीसाठी २० लाख रुपये निधी आला होता. जागेअभावी हा निधी परत गेला. ग्रामस्थांच्या सोईसाठी स्मशानभूमी उभी करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत; परंतु, त्या परिसरातील नागरिकांनी सहकार्य केल्यास स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागेल. -विठ्ठल पाटील, संचालक- राजारामबापू पाटील साखर कारखाना

टॅग्स :Sangliसांगली