शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

...मगच शिक्षकांना सोडावे, जत तालुका पंचायत समिती बैठक : मासिक बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:56 IST

जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक

जत : जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक असलेल्या ठिकाणी राहावे, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करावी, नवीन शिक्षक येऊन येथे हजर झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना तालुक्यातून बाहेर सोडण्यात यावे, असे ठराव एकमताने संमत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती मंगल जमदाडे होत्या.

यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे, सदस्य रवींद्र सावंत, मनोज जगताप, आप्पा मासाळ, मनोज जगताप, दºयापा हत्तळ्ळी, दिग्विजय चव्हाण, अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे, विष्णू चव्हाण, अर्चना पाटील, सुशिला तावशी, कविता खोत, लक्ष्मी माळी उपस्थित होते.

चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणाºया निधीचा मुद्दा अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी उपस्थित केला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीचे अकौंट लॉक केल्यामुळे सरपंचांच्या अधिकारावर गदा आली आहे, असा आरोप केला. त्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणाले की, अधिकारावर गदा आणण्याचा हा मुद्दा नसून या निर्णयामुळे सरपंचाला अंधारात ठेवून जो मनमानी कारभार व गैरव्यवहार होत होते, ते आता बंद झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकौंट लॉक हा पर्याय काढण्यात आला आहे.

कविता खोत यांनी संख मध्यम प्रकल्पातील अतिक्रमण काढावे व तालुक्यात काही ठिकाणी रस्त्याची निकृष्ट कामे होत आहेत, त्याची चौकशी करावी, त्यानंतर बिले आदा करावीत, असा ठराव घ्यावा, अशी मागणी केली.रवींद्र सावंत व आप्पा मासाळ यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या कामाचे वाभाडे काढले. पं. स. विश्रामगृहात कोणालाही विश्वासात न घेता आणि माहिती न देता जे बदल केले आहेत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व झालेली चूक दुरुस्त करुन घेण्यात यावी अशी मागणी केली.ग्रामसेवकांवर कारवाई कराएकही ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाही. याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लेखी आदेश काढून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सांगितले. तालुक्यात बाहेरून शिक्षक आल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना सोडावे व बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाहीत, अशा ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी केली असता, वरिष्ठ पातळीवरुन शिक्षण सचिवांचा दबाव आहे. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोडण्यात यावे, असा आदेश आहे असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण