शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर धरणग्रस्त तरुण नक्षलवादाकडे वळेल: गौरव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:16 IST

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना ...

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना नक्षलवादाकडे वळविणारी आहेत, असा आरोप करत धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा या शासनालाही घरात बसवू, असा इशारा वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांनी सोमवारी दिला.धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला. जुन्या तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील गर्दीमुळे पेठ-सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.नायकवडी म्हणाले, आजचा मोर्चा हा समजणाऱ्यांसाठी इशारा आहे. अद्याप कित्येक धरणग्रस्तांना जमिनीचे आदेश मिळालेले नाहीत. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात मंत्रीपद असूनही फक्त आश्वासने मिळाली आहेत. विद्यमान शासनाने वेळकाढूपणा केला, तर त्यांनाही घरात बसवू. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांमध्ये शासनाकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास क्रांती अटळ असेल.नामदेव नांगरे, किरण नायकवडी, उमेश कानडे, आरिफ मुल्ला, धनाजी घोरपडे, मुसा घानवीलकर, भारत पाटील, श्रीपती पाटील, संपतराव बेलवलकर, अ‍ॅड. के. एस. पाटील, कासम वारुसे, पांडुरंग सावंत, अ‍ॅड. वसंत कांबळे उपस्थित होते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.त्यांनी येत्या चार दिवसांत प्रांताधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेऊन सकारात्मक पध्दतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले.अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याउरमोडी व वांग प्रकल्पाप्रमाणे जून २००७ व आॅगस्ट २००७ च्या शासकीय आदेशांची अंमलबजावणी व्हावी, ६५ टक्के रक्कम भरून धरणग्रस्तांना आदेश द्यावेत, शासकीय नोकरी न मिळालेल्या तरुणांना प्रत्येकी २० लाख रुपये कायमस्वरुपी अनुदान मिळावे, धरणग्रस्तांच्या शेतजमिनीची कब्जेहक्काची रक्कम माफ व्हावी, शेतजमीन संपादनासाठी निधी उपलब्ध करा, धरण व अभयारण्यग्रस्तांना लाभक्षेत्रातील मिळालेल्या जमिनीला शासकीय दराने पाणी मिळावे, कागदपत्रांची पडताळणी करून संकलन दुरुस्ती व्हावी, शेतजमीन कसण्यास होणारे अडथळे दूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.