शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

...तर धरणग्रस्त तरुण नक्षलवादाकडे वळेल: गौरव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:16 IST

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना ...

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना नक्षलवादाकडे वळविणारी आहेत, असा आरोप करत धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा या शासनालाही घरात बसवू, असा इशारा वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांनी सोमवारी दिला.धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला. जुन्या तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील गर्दीमुळे पेठ-सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.नायकवडी म्हणाले, आजचा मोर्चा हा समजणाऱ्यांसाठी इशारा आहे. अद्याप कित्येक धरणग्रस्तांना जमिनीचे आदेश मिळालेले नाहीत. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात मंत्रीपद असूनही फक्त आश्वासने मिळाली आहेत. विद्यमान शासनाने वेळकाढूपणा केला, तर त्यांनाही घरात बसवू. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांमध्ये शासनाकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास क्रांती अटळ असेल.नामदेव नांगरे, किरण नायकवडी, उमेश कानडे, आरिफ मुल्ला, धनाजी घोरपडे, मुसा घानवीलकर, भारत पाटील, श्रीपती पाटील, संपतराव बेलवलकर, अ‍ॅड. के. एस. पाटील, कासम वारुसे, पांडुरंग सावंत, अ‍ॅड. वसंत कांबळे उपस्थित होते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.त्यांनी येत्या चार दिवसांत प्रांताधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेऊन सकारात्मक पध्दतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले.अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याउरमोडी व वांग प्रकल्पाप्रमाणे जून २००७ व आॅगस्ट २००७ च्या शासकीय आदेशांची अंमलबजावणी व्हावी, ६५ टक्के रक्कम भरून धरणग्रस्तांना आदेश द्यावेत, शासकीय नोकरी न मिळालेल्या तरुणांना प्रत्येकी २० लाख रुपये कायमस्वरुपी अनुदान मिळावे, धरणग्रस्तांच्या शेतजमिनीची कब्जेहक्काची रक्कम माफ व्हावी, शेतजमीन संपादनासाठी निधी उपलब्ध करा, धरण व अभयारण्यग्रस्तांना लाभक्षेत्रातील मिळालेल्या जमिनीला शासकीय दराने पाणी मिळावे, कागदपत्रांची पडताळणी करून संकलन दुरुस्ती व्हावी, शेतजमीन कसण्यास होणारे अडथळे दूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.