शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

...तर धरणग्रस्त तरुण नक्षलवादाकडे वळेल: गौरव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:16 IST

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना ...

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना नक्षलवादाकडे वळविणारी आहेत, असा आरोप करत धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा या शासनालाही घरात बसवू, असा इशारा वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांनी सोमवारी दिला.धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला. जुन्या तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील गर्दीमुळे पेठ-सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.नायकवडी म्हणाले, आजचा मोर्चा हा समजणाऱ्यांसाठी इशारा आहे. अद्याप कित्येक धरणग्रस्तांना जमिनीचे आदेश मिळालेले नाहीत. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात मंत्रीपद असूनही फक्त आश्वासने मिळाली आहेत. विद्यमान शासनाने वेळकाढूपणा केला, तर त्यांनाही घरात बसवू. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांमध्ये शासनाकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास क्रांती अटळ असेल.नामदेव नांगरे, किरण नायकवडी, उमेश कानडे, आरिफ मुल्ला, धनाजी घोरपडे, मुसा घानवीलकर, भारत पाटील, श्रीपती पाटील, संपतराव बेलवलकर, अ‍ॅड. के. एस. पाटील, कासम वारुसे, पांडुरंग सावंत, अ‍ॅड. वसंत कांबळे उपस्थित होते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.त्यांनी येत्या चार दिवसांत प्रांताधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेऊन सकारात्मक पध्दतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले.अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याउरमोडी व वांग प्रकल्पाप्रमाणे जून २००७ व आॅगस्ट २००७ च्या शासकीय आदेशांची अंमलबजावणी व्हावी, ६५ टक्के रक्कम भरून धरणग्रस्तांना आदेश द्यावेत, शासकीय नोकरी न मिळालेल्या तरुणांना प्रत्येकी २० लाख रुपये कायमस्वरुपी अनुदान मिळावे, धरणग्रस्तांच्या शेतजमिनीची कब्जेहक्काची रक्कम माफ व्हावी, शेतजमीन संपादनासाठी निधी उपलब्ध करा, धरण व अभयारण्यग्रस्तांना लाभक्षेत्रातील मिळालेल्या जमिनीला शासकीय दराने पाणी मिळावे, कागदपत्रांची पडताळणी करून संकलन दुरुस्ती व्हावी, शेतजमीन कसण्यास होणारे अडथळे दूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.