शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कौतुकास्पद! सांगलीतील तरुणांनी अखंडित तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची केली स्वच्छता

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2023 19:19 IST

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले

सांगली : घरातल्या स्वच्छतेचाही कंटाळा करणाऱ्या लोकांसमोर नवा आदर्श ठेवत सांगलीतील तरुणांनी अखंडित १ हजार ८२५ दिवस म्हणजेच तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची स्वच्छता केली. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांनी या अनोख्या मोहिमेला मानवंदना देण्यासाठी १ मे रोजी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.सांगली व परिसरातील काही युवकांनी एकत्र येत निर्धार फाउंडेशनची स्थापना केली. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी शहरासह जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर जिथे शक्य तिथे स्वच्छता मोहीम राबविली.अस्वच्छ परिसर स्वच्छ केले, सेल्फी पॉईंट उभारले, बसस्थानके, दुभाजके, चाैक, स्मशानभूमी अशा अनेक ठिकाणांचे रूपडे त्यांनी पालटविले. राजकीय नेत्यांसह परिसरातील बड्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. सांगलीतील महापुरानंतर, पंढरपूरच्या यात्रेनंतरची स्वच्छता मोहीम करून त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. त्यांच्या या मोहिमेला यंदा १ मे रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्वच्छतेचा हा एक विक्रम आहे.पाच जिल्ह्यांकडून स्वच्छतारूपी मानवंदनानिर्धार फाउंडेशनच्या या स्वच्छता मोहिमेला राज्यातील पाच जिल्ह्यांकडून एकाच दिवशी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून मानवंदना दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत १ मे रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वच्छता अभियान होणार आहे.

आजी-माजी पालकमंत्र्यांनी केला गाैरवसांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर व संपूर्ण टीमला त्यांच्या निवासस्थानी बोलवून शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देत सन्मान केला. तसेच माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्या टीमला संदेश देत गौरविले.

या टीमने नोंदविला विक्रमफाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर यांच्यासह अनिल अंकलखोपे, भरतकुमार पाटील, वसंत भोसले, अनिरुद्ध कुंभार, सचिन ठाणेकर, शकील मुल्ला, मनोज नाटेकर, गणेश चलवादे, आदींच्या पथकाने स्वच्छतेचा विक्रम नोंदविला.

टॅग्स :Sangliसांगली