शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Sangli- ताकारी योजना: २८३ कोटींच्या निधीतून कालव्याचे पाणी बंदिस्त नलिकेतून वाहणार, काय फायदे होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:31 IST

शेतकऱ्यांच्या शंका निरसनाची आवश्यकता 

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा केली जात आहे. पारंपरिक उघड्या पद्धतीच्या मुख्य व शाखा कालव्यांवरील वितरण प्रणालीला बंदिस्त नलिकांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. या योजनेच्या २५,००० हेक्टर क्षेत्रासाठी बंदिस्त नलिकांची कामे होणार आहेत. यामुळे योजनेची सिंचन कार्यक्षमता वाढणार आहे. केंद्र शासनाच्या लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेली २८३ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीतून ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. सध्या लाभक्षेत्र विकासाची ही कामे सुरू झाली आहेत.ताकारी योजनेतील वितरिकांची लांबी २०७.१९ किमी आहे, तर लघु वितरिकांची लांबी १३६.५६ किमी आहे. एकूण ३४३.७५ किमी लांबीच्या वितरिका व लघु वितरीकांद्वारे लाभक्षेत्राला पाणी दिले जाते. परंतु, अपूर्ण व नादुरुस्त वितरीकांमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पाणी पोहोचत नाही. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता कमकुवत झाली आहे.

बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाची कारणे ताकारी योजनेचे मुख्य आणि शाखा कालवे अस्तरीत आहेत, परंतु त्यावरील वितरण व्यवस्थाविना अस्तरीत आहे. ही वितरण व्यवस्था १२ ते १५ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने पूर्ण झाली होती, मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. झाडे-झुडपे उगवली आहेत. यामुळे वितरण प्रणाली कार्यक्षम नाही. पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे आणि पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यावर उपाय म्हणून बंदिस्त नलिकेचे रुपांतरण अत्यंत आवश्यक आहे.

भूसंपादन खर्चाची बचत वितरीकांचे भूसंपादन अजूनही पूर्ण झालेले नाही. बंदिस्त नलिका रुपांतरणामुळे भूसंपादनाची आवश्यकता राहणार नाही. यामुळे भूसंपादन खर्चात मोठी बचत होईल आणि बचत झालेल्या खर्चातच बंदिस्त नलिकांचे काम होईल.

बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाचे फायदे

  • शेतकऱ्यांना थेट बांधावर चेंबरद्वारे मिळणार पाणी.
  • प्रत्येक वितरीकाच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनाचा लाभ मिळेल.
  • बंदिस्त नलिकांमुळे बाष्पीभवन कमी होईल, पाण्याचा अपव्यय कमी होईल.
  • पाणी चोरीला आळा बसेल, वितरण सुलभ होईल.
  • पाणीपट्टी वसूली प्रभावी होईल.
  • देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी होईल.
  • योजनेचा वीज खर्च कमी होईल.
  • जमिनीचे क्षारपण टळेल आणि पोत सुधारेल.

शेतकऱ्यांच्या शंका निरसनाची आवश्यकता बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याचा पाझर कमी होईल आणि जमिनीतील व विहिरींची पाणी पातळी खालावेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. यावर प्रशासन, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन शेतकऱ्यांच्या शंका निरसन होणे गरजेचे आहे, अशी सूचना आमदार विश्वजित कदम यांनी नागपूर अधिवेशनात मांडली आहे. मात्र, यावर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.

रस्ते बंद होण्याची भीतीसद्य:स्थितीत वितरीकांच्या बाजूने अनेक ठिकाणी रस्ते आहेत.आता बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे रस्ते बंद करून संबंधित शेतमालक त्या जागी शेतीपिके घेतील. यामुळे रस्ते बंद होतील, अशी भीती आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी