शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- ताकारी योजना: २८३ कोटींच्या निधीतून कालव्याचे पाणी बंदिस्त नलिकेतून वाहणार, काय फायदे होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:31 IST

शेतकऱ्यांच्या शंका निरसनाची आवश्यकता 

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा केली जात आहे. पारंपरिक उघड्या पद्धतीच्या मुख्य व शाखा कालव्यांवरील वितरण प्रणालीला बंदिस्त नलिकांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. या योजनेच्या २५,००० हेक्टर क्षेत्रासाठी बंदिस्त नलिकांची कामे होणार आहेत. यामुळे योजनेची सिंचन कार्यक्षमता वाढणार आहे. केंद्र शासनाच्या लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेली २८३ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीतून ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. सध्या लाभक्षेत्र विकासाची ही कामे सुरू झाली आहेत.ताकारी योजनेतील वितरिकांची लांबी २०७.१९ किमी आहे, तर लघु वितरिकांची लांबी १३६.५६ किमी आहे. एकूण ३४३.७५ किमी लांबीच्या वितरिका व लघु वितरीकांद्वारे लाभक्षेत्राला पाणी दिले जाते. परंतु, अपूर्ण व नादुरुस्त वितरीकांमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पाणी पोहोचत नाही. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता कमकुवत झाली आहे.

बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाची कारणे ताकारी योजनेचे मुख्य आणि शाखा कालवे अस्तरीत आहेत, परंतु त्यावरील वितरण व्यवस्थाविना अस्तरीत आहे. ही वितरण व्यवस्था १२ ते १५ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने पूर्ण झाली होती, मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. झाडे-झुडपे उगवली आहेत. यामुळे वितरण प्रणाली कार्यक्षम नाही. पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे आणि पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यावर उपाय म्हणून बंदिस्त नलिकेचे रुपांतरण अत्यंत आवश्यक आहे.

भूसंपादन खर्चाची बचत वितरीकांचे भूसंपादन अजूनही पूर्ण झालेले नाही. बंदिस्त नलिका रुपांतरणामुळे भूसंपादनाची आवश्यकता राहणार नाही. यामुळे भूसंपादन खर्चात मोठी बचत होईल आणि बचत झालेल्या खर्चातच बंदिस्त नलिकांचे काम होईल.

बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाचे फायदे

  • शेतकऱ्यांना थेट बांधावर चेंबरद्वारे मिळणार पाणी.
  • प्रत्येक वितरीकाच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनाचा लाभ मिळेल.
  • बंदिस्त नलिकांमुळे बाष्पीभवन कमी होईल, पाण्याचा अपव्यय कमी होईल.
  • पाणी चोरीला आळा बसेल, वितरण सुलभ होईल.
  • पाणीपट्टी वसूली प्रभावी होईल.
  • देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी होईल.
  • योजनेचा वीज खर्च कमी होईल.
  • जमिनीचे क्षारपण टळेल आणि पोत सुधारेल.

शेतकऱ्यांच्या शंका निरसनाची आवश्यकता बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याचा पाझर कमी होईल आणि जमिनीतील व विहिरींची पाणी पातळी खालावेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. यावर प्रशासन, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन शेतकऱ्यांच्या शंका निरसन होणे गरजेचे आहे, अशी सूचना आमदार विश्वजित कदम यांनी नागपूर अधिवेशनात मांडली आहे. मात्र, यावर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.

रस्ते बंद होण्याची भीतीसद्य:स्थितीत वितरीकांच्या बाजूने अनेक ठिकाणी रस्ते आहेत.आता बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे रस्ते बंद करून संबंधित शेतमालक त्या जागी शेतीपिके घेतील. यामुळे रस्ते बंद होतील, अशी भीती आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी