शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Sangli: विटा उपविभागात ३६० एकरवर साकारणार सोलर प्रकल्प, प्रतिदिन किती लाख युनिट वीज निर्मिती होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:45 IST

दिलीप मोहिते विटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा ...

दिलीप मोहितेविटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा उपविभागात सुमारे ३६० एकर शासकीय गायरान जमिनीवर सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीस सुरूवात झाली आहे.विटा उपविभागातील खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात १३ ठिकाणी जवळपास ७२ मेगावॅटसाठी काम सुरू आहे. त्यातून प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात सध्या टेंभू, ताकारी तसेच आरफळ आदी जलसिंचन योजनांचे पाणी शिवारात फिरले आहे. महावितरण सात ते आठ तासच कृषिपंपांना वीज देत असल्याने पिके धोक्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.महावितरणच्या विटा उपविभागातील खानापूर तालुक्यात बेणापूर, रेणावी, भाग्यनगर यासह सहा ठिकाणी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. त्यातून उत्पादित होणारी वीज महावितरणच्या खानापूर, गार्डी, रेणावी, पारे येथील उपकेंद्राला जोडली जाणार आहे. तर आटपाडी तालुक्यातील घाणंद, पळसखेल, लिंगीवरे तसेच माडगुळे याठिकाणच्या प्रकल्पात तयार होणारी वीज खरसुंडी, लिंगीवरे, पुजारवाडी, माडगुळे या उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे. या दोन तालुक्यात सुमारे ५९ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व तडसर या दोन ठिकाणी सोलर प्रकल्प प्रस्तावित आहे. या दोन ठिकाणी १३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या विटा उपविभागात सध्या सोलार प्रकल्पातून सुमारे ७२ मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प नव्या वर्षात पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

सोलर प्रकल्प दृष्टीक्षेपात

  • सोलार प्रकल्पाच्या एक मेगावॅटसाठी ५ एकर जमिनीची आवश्यकता.
  • खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात प्रकल्पाची उभारणी सुरू.
  • ७२ मेगावॅटच्या सोलार प्रकल्पासाठी ३६० एकर जमीन अधिग्रहण.
  • प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती.
  • सरासरी ५ अश्वशक्तीचे १० हजार कृषिपंपांना एकावेळी वीजपुरवठा शक्य.

शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून विटा उपविभागात विविध ठिकाणी ७२ मेगावॅट इतका सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. शासकीय गायरान जमिनी यासाठी घेतल्या आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास अडचण येणार नाही. - विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण, विटा उपविभाग.

टॅग्स :Sangliसांगली