शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

Sangli: विटा उपविभागात ३६० एकरवर साकारणार सोलर प्रकल्प, प्रतिदिन किती लाख युनिट वीज निर्मिती होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:45 IST

दिलीप मोहिते विटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा ...

दिलीप मोहितेविटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा उपविभागात सुमारे ३६० एकर शासकीय गायरान जमिनीवर सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीस सुरूवात झाली आहे.विटा उपविभागातील खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात १३ ठिकाणी जवळपास ७२ मेगावॅटसाठी काम सुरू आहे. त्यातून प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात सध्या टेंभू, ताकारी तसेच आरफळ आदी जलसिंचन योजनांचे पाणी शिवारात फिरले आहे. महावितरण सात ते आठ तासच कृषिपंपांना वीज देत असल्याने पिके धोक्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.महावितरणच्या विटा उपविभागातील खानापूर तालुक्यात बेणापूर, रेणावी, भाग्यनगर यासह सहा ठिकाणी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. त्यातून उत्पादित होणारी वीज महावितरणच्या खानापूर, गार्डी, रेणावी, पारे येथील उपकेंद्राला जोडली जाणार आहे. तर आटपाडी तालुक्यातील घाणंद, पळसखेल, लिंगीवरे तसेच माडगुळे याठिकाणच्या प्रकल्पात तयार होणारी वीज खरसुंडी, लिंगीवरे, पुजारवाडी, माडगुळे या उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे. या दोन तालुक्यात सुमारे ५९ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व तडसर या दोन ठिकाणी सोलर प्रकल्प प्रस्तावित आहे. या दोन ठिकाणी १३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या विटा उपविभागात सध्या सोलार प्रकल्पातून सुमारे ७२ मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प नव्या वर्षात पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

सोलर प्रकल्प दृष्टीक्षेपात

  • सोलार प्रकल्पाच्या एक मेगावॅटसाठी ५ एकर जमिनीची आवश्यकता.
  • खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात प्रकल्पाची उभारणी सुरू.
  • ७२ मेगावॅटच्या सोलार प्रकल्पासाठी ३६० एकर जमीन अधिग्रहण.
  • प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती.
  • सरासरी ५ अश्वशक्तीचे १० हजार कृषिपंपांना एकावेळी वीजपुरवठा शक्य.

शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून विटा उपविभागात विविध ठिकाणी ७२ मेगावॅट इतका सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. शासकीय गायरान जमिनी यासाठी घेतल्या आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास अडचण येणार नाही. - विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण, विटा उपविभाग.

टॅग्स :Sangliसांगली