शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sangli: विटा उपविभागात ३६० एकरवर साकारणार सोलर प्रकल्प, प्रतिदिन किती लाख युनिट वीज निर्मिती होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:45 IST

दिलीप मोहिते विटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा ...

दिलीप मोहितेविटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा उपविभागात सुमारे ३६० एकर शासकीय गायरान जमिनीवर सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीस सुरूवात झाली आहे.विटा उपविभागातील खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात १३ ठिकाणी जवळपास ७२ मेगावॅटसाठी काम सुरू आहे. त्यातून प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात सध्या टेंभू, ताकारी तसेच आरफळ आदी जलसिंचन योजनांचे पाणी शिवारात फिरले आहे. महावितरण सात ते आठ तासच कृषिपंपांना वीज देत असल्याने पिके धोक्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.महावितरणच्या विटा उपविभागातील खानापूर तालुक्यात बेणापूर, रेणावी, भाग्यनगर यासह सहा ठिकाणी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. त्यातून उत्पादित होणारी वीज महावितरणच्या खानापूर, गार्डी, रेणावी, पारे येथील उपकेंद्राला जोडली जाणार आहे. तर आटपाडी तालुक्यातील घाणंद, पळसखेल, लिंगीवरे तसेच माडगुळे याठिकाणच्या प्रकल्पात तयार होणारी वीज खरसुंडी, लिंगीवरे, पुजारवाडी, माडगुळे या उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे. या दोन तालुक्यात सुमारे ५९ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व तडसर या दोन ठिकाणी सोलर प्रकल्प प्रस्तावित आहे. या दोन ठिकाणी १३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या विटा उपविभागात सध्या सोलार प्रकल्पातून सुमारे ७२ मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प नव्या वर्षात पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

सोलर प्रकल्प दृष्टीक्षेपात

  • सोलार प्रकल्पाच्या एक मेगावॅटसाठी ५ एकर जमिनीची आवश्यकता.
  • खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात प्रकल्पाची उभारणी सुरू.
  • ७२ मेगावॅटच्या सोलार प्रकल्पासाठी ३६० एकर जमीन अधिग्रहण.
  • प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती.
  • सरासरी ५ अश्वशक्तीचे १० हजार कृषिपंपांना एकावेळी वीजपुरवठा शक्य.

शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून विटा उपविभागात विविध ठिकाणी ७२ मेगावॅट इतका सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. शासकीय गायरान जमिनी यासाठी घेतल्या आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास अडचण येणार नाही. - विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण, विटा उपविभाग.

टॅग्स :Sangliसांगली