शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

राज्यात रेल्वेगाड्यांची सुरक्षितता इंटरलॉकिंगच्या भरवशावरच!, कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही 'कवच' प्रणाली नाही

By संतोष भिसे | Updated: June 5, 2023 16:20 IST

बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत

संतोष भिसेसांगली : महाराष्ट्रात कोकण रेल्वे वगळता अन्यत्र धावणाऱ्या शेकडो एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षिततेचा भरोसा इंटरलॉकिंग प्रणालीवरच आहे. महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही कवच प्रणाली वापरात नाही. इंटरलॉकिंग आणि सिग्नल यंत्रणा वेळोवेळी सक्षम केली जात असल्याने भीषण अपघात सहसा झालेले नाहीत.बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत आली आहे. देशभरातील ६८ हजार किलोमीटर रेल्वेमार्गापैकी अवघ्या १२०० किलोमीटर मार्गावरच ती बसवली आहे. महाराष्ट्रात तर कोठेच नाही. किंबहुना पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांच्या लोहमार्गांवरही बसवलेली नाही. कोकण रेल्वे धावू लागली, तेव्हा काही ठिकाणी बसवली होती, मात्र सध्या वापरात आहे किंवा नाही याची स्पष्टता नाही. पूर्णत: भारतीय बनावटीची कवच प्रणाली अत्यंत महागडी आहे.रेल्वेचे इंजिन आणि लोहमार्गावर बसवली जाते. दोन रेल्वे एकाच मार्गावर येतात, तेव्हा दीड किलोमीटर दूर अंतरावरच इंजिनमधील अलार्म वाजू लागतो. त्यानंतरही चालकाच्या लक्षात आले नाही, तर ब्रेकिंग यंत्रणा आपोआप कार्यान्वित होते. रेल्वे सुरक्षित अंतरावर रोखल्या जातात.प्रवाशांच्या सर्वाधिक सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या रेल्वेने सध्या तरी इंटरलॉकिंग प्रणालीवरच भरवसा ठेवला आहे. आजवर तो यशस्वीही झाला आहे. गाडी कोणत्या लाइनवर घ्यायची याचा निर्णय होताच, त्यानुसार लोहमार्ग हलवला जातो. एका लोहमार्गावरून धावणारी गाडी मुख्य लोहमार्गावर घ्यायची असेल, तेव्हा दोन्ही लोहमार्ग परस्परांना जोडले जातात. ते पूर्णत: जोडले गेल्यावरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते.महाराष्ट्रभरात बहुधा सर्वत्र ही इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. ती १०० टक्के सिद्धही झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षित धावतात. वंदे भारत, शताब्दी, राजधानी, संपर्कक्रांतीसह अन्य सर्वच लांब पल्ल्याच्या व सरासरी १२० ते १३० किलोमीटर प्रतितास अशा भन्नाट वेगाने धावणाऱ्या रेल्वे इंटरलॉकिंग प्रणालीच्या भरवशावरच बिनधास्त धावतात. प्रवासी निर्धास्तपणे रेल्वेतून प्रवास करू शकतात. बालासोरच्या दुर्घटनेनंतर मात्र कवच प्रणालीची गरज अधोरेखित झाली आहे.जयसिंगपुरात दोन गाड्या एकाच लाइनवरजयसिंगपूर स्थानकात सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी दोन प्रवासी गाड्या एकाच लाइनवर येण्याची घटना घडली होती. सायंकाळी कोल्हापुरातून मिरजेकडे येणारी पॅसेंजर आणि कोल्हापूरकडे जाणारी एक्स्प्रेस एकाचवेळी फलाट क्रमांक एकवर आल्या होत्या. दोहोंच्या इंजिनामध्ये अवघे ५०-१०० फूट अंतर राहिले होते. एक गाडी मागे घेऊन अन्य लाइनवरून सोडण्यात आली होती.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे