शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

राज्यात रेल्वेगाड्यांची सुरक्षितता इंटरलॉकिंगच्या भरवशावरच!, कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही 'कवच' प्रणाली नाही

By संतोष भिसे | Updated: June 5, 2023 16:20 IST

बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत

संतोष भिसेसांगली : महाराष्ट्रात कोकण रेल्वे वगळता अन्यत्र धावणाऱ्या शेकडो एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षिततेचा भरोसा इंटरलॉकिंग प्रणालीवरच आहे. महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही कवच प्रणाली वापरात नाही. इंटरलॉकिंग आणि सिग्नल यंत्रणा वेळोवेळी सक्षम केली जात असल्याने भीषण अपघात सहसा झालेले नाहीत.बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत आली आहे. देशभरातील ६८ हजार किलोमीटर रेल्वेमार्गापैकी अवघ्या १२०० किलोमीटर मार्गावरच ती बसवली आहे. महाराष्ट्रात तर कोठेच नाही. किंबहुना पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांच्या लोहमार्गांवरही बसवलेली नाही. कोकण रेल्वे धावू लागली, तेव्हा काही ठिकाणी बसवली होती, मात्र सध्या वापरात आहे किंवा नाही याची स्पष्टता नाही. पूर्णत: भारतीय बनावटीची कवच प्रणाली अत्यंत महागडी आहे.रेल्वेचे इंजिन आणि लोहमार्गावर बसवली जाते. दोन रेल्वे एकाच मार्गावर येतात, तेव्हा दीड किलोमीटर दूर अंतरावरच इंजिनमधील अलार्म वाजू लागतो. त्यानंतरही चालकाच्या लक्षात आले नाही, तर ब्रेकिंग यंत्रणा आपोआप कार्यान्वित होते. रेल्वे सुरक्षित अंतरावर रोखल्या जातात.प्रवाशांच्या सर्वाधिक सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या रेल्वेने सध्या तरी इंटरलॉकिंग प्रणालीवरच भरवसा ठेवला आहे. आजवर तो यशस्वीही झाला आहे. गाडी कोणत्या लाइनवर घ्यायची याचा निर्णय होताच, त्यानुसार लोहमार्ग हलवला जातो. एका लोहमार्गावरून धावणारी गाडी मुख्य लोहमार्गावर घ्यायची असेल, तेव्हा दोन्ही लोहमार्ग परस्परांना जोडले जातात. ते पूर्णत: जोडले गेल्यावरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते.महाराष्ट्रभरात बहुधा सर्वत्र ही इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. ती १०० टक्के सिद्धही झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षित धावतात. वंदे भारत, शताब्दी, राजधानी, संपर्कक्रांतीसह अन्य सर्वच लांब पल्ल्याच्या व सरासरी १२० ते १३० किलोमीटर प्रतितास अशा भन्नाट वेगाने धावणाऱ्या रेल्वे इंटरलॉकिंग प्रणालीच्या भरवशावरच बिनधास्त धावतात. प्रवासी निर्धास्तपणे रेल्वेतून प्रवास करू शकतात. बालासोरच्या दुर्घटनेनंतर मात्र कवच प्रणालीची गरज अधोरेखित झाली आहे.जयसिंगपुरात दोन गाड्या एकाच लाइनवरजयसिंगपूर स्थानकात सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी दोन प्रवासी गाड्या एकाच लाइनवर येण्याची घटना घडली होती. सायंकाळी कोल्हापुरातून मिरजेकडे येणारी पॅसेंजर आणि कोल्हापूरकडे जाणारी एक्स्प्रेस एकाचवेळी फलाट क्रमांक एकवर आल्या होत्या. दोहोंच्या इंजिनामध्ये अवघे ५०-१०० फूट अंतर राहिले होते. एक गाडी मागे घेऊन अन्य लाइनवरून सोडण्यात आली होती.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे