शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Sangli News: म्हैसाळ उपसा योजनेचे पंप येत्या शुक्रवारपासून सुरु होणार, पालकमंत्र्यांचे आदेश 

By संतोष भिसे | Updated: January 17, 2023 18:48 IST

जानेवारी उजाडताच सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईचे ढग दाटू लागले

सांगली : म्हैसाळ उपसा योजनेतून शुक्रवारपासून (दि. २०) पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जलसंपदा विभागाने त्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या.जानेवारी उजाडताच जिल्हाभरात टंचाईचे ढग दाटू लागले आहेत. विशेषत: पूर्व भागातील मिरज, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांतील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. त्याची दखल खाडे यांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी पंप सुरु करण्याच्या सूचना केल्या. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रासनकर आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पंप सुरु केले जातील. थकबाकी व चालू पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी दिले जाईल. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी तातडीने भरावी.

थकबाकी ९८ कोटींवरम्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारादरम्यान, योजनेचे आवर्तन सुरु न केल्यास सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांसह लाक्षणिक उपोषणाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील आदींनी दिला आहे. यावेळी महादेव गुंडेवाडी, विष्णू पाटील, गणेश देसाई, अविनाश पाटील, अर्जुन कदम आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना त्यांनी निवेदन दिले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी