शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Sangli News: म्हैसाळ उपसा योजनेचे पंप येत्या शुक्रवारपासून सुरु होणार, पालकमंत्र्यांचे आदेश 

By संतोष भिसे | Updated: January 17, 2023 18:48 IST

जानेवारी उजाडताच सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईचे ढग दाटू लागले

सांगली : म्हैसाळ उपसा योजनेतून शुक्रवारपासून (दि. २०) पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जलसंपदा विभागाने त्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या.जानेवारी उजाडताच जिल्हाभरात टंचाईचे ढग दाटू लागले आहेत. विशेषत: पूर्व भागातील मिरज, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांतील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. त्याची दखल खाडे यांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी पंप सुरु करण्याच्या सूचना केल्या. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रासनकर आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पंप सुरु केले जातील. थकबाकी व चालू पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी दिले जाईल. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी तातडीने भरावी.

थकबाकी ९८ कोटींवरम्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारादरम्यान, योजनेचे आवर्तन सुरु न केल्यास सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांसह लाक्षणिक उपोषणाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील आदींनी दिला आहे. यावेळी महादेव गुंडेवाडी, विष्णू पाटील, गणेश देसाई, अविनाश पाटील, अर्जुन कदम आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना त्यांनी निवेदन दिले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी