शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताप्रकार ‘इ’मधील अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळणार, महसूलमंत्र्यांनी दिला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 13:52 IST

शहरातील ३५ हजार व्यापारी आणि नागरिकांच्या साडेसातशेवर मालमत्ता पाच वर्षांपासून या अटीत अडकल्या होत्या, त्या आता मोकळ्या झाल्या आहेत.

सांगली : सत्ता प्रकार ‘इ’मधील जाचक अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे थोरात यांनी सांगितले.शहरातील ३५ हजार व्यापारी आणि नागरिकांच्या साडेसातशेवर मालमत्ता पाच वर्षांपासून या अटीत अडकल्या होत्या, त्या आता मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.

या आदेशाची प्रत थोरात यांनी पाटील यांच्याकडे सोपवली. यावेळी महेश बजाज, मुकेश वझे, युवराज पाटील, अमित खोकले, रवी खराडे, ॲड. सूर्यजित चव्हाण उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, वखारभाग, टिंबर एरिया, ओव्हरसियर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नर, रतनशीनगर, गावभाग येथील मिळकती सत्ता प्रकार ‘इ’मधील जाचक अटीत अडकल्या होत्या. नगरभूमापन विभागाच्या निर्णयामुळे व्यापारी आणि नागरिकांना त्या हस्तांतरित करता येत नव्हत्या. त्यांची खरेदी - विक्री, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, बँक गहाणखत करता येत नव्हते. त्यामुळे त्या मुक्त व्हाव्यात, यासाठी थोरात यांच्याकडे प्रत्यक्ष शिष्टमंडळ घेऊन प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला. आता महसूल विभागाने प्रस्तावास मान्यता दिली आहे.

ते म्हणाले की, सांगली शहरात ५ सप्टेंबर १९१४ व २४ ऑक्टोबर १९१४ च्या जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या प्लॉटवर ज्यांनी अटी व शर्तीनुसार बांधकाम करून इमारत बांधली आहे, त्यांना परवानगीशिवाय मिळकत हस्तांतरणाचे अधिकार मिळाले आहेत. ट्रेडर्स साइट्सच्या ज्या मिळकती भुईभाडे आकारून मालकी हक्काने दिल्या आहेत, त्यातील इ सत्ताप्रकारच्या मिळकतीच्या हस्तांतरणास शासन परवानगीची आवश्यकता नाही.

शासन निर्णय असा :

तत्कालीन सांगली सरकारने ज्या मिळकती लाभार्थ्यांच्या जमिनी घेऊन त्या बदल्यात अन्य जमिनी-भूखंड प्रदान केल्या आहेत. त्यावरील ‘इ’ सत्ताप्रकारची नोंद कमी होईल. ज्या मिळकती एकरकमी किंमत घेऊन लाभार्थ्यांना प्रदान केल्या आहेत, त्यावरील ‘एफ’ सत्ताप्रकारची नोंद कमी होईल. ज्या मिळकती भाडे आकारून प्रदान केल्या आहेत आणि त्यासाठी किमान ३० वर्षे भाडे दिले असेल, त्यावरील ‘इ’ सत्ताप्रकारची नोंद कमी होईल. या सर्व मालमत्तांवर ‘ए’ सत्ताप्रकार अशी नोंद होईल. त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख अधीक्षकांनी दोन महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. त्यांनी महिन्यात निर्णय घ्यावा. वेळेत निर्णय न झाल्यास विभागीय आयुक्त निर्णय घेतील.

टॅग्स :Sangliसांगली