शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील द्वेषाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक, तुषार गांधी यांचे परखड मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:13 IST

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? 

विटा : गेल्या ३० वर्षांपासून पद्धतशीरपणे जातीधर्माच्या नावाखाली विभागले जात होते. पण, आता ती प्रक्रिया आणखी पुढे गेली आहे. त्याची दाहकता वाढली असून, माणसांची मने विभागली जात आहेत. पण, सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले असून, ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू व जेष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी तुषार गांधी यांना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. बाबूराव गुरव उपस्थित होते.तुषार गांधी म्हणाले, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी बांगलादेशात हिंदूंवर मुस्लीम लोक अत्याचार करत आहेत, असा खोटा प्रचार करत आहेत, असाच काहीसा प्रकार विशाळगड आणि धारावी याठिकाणीही घडत असल्याचे सांगितले गेले.

बांगलादेशात क्रांती झाली. सत्तापालट झाला आहे. अराजकता माजली आहे, परंतु आपल्या देशामध्ये तेथील मुस्लीम हिंदूंना मारत आहेत, असा खोटा व जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. यावेळी संपतराव पवार, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील उपस्थित होते.

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? राजकारणाचे संदर्भ बदलले आहे. चारचाकी गाड्यांभोवती सुरक्षाकडे, महागडे गॉगल व कपडे वापरतात आणि म्हणतात ‘झोला लेके आये थे, झोला लेके जायेंगे’, पण कितीचा झोला आणला होता, कितीचा झोला घेऊन चालला आहे, हे एकदा कळू द्या, असा टोलाही तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

‘भारत जाेडाे’ अभियानज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी महात्मा गांधीजींनी भारत जोडो अभियान राबविले होते. त्यानंतर त्यांचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील अशा प्रकारे काही वर्षांपूर्वी अभियान राबविले. देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, आज राहुल गांधीदेखील त्याच प्रेरणेने भारत जोडो अभियान राबवत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली