शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

देशातील द्वेषाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक, तुषार गांधी यांचे परखड मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:13 IST

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? 

विटा : गेल्या ३० वर्षांपासून पद्धतशीरपणे जातीधर्माच्या नावाखाली विभागले जात होते. पण, आता ती प्रक्रिया आणखी पुढे गेली आहे. त्याची दाहकता वाढली असून, माणसांची मने विभागली जात आहेत. पण, सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले असून, ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू व जेष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी तुषार गांधी यांना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. बाबूराव गुरव उपस्थित होते.तुषार गांधी म्हणाले, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी बांगलादेशात हिंदूंवर मुस्लीम लोक अत्याचार करत आहेत, असा खोटा प्रचार करत आहेत, असाच काहीसा प्रकार विशाळगड आणि धारावी याठिकाणीही घडत असल्याचे सांगितले गेले.

बांगलादेशात क्रांती झाली. सत्तापालट झाला आहे. अराजकता माजली आहे, परंतु आपल्या देशामध्ये तेथील मुस्लीम हिंदूंना मारत आहेत, असा खोटा व जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. यावेळी संपतराव पवार, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील उपस्थित होते.

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? राजकारणाचे संदर्भ बदलले आहे. चारचाकी गाड्यांभोवती सुरक्षाकडे, महागडे गॉगल व कपडे वापरतात आणि म्हणतात ‘झोला लेके आये थे, झोला लेके जायेंगे’, पण कितीचा झोला आणला होता, कितीचा झोला घेऊन चालला आहे, हे एकदा कळू द्या, असा टोलाही तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

‘भारत जाेडाे’ अभियानज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी महात्मा गांधीजींनी भारत जोडो अभियान राबविले होते. त्यानंतर त्यांचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील अशा प्रकारे काही वर्षांपूर्वी अभियान राबविले. देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, आज राहुल गांधीदेखील त्याच प्रेरणेने भारत जोडो अभियान राबवत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली