शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
4
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
5
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
6
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
7
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
8
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
9
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
10
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
11
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
12
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
13
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
14
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
15
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
16
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
17
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
18
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
19
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
20
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले

देशातील द्वेषाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक, तुषार गांधी यांचे परखड मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:13 IST

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? 

विटा : गेल्या ३० वर्षांपासून पद्धतशीरपणे जातीधर्माच्या नावाखाली विभागले जात होते. पण, आता ती प्रक्रिया आणखी पुढे गेली आहे. त्याची दाहकता वाढली असून, माणसांची मने विभागली जात आहेत. पण, सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले असून, ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू व जेष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी तुषार गांधी यांना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. बाबूराव गुरव उपस्थित होते.तुषार गांधी म्हणाले, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी बांगलादेशात हिंदूंवर मुस्लीम लोक अत्याचार करत आहेत, असा खोटा प्रचार करत आहेत, असाच काहीसा प्रकार विशाळगड आणि धारावी याठिकाणीही घडत असल्याचे सांगितले गेले.

बांगलादेशात क्रांती झाली. सत्तापालट झाला आहे. अराजकता माजली आहे, परंतु आपल्या देशामध्ये तेथील मुस्लीम हिंदूंना मारत आहेत, असा खोटा व जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. यावेळी संपतराव पवार, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील उपस्थित होते.

नेमका कितीचा झोला घेऊन चालला? राजकारणाचे संदर्भ बदलले आहे. चारचाकी गाड्यांभोवती सुरक्षाकडे, महागडे गॉगल व कपडे वापरतात आणि म्हणतात ‘झोला लेके आये थे, झोला लेके जायेंगे’, पण कितीचा झोला आणला होता, कितीचा झोला घेऊन चालला आहे, हे एकदा कळू द्या, असा टोलाही तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

‘भारत जाेडाे’ अभियानज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी महात्मा गांधीजींनी भारत जोडो अभियान राबविले होते. त्यानंतर त्यांचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील अशा प्रकारे काही वर्षांपूर्वी अभियान राबविले. देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, आज राहुल गांधीदेखील त्याच प्रेरणेने भारत जोडो अभियान राबवत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली