शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरच्या ‘आका’ एजन्सी मोकाट; जीव गेल्यावर जाग येणार का?

By अविनाश कोळी | Updated: April 28, 2025 19:25 IST

कारवाईची औपचारिकता नको : घरगुती सिलिंडरचा प्रवास पुरवठा विभाग शोधणार का?

अविनाश कोळीसांगली : सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सवर जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी ती औपचारिकता ठरायला नको. अधिकृत ग्राहकांसाठीचे सिलिंडर काही गॅस एजन्सींमार्फत या गॅसमाफियांपर्यंत पुरविले जात आहेत. याची चौकशी पुरवठा विभाग व पोलिस करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सच्या बाजारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांमार्फत अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, या अड्डेचालकांचा ‘आका’ म्हणून कार्यरत असणाऱ्या गॅस एजन्सी या कारवाईतून मोकाट आहेत. ग्राहकांसाठी कंपन्यांनी दिलेले सिलिंडर काळ्या बाजारात कसे विकले जातात, याची चौकशीही केली जात नाही. उत्पादक कंपन्यांनी याप्रश्नी सोयिस्कर मौन बाळगले आहे. मात्र, पुरवठा विभाग व पोलिसांकडून तरी याची पाळेमुळे खणली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार ते पाच गॅस एजन्सींचा हातसिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार ते पाच एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात. बेमालूमपणे ही यंत्रणा कार्यान्वित असते. अड्डे उद्ध्वस्त झाले तरी एजन्सीचालकांना कोणतीही झळ पोहोचत नाही.

मुळावर घाव घालायला हवाकारवाई कितीही झाल्या तरी एजन्सीचालकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत नवनव्या जागा शोधून अड्डेचालक पुन्हा हा दुर्घटनांना निमंत्रण देणारा बाजार भरविणारच. एजन्सीवर कारवाई झाल्यास अड्डेचालकांचा सिलिंडर पुरवठा बंद होईल आणि आपोआप हा बाजारही कायमचा बंद होऊ शकतो. मात्र, त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी कधीही धाडस दाखविले नाही.

नागरी वस्त्यांसह निर्जन ठिकाणी अड्डेमिरज, सांगली व कुपवाड परिसरात भरवस्त्यांमध्ये हे गॅस बॉम्ब पेरले जातात. काही माफियांनी उपनगरांसह निर्जन स्थळांवर किंवा शेतीच्या जागेत असे अड्डे उभारले आहेत, हे कारवाईतून स्पष्ट झाले.

जीव गेल्यावर जाग येणार का?मिरजेत वर्षभरापूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला होता. वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहेत. तरीही उत्पादक कंपन्या त्यांचे सिलिंडर सापडले म्हणून चौकशी करत नाहीत. पुरवठा विभाग, पोलिसांकडून केवळ छाप्याची कारवाई होते. सिलिंडरच्या पुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत ते पोहोचत नाहीत. अशा प्रकारच्या दुर्घटनेत लोकांचा जीव गेल्यानंतर या यंत्रणांना जाग येणार का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडर