शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरच्या ‘आका’ एजन्सी मोकाट; जीव गेल्यावर जाग येणार का?

By अविनाश कोळी | Updated: April 28, 2025 19:25 IST

कारवाईची औपचारिकता नको : घरगुती सिलिंडरचा प्रवास पुरवठा विभाग शोधणार का?

अविनाश कोळीसांगली : सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सवर जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी ती औपचारिकता ठरायला नको. अधिकृत ग्राहकांसाठीचे सिलिंडर काही गॅस एजन्सींमार्फत या गॅसमाफियांपर्यंत पुरविले जात आहेत. याची चौकशी पुरवठा विभाग व पोलिस करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सच्या बाजारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांमार्फत अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, या अड्डेचालकांचा ‘आका’ म्हणून कार्यरत असणाऱ्या गॅस एजन्सी या कारवाईतून मोकाट आहेत. ग्राहकांसाठी कंपन्यांनी दिलेले सिलिंडर काळ्या बाजारात कसे विकले जातात, याची चौकशीही केली जात नाही. उत्पादक कंपन्यांनी याप्रश्नी सोयिस्कर मौन बाळगले आहे. मात्र, पुरवठा विभाग व पोलिसांकडून तरी याची पाळेमुळे खणली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार ते पाच गॅस एजन्सींचा हातसिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार ते पाच एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात. बेमालूमपणे ही यंत्रणा कार्यान्वित असते. अड्डे उद्ध्वस्त झाले तरी एजन्सीचालकांना कोणतीही झळ पोहोचत नाही.

मुळावर घाव घालायला हवाकारवाई कितीही झाल्या तरी एजन्सीचालकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत नवनव्या जागा शोधून अड्डेचालक पुन्हा हा दुर्घटनांना निमंत्रण देणारा बाजार भरविणारच. एजन्सीवर कारवाई झाल्यास अड्डेचालकांचा सिलिंडर पुरवठा बंद होईल आणि आपोआप हा बाजारही कायमचा बंद होऊ शकतो. मात्र, त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी कधीही धाडस दाखविले नाही.

नागरी वस्त्यांसह निर्जन ठिकाणी अड्डेमिरज, सांगली व कुपवाड परिसरात भरवस्त्यांमध्ये हे गॅस बॉम्ब पेरले जातात. काही माफियांनी उपनगरांसह निर्जन स्थळांवर किंवा शेतीच्या जागेत असे अड्डे उभारले आहेत, हे कारवाईतून स्पष्ट झाले.

जीव गेल्यावर जाग येणार का?मिरजेत वर्षभरापूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला होता. वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहेत. तरीही उत्पादक कंपन्या त्यांचे सिलिंडर सापडले म्हणून चौकशी करत नाहीत. पुरवठा विभाग, पोलिसांकडून केवळ छाप्याची कारवाई होते. सिलिंडरच्या पुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत ते पोहोचत नाहीत. अशा प्रकारच्या दुर्घटनेत लोकांचा जीव गेल्यानंतर या यंत्रणांना जाग येणार का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडर