शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नवरा मेला अन् बायकोला अनुदान आले, पण निम्मे दलालानेच गिळले, कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:21 IST

महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १५० कोटींचा भ्रष्टाचार

सांगली : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. दोन वर्षांपूर्वी मृत झालेल्या बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नीच्या खात्यावर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून दोन लाखांचे अनुदान वर्ग झाले, मात्र अवघ्या अर्ध्या तासातच दलालाच्या खात्यावर निम्मे पैसे निघून गेले. कागदपत्रे व अन्य पुराव्यांसह याबाबतची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्यानंतर मंडळात खळबळ निर्माण झाली आहे.तांबवे (ता. वाळवा) येथील एका नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. एका दलालाने त्याच्या कुटुंबीयांना गाठले. त्यांना पैसे मिळवून देण्याची ग्वाही त्याने दिली. कुटुंबीयांनी दलालावर विश्वास ठेवत सर्व कागदांवर सह्या केल्या. दोन वर्षांनंतर हे अनुदान अखेर मृत बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नीच्या खात्यावर जमा झाले.दुपारी बाराला दोन लाख रुपये नियमाप्रमाणे जमा झाले, मात्र लगेचच अर्ध्या तासात आरटीजीएसद्वारे त्यातील एक लाख रुपये दलालाच्या खात्यावर वर्ग झाले.  संबंधित लाभार्थीच्या खात्यावरील रकमांच्या नोंदी, व अन्य पुरावे गोळा करुन याबाबतची रितसर तक्रार कामगार कार्यालयाकडे करण्यात आली आहे.अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चाअनुदान हडप करणाऱ्यांवर व तांबवेतील प्रकरणावर तातडीने कारवाई न झाल्यास कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल. कामगार आयुक्त कार्यालयालाही टाळे ठोकू, असा इशारा खराडे यांनी दिला आहे.‘सलीम’ कोण आहे?वाळवा तालुक्यातील सलीम नावाच्या एजंटाविषयी तक्रार करण्यात आली आहे. या एजंटाची कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर मैत्री आहे. त्यातूनच त्याने आजवर बांधकाम कामगारांच्या विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळवून दिला, मात्र तो सामाजिक कार्य म्हणून नव्हे तर उद्योग म्हणून. त्यामुळे यानिमित्ताने त्याचे कारनामे सध्या चर्चेत आले आहेत.१५० कोटींचा भ्रष्टाचारअशाप्रकारच्या अनेक तक्रारी वाळवा तालुक्यातून महामंडळाकडे सतत येत आहेत. त्याची दखल घेतली न गेल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पुराव्यासह महामंडळाकडे तक्रार केली. महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १५० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकारकामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच लाभार्थींचा निधी हडप करण्याचे प्रकार खुलेआम सुरू असल्याने स्वाभिमानी संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून पुराव्यांच्या आधारे संबंधित दलालावर गुन्हा दाखल करून त्यांना साहाय्य करणाऱ्या मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी खराडे यांनी केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगली