शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पक्षापेक्षा महत्त्व गटाला, त्यामुळेच काँग्रेस तळाला

By अविनाश कोळी | Updated: April 10, 2023 17:22 IST

पक्षापेक्षा गटांना महत्त्व दिले गेल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

अविनाश कोळीसांगली : चारच महिन्यापूर्वी ‘हात से हात जोडो’ अभियानातून गटबाजी संपवून एकसंध होण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला होता अन् बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांची साथ सोडत गटांचा झेंडा फडकविण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षापेक्षा गटांना महत्त्व दिल्याने काँग्रेस जिल्ह्यात तळाला जात आहे, याचे भानही नेत्यांना राहिलेले नाही.सांगलीत नुकतीच काँग्रेसमधील वसंतदादा गटाची बैठक पार पडली. गटावर अन्याय होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. महाविकास आघाडीतील ही कुचंबणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना जाणवली नव्हती, मात्र बाजार समितीतच ती जाणवली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविण्याची वेळ वसंतदादा गटावर आली त्यावेळी गटाच्या अस्तित्वाला धक्का पोहाेचला नव्हता, मात्र तीनच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना या प्रश्नांनी सध्या हैराण केले आहे.पक्षापेक्षा गटांना महत्त्व दिले गेल्याने काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळला आहे. गटबाजीचा हा विषय केवळ जिल्ह्यापुरता मर्यादीत राहिला नाही. प्रदेशाध्यक्षांना अनेकदा याबाबत कानउघाडणीही करावी लागली आहे. तरीही काँग्रेसमधील गटबाजीचा प्रश्न अद्याप संपलेला नाही.पक्षाचा आदेश म्हणून ‘हात से हात जोडो’ अभियान राबविले गेले. त्यात वसंतदादा गटाचे प्रमुख विशाल पाटील यांनीच गटबाजी संपली पाहिजे, असा मुद्दा मांडला; पण आता तेच स्वतंत्र गट करून पुढे जाऊ पाहात आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्ते गोंधळले आहेत. एका बाजार समितीत ही अवस्था असेल तर विधानसभा व लोकसभेचा शिवधनुष्य येथील काँग्रेस कशी पेलणार, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

वसंतदादा गटाकडे काय नाही?सध्या वसंतदादा गटाचे नेते विशाल पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद आहे. शैलजाभाभी पाटील यांच्याकडे महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद, जयश्रीताई पाटील यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व, जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद आहे. वसंतदादा कारखान्याची धुरा तसेच जिल्हा बँकेतील संचालकपदही विशाल पाटील यांच्याकडे आहे.

विधानसभा, लोकसभेला काय झाले?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधीलच एका गटाने घात केल्याचा उल्लेख राज्यातील काही नेत्यांनी सांगलीत येऊन केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे उसनवारी करावी लागली. पुढील निवडणुकीत मोठी आव्हाने असताना काँग्रेस गटबाजीत रममाण झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस