शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

फुटीर आमदारांची मर्जी संभाळण्यातच सरकारची दमछाक, काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांची टीका

By अशोक डोंबाळे | Updated: January 10, 2024 19:05 IST

दुष्काळी योजनांसाठी जिल्ह्याला ५०० कोटी द्यावेत

सांगली : राज्य सरकारला सत्ता टिकवण्यात रस असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातून फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्यातच राज्य सरकारमधील मंत्र्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना बेदखल केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना केली.जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतील उपयोजनांसाठी सरकारने सांगली जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचे संकट भेडसावत असताना राज्य सरकार मात्र सत्ता टिकविण्यात गुंतले आहे. सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ता टिकवण्यामध्ये रस आहे. फुटून गेलेल्या आमदारांना सांभाळण्यांमध्ये सरकारची मर्जी असल्याचे दिसते.सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जानेवारी महिन्यात बहुतांश तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, अशी परिस्थिती असेल तर मार्च आणि एप्रिलमध्ये यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती दिसते. जिल्हा प्रशासन आणि सरकारने याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नियोजन समितीतून वाढीव निधी देण्याची गरज आहे. जिल्ह्यासाठी किमान ५०० कोटी रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणी सरकारकडे पालकमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे.

द्राक्षबागांचे मोठे नुकसान-अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या रोगामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने निधी देण्याची गरज आहे.-दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरज आहे. कोयनेतून पाणी सोडण्यासाठी वारंवार विनंती करावी लागत असल्याची बाब दुर्दैवी आहे, त्याचे नियोजन करावे. -महावितरण कंपनीचा गलथान कारभार प्रश्न उपस्थित करून डॉ. कदम यांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

नियोजनच्या अखर्चित निधीची शोकांतिकाजिल्हा नियोजन समितीचा चालू आर्थिक वर्ष संपत आले तरीही कामांना मंजुरी नाही, ही जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचा मुद्दा डॉ. विश्वजित कदम यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. बहुतांशी कामांची वर्क ऑर्डर आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदम