शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

फुटीर आमदारांची मर्जी संभाळण्यातच सरकारची दमछाक, काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांची टीका

By अशोक डोंबाळे | Updated: January 10, 2024 19:05 IST

दुष्काळी योजनांसाठी जिल्ह्याला ५०० कोटी द्यावेत

सांगली : राज्य सरकारला सत्ता टिकवण्यात रस असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातून फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्यातच राज्य सरकारमधील मंत्र्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना बेदखल केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना केली.जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतील उपयोजनांसाठी सरकारने सांगली जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचे संकट भेडसावत असताना राज्य सरकार मात्र सत्ता टिकविण्यात गुंतले आहे. सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ता टिकवण्यामध्ये रस आहे. फुटून गेलेल्या आमदारांना सांभाळण्यांमध्ये सरकारची मर्जी असल्याचे दिसते.सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जानेवारी महिन्यात बहुतांश तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, अशी परिस्थिती असेल तर मार्च आणि एप्रिलमध्ये यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती दिसते. जिल्हा प्रशासन आणि सरकारने याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नियोजन समितीतून वाढीव निधी देण्याची गरज आहे. जिल्ह्यासाठी किमान ५०० कोटी रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणी सरकारकडे पालकमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे.

द्राक्षबागांचे मोठे नुकसान-अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या रोगामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने निधी देण्याची गरज आहे.-दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरज आहे. कोयनेतून पाणी सोडण्यासाठी वारंवार विनंती करावी लागत असल्याची बाब दुर्दैवी आहे, त्याचे नियोजन करावे. -महावितरण कंपनीचा गलथान कारभार प्रश्न उपस्थित करून डॉ. कदम यांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

नियोजनच्या अखर्चित निधीची शोकांतिकाजिल्हा नियोजन समितीचा चालू आर्थिक वर्ष संपत आले तरीही कामांना मंजुरी नाही, ही जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचा मुद्दा डॉ. विश्वजित कदम यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. बहुतांशी कामांची वर्क ऑर्डर आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदम