शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

बेदाणाच्या पैशावरून संघर्ष वाढला; सांगली, तासगाव अडत संघटनांत फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:54 IST

विक्री झालेल्या बेदाण्याचे तीन महिने पैसे नाहीत : काही अडत्यांनी ५१ दिवसांत पैशाची मागणी केल्यावरून वाद

सांगली : तासगाव, सांगली आणि पंढरपूर येथे निघालेल्या बेदाणा सौद्यातून बेदाणा खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी तीन महिने झाले तरीही पैसे दिले नाहीत. यावरून तासगाव आणि सांगली अडत संघटनेमध्ये फूट निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणच्या अडत्यांनी स्वतंत्र संघटना काढल्यामुळे काही अडत्यांची पंचायत झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तासगावमध्ये अडत्यांच्या बैठकीत एका अडत्याने ५१ दिवसांनी व्यापाऱ्यांनी पैसे दिले तर चालेल असे म्हटल्यावरून आणखी वाद पेटला आहे.बेदाण्याची २२ हजार गाड्यांची आवक झाली असून मागील हंगामातील पाच हजार गाडी बेदाणा शिल्लक आहे. बेदाण्याचे उत्पादन जवळपास ५० हजार टनांनी घटले आहे. तरीही जिल्ह्यातील शीतगृहे बेदाण्याने फूल आहेत. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बेदाणे खरेदी करूनही तो उचलला नाही. खरेदी केलेल्या बेदाण्याचेही अडत्यांना तीन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. म्हणून अडते आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. तासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी तासगाव अडत संघटनेची बैठक झाली.या बैठकीत एकजण अडत्या आणि व्यापारी अशी दोन्ही काम करीत आहे. या अडत्याने बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी ५१ दिवसांत बेदाण्याचे पैसे दिले तर चालतील, अशी भूमिका मांडली. यावरून अन्य सर्वच अडत्यांनी त्यांच्या भूमिकेला जोरदार विरोध केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांनी ४० दिवसांत पैसे दिलेच पाहिजे, अशी अडत्यांनी भूमिका मांडली. दोन अडत संघटनांमधील मतभेदात अन्य अडत्यांची ससेहोलपट होत, असा आरोपही काही अडत्यांनी केला.

बेदाणा असोसिएशनची नोंदणीच नाहीतासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनची बऱ्याच वर्षांपूर्वी स्थापना केली आहे; पण या असोसिएशनची सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीच नाही. नोंदणीचा गेल्या पाच वर्षांपासून गोंधळ सुरू आहे; पण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही मार्ग काढलेला नाही. म्हणूनच अडत्यांनी तासगाव आणि सांगली अशा दोन अडत संघटना वेगवेगळ्या केल्या आहेत.

महिन्याला कर भरावा लागणारसांगली, तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन व बेदाणा आडते, खरेदीदारांच्या मागणीवरून दि. १ जूनपासून बाजार समितीमार्फत आकारला जाणारा अधिशुल्क हा खरेदीदाराकडून वसूल न करता अडत्यांनी भरायचा आहे. बेदाणा खरेदी बिलामध्ये अधिशुल्क (शेकडा ०.२५ पैसे) व त्या रकमेवरील जी.एस.टी. करासहित वसूल करून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत बाजार समितीकडे अडत्याने जमा करणे गरजेचे आहे. या परिपत्रकानुसार सर्व कार्यवाही करण्याची जबाबदारी अडते व खरेदीदारांची आहे, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.

टॅग्स :Sangliसांगली