शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

सांगलीतील दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे युवा नेत्यांपुढे आव्हान

By हणमंत पाटील | Updated: February 7, 2024 17:05 IST

हणमंत पाटील सांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला ...

हणमंत पाटीलसांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारच्या माध्यमातून शिराळ्यातील बिलाशी गाव स्वतंत्र होते. याच स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीमुळे या भागातील भूमिपूत्र यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे केंद्रात जाऊन त्यांनी संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून यशस्वी राजकीय कारकिर्द केली.

सांगली जिल्ह्याच्या याच मातीतून राजकीय वारसा घेऊन माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांनी आपले आयुष्य समर्पित केले. हाच राजकीय वारसा पुढे शिराळा तालुक्यातील कोकरुडचे शिवाजीराव देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य ते विधान परिषदेच्या सभापतीपदाची हॅट्रिक केली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून नक्षलवादी गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन, तसेच ग्रामविकासमंत्री झाल्यानंतर स्वच्छ्ता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सांगलीची छाप कायम ठेवली. त्यावेळी आर. आर. आबा यांच्या सांगलीचे आम्ही हे सांगताना प्रत्येक सांगलीकराचा उर भरून येत होता.पुढे वसंतदादा यांचे नातू मंत्री मदन पाटील यांनीही कार्यकर्त्यांचे संघटन करून राज्याच्या राजकारणावर सांगलीचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र, आर. आर. आबा आणि मदन भाऊ या दोन्ही नेत्यांचे २०१५ साली आकली निधनाने जिल्ह्याची कधीही भरून न येणारी हानी झाली.आबा आणि भाऊंच्या जाण्याने सावरणाऱ्या सांगलीला आणखी एक झटका बसला २०१८ साली. दिलदार व उमद्या मनाचे नेते डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जाण्याने. साहेब कधीही मतदार संघापुरता विचार करणारे नेते नव्हते. त्यांनी भिलवडी, वांगी, कडेगांव, कडेपूर व पलूस परिसराचा कायापालट केलाच. पण त्याही पलिकडे जाऊन त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे, मुंबई, दिल्ली ते परदेशात सांगलीकराना संधी मिळवून दिली. आबा आणि साहेब यांनी रात्रीचा दिवस करून राजकारणातील मंत्रीपदाच्या माध्यमातून सांगलीला समृध्द करण्यासाठी मोठे योगदान दिले. समर्पित भावनेने जनसेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे आकाली निधन झाले. त्यामुळे सांगलीतील जनतेची नाळ अन् सर्वसामान्य जनतेचे भान असलेल्या नेत्याची मोठी पोकळी निर्माण झाली. तोपर्यंतच्या राज्याच्या राजकारणात राजकीय पक्ष वेगळे असलेतरी सांगलीचे जयंतराव पाटील यांच्यासह किमान तीन ते चार मंत्री सांगलीचे हमखास असायचे.

गेल्या सहा दशकापासून सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा कायम राहिला. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे काही अपवाद वगळता बहुतेक नेत्यांना राजकीय कौटुंबिक वारसा नव्हता. प्रत्येक नेता गावचा सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि पुढे स्वकर्तृत्वावर मंत्री ते मुख्यमंत्री झाले होते. याच जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या साखळीतील आणखी एक रत्न ३१ जानेवारीला निखले. ते म्हणजे दुष्काळासाठी वरदान ठरणारी, पण दिवास्वप्न वाटणारी टेंभूची योजना वास्तवात आणणारे अनिलभाऊ बाबर.विटयाजवळील गार्डी गावचे सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते सभापती, नागेवाडी येथील यशवंतराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष असा प्रदीर्घ अनुभव असलेले. ग्रामीण भागाची नाळ माहिती असलेले जिल्ह्यातील आमदार. विधानसभेतील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असतानाही त्यांना अनेकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिली. आता त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य जनतेसह सांगली जिल्ह्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा ते शेवटचे नेते अनिल बाबर यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आजच्या तरुण पिढीतील युवा नेत्यांपुढे आहे. त्यांनी केवळ राजकीय वारसादार न होता, या दिग्गज नेत्याचा सामाजिक कार्यासाठीचा त्याग आणि समर्पित भाव हे गुण घेतले तर सांगली जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा करुया.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण