शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:52 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भले-भले देव पाण्यात घालत होते, तिथे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या सर्व प्रस्थापित नेत्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे पाठ फिरवली आहे. कॉँगे्रसकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी, तर राष्टÑवादीकडे रावसाहेब पाटील आणि हणमंतराव देशमुख यांनी तिकीट मागितले आहे.हा विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्षे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीकडेच होता. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे खूप प्रयत्न करीत होते. आता बाबर शिवसेनेत आहेत, तर राजेंद्रअण्णा भाजपात गेले. राष्टÑवादीचे तिकीट मिळविण्यासाठी ही मंडळी निवडणुकीअगोदरच मोर्चे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकरी मेळावे घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन करायची. आपणच कसे पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवायची. तिकीट मिळाले की विजय पक्का, असेच तेव्हा समीकरण होते. राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याची दिशा या मंडळींनी वेळीच ओळखली आहे. त्यामुळे बुडत्या जहाजात कशाला बसा, म्हणत त्यांनी पक्षांतर केल्याने, या राजकीय पक्षांची तालुक्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सत्ता असताना या पक्षांनीही आटपाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉँग्रेसचे. पण सध्या त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी ते कॉँग्रेसकडून निवडणूक लढणार का नाही, ते ठरणार आहे. दि. ६ जुलैपर्यंत जे कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचे होते. पण पाटील यांनी अर्ज केलेला नाही. सध्या ते आणि त्यांचे पुत्र आटपाडी तालुक्यातही सक्रिय झाले आहेत. ते आमदार असताना दर शुक्रवारी आटपाडी पंचायत समितीत यायचे. त्यातुलनेत गेल्या ५ वर्षात त्यांच्या तालुक्यात भेटी झाल्या नाहीत. पण सध्या तरी त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे रावसाहेब पाटील या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फर्डे वक्ते आहेत. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसेच हणमंतराव देशमुख सध्या राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.दिघंची गटात त्यांचा दबदबा आहे. भाजपची लाट असताना त्यांनी पं. स. सदस्य निवडून आणला आहे. कॉँग्रेसकडून तिकीट मागणारे सध्या राजाराम देशमुख हे एकमेव इच्छुक आहेत. सार्वजनिक विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम ते करतात. गलाई व्यावसायिकांचे ते नेते आहेत. कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संंबंध आहेत. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे असले तरी, ही मंडळी प्रस्थापितांशी कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.‘वंचित’ दिशा ठरविणार?राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित आघाडीची युती झाली, तर पुन्हा वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागा वाटपात कुणाला सुटणार, उर्वरित बंडखोरी करणार काय, का पाठिंबा देणार यावर, तसेच सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरच चित्र स्पष्ट होईल.