शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
3
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
4
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
5
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
6
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
7
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
8
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
9
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
10
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
12
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
13
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
14
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
15
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
16
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
17
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
18
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
19
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
20
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:52 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भले-भले देव पाण्यात घालत होते, तिथे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या सर्व प्रस्थापित नेत्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे पाठ फिरवली आहे. कॉँगे्रसकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी, तर राष्टÑवादीकडे रावसाहेब पाटील आणि हणमंतराव देशमुख यांनी तिकीट मागितले आहे.हा विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्षे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीकडेच होता. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे खूप प्रयत्न करीत होते. आता बाबर शिवसेनेत आहेत, तर राजेंद्रअण्णा भाजपात गेले. राष्टÑवादीचे तिकीट मिळविण्यासाठी ही मंडळी निवडणुकीअगोदरच मोर्चे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकरी मेळावे घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन करायची. आपणच कसे पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवायची. तिकीट मिळाले की विजय पक्का, असेच तेव्हा समीकरण होते. राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याची दिशा या मंडळींनी वेळीच ओळखली आहे. त्यामुळे बुडत्या जहाजात कशाला बसा, म्हणत त्यांनी पक्षांतर केल्याने, या राजकीय पक्षांची तालुक्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सत्ता असताना या पक्षांनीही आटपाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉँग्रेसचे. पण सध्या त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी ते कॉँग्रेसकडून निवडणूक लढणार का नाही, ते ठरणार आहे. दि. ६ जुलैपर्यंत जे कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचे होते. पण पाटील यांनी अर्ज केलेला नाही. सध्या ते आणि त्यांचे पुत्र आटपाडी तालुक्यातही सक्रिय झाले आहेत. ते आमदार असताना दर शुक्रवारी आटपाडी पंचायत समितीत यायचे. त्यातुलनेत गेल्या ५ वर्षात त्यांच्या तालुक्यात भेटी झाल्या नाहीत. पण सध्या तरी त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे रावसाहेब पाटील या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फर्डे वक्ते आहेत. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसेच हणमंतराव देशमुख सध्या राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.दिघंची गटात त्यांचा दबदबा आहे. भाजपची लाट असताना त्यांनी पं. स. सदस्य निवडून आणला आहे. कॉँग्रेसकडून तिकीट मागणारे सध्या राजाराम देशमुख हे एकमेव इच्छुक आहेत. सार्वजनिक विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम ते करतात. गलाई व्यावसायिकांचे ते नेते आहेत. कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संंबंध आहेत. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे असले तरी, ही मंडळी प्रस्थापितांशी कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.‘वंचित’ दिशा ठरविणार?राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित आघाडीची युती झाली, तर पुन्हा वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागा वाटपात कुणाला सुटणार, उर्वरित बंडखोरी करणार काय, का पाठिंबा देणार यावर, तसेच सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरच चित्र स्पष्ट होईल.