शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील युतीतही तणाव : संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:53 IST

भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे. राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती.

ठळक मुद्देभाजपने पाच वर्षे लबाडी केल्याचा शिवसेनेचा आरोप; भाजपच्या गोटात अस्वस्थता

अविनाश कोळी ।सांगली : राज्यातील भाजप-शिवसेना युतीत असलेला तणाव सांगली जिल्ह्यात निवडणुकीपासूनच जाणवत आहे. भाजपच्या हातातील सत्तेच्या दोऱ्या सुटत असल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे, तर कॉँग्रेस व राष्टÑवादीमध्येही आनंदाची लकेर उमटली आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.राज्यातील सरकार स्थापनेच्या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होत असून, त्यामुळे समीकरणेही बदलत आहेत. राज्यातील सरकार स्थापनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे.

राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती. त्यामुळे भाजपच्या नावाने बोटे मोडणाºया शिवसैनिकांना भाजपच्या एकाकीपणामुळे आनंद होत आहे.

युतीअंतर्गत जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे व चार जागा शिवसेनेकडे गेल्या होत्या. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला खानापूर, पलूस-कडेगाव, इस्लामपूर आणि तासगाव हे मतदारसंघ आले होते. आमदार अनिल बाबर यांनी गतवेळेप्रमाणे यंदाही विजय मिळविला असला तरी, अन्य तीन जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला नाही.

भाजपने इस्लामपूरमध्ये बंडखोर उमेदवार उभा केला तर, पलूस-कडेगावमध्ये नोटाला मतदान केल्याबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी राग व्यक्त करीत आहेत. शिवसेना या जखमा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वीही भाजप-शिवसेनेत मानापमान नाट्य रंगले होते.

युतीअंतर्गत ही धुसफूस सुरू असतानाच राज्यातही दोन्ही पक्षांत तणाव वाढल्याने जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सत्तास्थानी येऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते. भाजपला सत्ता स्थापनेत येत असलेल्या अडचणी पाहूनही जिल्ह्यातील शिवसेनेत आनंद व्यक्त होत आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक तीन जागा जिंकून क्रमांक एकवर विराजमान झालेल्या राष्टÑवादीत आणि भाजपच्या बरोबरीने जागा जिंकणाºया कॉँग्रेसमध्ये उत्साह दिसून येत आहे. अलिप्त असलेले कार्यकर्तेही आता पक्षाच्या मुख्य प्रवाहात दिसत आहेत. एकूणच कॉँग्रेस-राष्टÑवादीतील उत्साह वाढत आहे. राज्यातील सत्तेतून भाजप बाजूला होण्याचे संकेत मिळत असल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे.एकूणच राज्याच्या राजकीय समीकरणांचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 

समित्यांवर नियुक्त्या : सेना नाराजजिल्हा नियोजन समितीपासून विविध योजनांच्या जिल्हा, तालुका स्तरावरील समित्यांमध्ये शिवसेनेला युतीच्या ठरलेल्या ‘फॉर्म्युल्या’प्रमाणे स्थान मिळाले नाही. ‘६६-३३’प्रमाणे जागावाटप ठरले असताना, शिवसेनेला २० टक्क्यांहून कमी पदे मिळाली. त्यामुळे गेली पाच वर्षे नाराजी व्यक्त होत होती. जिल्हा नियोजन समितीत ५ जागांवर दावा केलेल्या शिवसेनेला केवळ ३ जागा दिल्यानेही शिवसैनिक नाराज होते. अशा परिस्थितीत राज्यातील वादामुळे स्थानिक पातळीवरील वादही आता उफाळून आला आहे.

सर्वच स्तरावर भाजप लबाड : विभुतेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, राज्याच्या राजकारणातच नव्हे, तर स्थानिक पातळीवरही भाजप लबाडपणा करीत आली आहे. गेल्या पाच वर्षांत युतीचे नाटक करून शिवसेनेला संपविण्याचा डाव भाजपने आखला होता. शिवसेनाप्रमुखांनी भाजपबद्दल व्यक्त केलेले मत योग्यच असून, स्थानिक पातळीवरही आम्हाला भाजपचा असाच किंवा त्याहून वाईट अनुभव आहे. त्यामुळे भाजपच्या अधोगतीला त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे. जिल्ह्यातील खानापूरचा अपवाद वगळता शिवसेनेच्या तिन्ही जागा पाडण्यात भाजपचा हात आहे. लोकसभा आणि गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील मतांचे आकडे पाहिले तर, भाजपने केलेली गद्दारी स्पष्टपणे दिसून येते.

भाजप प्रामाणिकच : देशमुखभाजपने जिल्ह्यात युतीधर्माचे पालन प्रामाणिकपणे केले आहे. पलूस-कडेगावची जागा ही भाजपलाच मिळायला हवी होती. आम्ही तशी मागणीही नेतृत्वाकडे केली होती, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपचे प्राबल्य होते तिथे शिवसेनेला जनाधार मिळाला नाही. यात भाजपने काम केले नाही, हा आरोप चुकीचा आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण