शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
3
भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
6
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
7
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
8
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
9
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
10
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
11
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
12
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
13
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
14
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
15
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
16
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
17
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
18
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
19
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
20
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट

राज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील युतीतही तणाव : संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:53 IST

भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे. राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती.

ठळक मुद्देभाजपने पाच वर्षे लबाडी केल्याचा शिवसेनेचा आरोप; भाजपच्या गोटात अस्वस्थता

अविनाश कोळी ।सांगली : राज्यातील भाजप-शिवसेना युतीत असलेला तणाव सांगली जिल्ह्यात निवडणुकीपासूनच जाणवत आहे. भाजपच्या हातातील सत्तेच्या दोऱ्या सुटत असल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे, तर कॉँग्रेस व राष्टÑवादीमध्येही आनंदाची लकेर उमटली आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.राज्यातील सरकार स्थापनेच्या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होत असून, त्यामुळे समीकरणेही बदलत आहेत. राज्यातील सरकार स्थापनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे.

राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती. त्यामुळे भाजपच्या नावाने बोटे मोडणाºया शिवसैनिकांना भाजपच्या एकाकीपणामुळे आनंद होत आहे.

युतीअंतर्गत जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे व चार जागा शिवसेनेकडे गेल्या होत्या. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला खानापूर, पलूस-कडेगाव, इस्लामपूर आणि तासगाव हे मतदारसंघ आले होते. आमदार अनिल बाबर यांनी गतवेळेप्रमाणे यंदाही विजय मिळविला असला तरी, अन्य तीन जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला नाही.

भाजपने इस्लामपूरमध्ये बंडखोर उमेदवार उभा केला तर, पलूस-कडेगावमध्ये नोटाला मतदान केल्याबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी राग व्यक्त करीत आहेत. शिवसेना या जखमा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वीही भाजप-शिवसेनेत मानापमान नाट्य रंगले होते.

युतीअंतर्गत ही धुसफूस सुरू असतानाच राज्यातही दोन्ही पक्षांत तणाव वाढल्याने जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सत्तास्थानी येऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते. भाजपला सत्ता स्थापनेत येत असलेल्या अडचणी पाहूनही जिल्ह्यातील शिवसेनेत आनंद व्यक्त होत आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक तीन जागा जिंकून क्रमांक एकवर विराजमान झालेल्या राष्टÑवादीत आणि भाजपच्या बरोबरीने जागा जिंकणाºया कॉँग्रेसमध्ये उत्साह दिसून येत आहे. अलिप्त असलेले कार्यकर्तेही आता पक्षाच्या मुख्य प्रवाहात दिसत आहेत. एकूणच कॉँग्रेस-राष्टÑवादीतील उत्साह वाढत आहे. राज्यातील सत्तेतून भाजप बाजूला होण्याचे संकेत मिळत असल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे.एकूणच राज्याच्या राजकीय समीकरणांचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 

समित्यांवर नियुक्त्या : सेना नाराजजिल्हा नियोजन समितीपासून विविध योजनांच्या जिल्हा, तालुका स्तरावरील समित्यांमध्ये शिवसेनेला युतीच्या ठरलेल्या ‘फॉर्म्युल्या’प्रमाणे स्थान मिळाले नाही. ‘६६-३३’प्रमाणे जागावाटप ठरले असताना, शिवसेनेला २० टक्क्यांहून कमी पदे मिळाली. त्यामुळे गेली पाच वर्षे नाराजी व्यक्त होत होती. जिल्हा नियोजन समितीत ५ जागांवर दावा केलेल्या शिवसेनेला केवळ ३ जागा दिल्यानेही शिवसैनिक नाराज होते. अशा परिस्थितीत राज्यातील वादामुळे स्थानिक पातळीवरील वादही आता उफाळून आला आहे.

सर्वच स्तरावर भाजप लबाड : विभुतेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, राज्याच्या राजकारणातच नव्हे, तर स्थानिक पातळीवरही भाजप लबाडपणा करीत आली आहे. गेल्या पाच वर्षांत युतीचे नाटक करून शिवसेनेला संपविण्याचा डाव भाजपने आखला होता. शिवसेनाप्रमुखांनी भाजपबद्दल व्यक्त केलेले मत योग्यच असून, स्थानिक पातळीवरही आम्हाला भाजपचा असाच किंवा त्याहून वाईट अनुभव आहे. त्यामुळे भाजपच्या अधोगतीला त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे. जिल्ह्यातील खानापूरचा अपवाद वगळता शिवसेनेच्या तिन्ही जागा पाडण्यात भाजपचा हात आहे. लोकसभा आणि गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील मतांचे आकडे पाहिले तर, भाजपने केलेली गद्दारी स्पष्टपणे दिसून येते.

भाजप प्रामाणिकच : देशमुखभाजपने जिल्ह्यात युतीधर्माचे पालन प्रामाणिकपणे केले आहे. पलूस-कडेगावची जागा ही भाजपलाच मिळायला हवी होती. आम्ही तशी मागणीही नेतृत्वाकडे केली होती, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपचे प्राबल्य होते तिथे शिवसेनेला जनाधार मिळाला नाही. यात भाजपने काम केले नाही, हा आरोप चुकीचा आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण