शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार काा दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
2
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
3
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
4
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
5
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
6
Lifelesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
7
जामताडा बनण्याच्या 'हे' शहर मार्गावर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
8
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
9
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
10
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
11
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
12
कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
13
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
14
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
15
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
16
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
17
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
18
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
19
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
20
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. आता राज्य शासनाकडून टेंभू योजनेचा ६ कोटी इतका टंचाई निधी जमा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही रक्कम टेंभू योजनेकडे वर्ग झाली आहे. यामुळे योजना गुरूवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी केन अ‍ॅग्रो रायगाव कारखान्याकडून २ कोटी, ग्रीन पॉवर गोपूजकडून ७५ लाख, सोनहिरा वांगीकडून ५० लाख व अन्य जमा, असे एकंदरीत ४ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम तातडीने महावितरणकडे भरून वीजपुरवठा पूर्ववत जोडून गुरुवारी टेंभू योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

चालूवर्षी टेंभू योजनेचे पहिले आवर्तन मिळण्यास विलंब झाल्याने लाभक्षेत्रातील शेतीपिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत आता टेंभू योजना सुरू होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकास जीवदान मिळणार आहे. राज्य शासनाकडे सिंचन योजनांचा टंचाई उपाय योजना निधी अडकला होता. हा निधी मिळविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर आदी नेत्यांनी पाठपुरावा केला.

आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केन अ‍ॅग्रो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रीन पॉवर या कारखान्यांच्या माध्यमातून टेंभू योजनेची शेतकºयांच्या ऊसबिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. त्यामुळे आता टंचाई निधी आणि कारखान्यांकडून वसूल झालेली पाणीपट्टी अशी १० कोटींची रक्कम वीजबिल थकबाकीपोटी तात्काळ भरली जाणार आहे आणि टेंभू योजनाही तत्काळ सुरू केली जाणार आहे.तिन्ही योजनांसाठी १४ कोटी वर्गटेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही योजनांचा एकंदरीत १४ कोटी इतका टंचाई उपाय योजना निधी राज्य शासनाकडून वर्ग झाला आहे. यामध्ये टेंभू योजनेचा ६ कोटी, म्हैसाळ योजनेचा ५ कोटी ५० लाख, तर ताकारी योजनेचा २ कोटी ५० लाख इतका टंचाई उपाय योजना निधी आहे. हा निधी वर्ग झाल्यामुळे योजनांची वीजबिल थकबाकी भरण्यास मदत झाली आहे.आवर्तनासाठी यंत्रणा सज्जयोजना सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. वीजपुरवठा पूर्ववत जोडताच टेंभू योजना सुरू होईल. आवर्तनासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. महावितरणकडून सर्वतोपरी सहकार्याची गरज आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली