शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

दहा गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:04 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून मध्यम जोखीमचे २५० पाण्याचे स्रोत सापडल्यामुळे संबंधित गावांतील

ठळक मुद्दे पाणीस्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण : मध्यम जोखीमचे २५० स्रोत

सांगली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून मध्यम जोखीमचे २५० पाण्याचे स्रोत सापडल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेन दिल्या आहेत.

जिल्ह्यातून चार हजार २५६ पाणीस्रोत आहेत. यामध्ये नळयोजनांच्या ६६९, विहिरींच्या २४२ आणि हातपंप व विंधन विहिरींच्या तीन हजार ३४५ पाणी स्रोतांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात येते. दि. १ ते ३० एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसापाचीवाडी, आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी, चिंचाळे, खानापूर तालुक्यातील तांदळगाव, मिरज तालुक्यातील कदमवाडी आदी १० ग्रामपंचायतींना पिवळे, तर ६८९ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आाले. पाणीपुरवठा स्रोतातील पाणी नमुन्यांची कारणे शोधून संबंधित ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने दिल्या आहेत.

पाण्यासाठी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना, विहीर, कूपनलिका, हातपंप हे स्रोत आहेत. सर्वच स्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बºयाचदा अनेक पाणी स्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते, तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्वेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करुन हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही हे कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात. पावसाळा तोंडावर आला असून पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अनेकदा कूपनलिकांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाणी नमुन्याची तपासणी करण्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे. शरीरात जवळपास ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी सांगितले.

 

असे दिले जाते : कार्डपाणी स्रोताच्या स्वच्छता सर्वेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखीमसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. शून्य ते २९ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत पिवळे व ७० पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते. जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणीस्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.

यांच्या स्वाक्षरीने होते कार्डचे वाटपसौम्य जोखीमचे हिरवे कार्ड वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात येते, तर पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले जाते. लाल कार्ड हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगली