शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:26 IST

आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे

शरद जाधव ।सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याचे दिसत आहे.

सांगली कार्यालयात कार्यरत असलेल्या चार कर्मचाºयांची अन्यत्र बदली करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आता केवळ दोन कर्मचाºयांवर अवलंबून आहे. रेशीम विकास अधिकारी या पदाचाही कारभार कोल्हापूरच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यात रेशीम शेती करणाºया शेतकºयांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.

विपरित नैसर्गिक परिस्थिती व बाजारपेठेचा भरोसा नसल्याने शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालनाकडे वळला आहे. त्यातच गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी करून दाखवित आहेत. अत्यंत कमी खर्चात व शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून रेशीम शेती करता येते. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. कमी कालावधित जादा उत्पादनाची हमी असल्याने जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळासह संपूर्ण जिल्ह्यातच थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जाते.

गेल्यावर्षी ३०० शेतकºयांनी ३२७ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी १ लाख १५ हजार अंडीपुंजांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यातून ७० टन रेशीम कोशाचे उत्पादन झाले. याप्रकारे शेतकºयांना रेशीम शेतीचा फायदा होत असतानाच, रेशीम संचालनालयाने अचानक ९ पैकी ४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या, तर एका कर्मचाºयाने स्वेच्छानिवृत्ती घेतली.आता कार्यरत तीन कर्मचाºयांपैकी एकाकडे प्रशासन व ‘मनरेगा’चे कामकाज असते, तर उर्वरित दोन कर्मचाºयांकडेच जिल्ह्याचा कारभार आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकºयांपर्यंत पोहोचून काम करणे जिकिरीचे होणार आहे.

यंदा ३८२ एकरवर रेशीम शेतीचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, आता कर्मचारीच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरीही रेशीम उत्पादनास नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या चांगले काम केलेल्या कर्मचाºयांना पुन्हा नेमणूक देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.जिल्ह्यातील रेशीम शेती...एकूण लागवड क्षेत्र : ३२७ एक ररेशीम शेती करणारे शेतकरी : ३००अंडीकोशांचे वाटप : १ लाख १५ हजाररेशीम उत्पादन : ७० टन

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी