शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:26 IST

आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे

शरद जाधव ।सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याचे दिसत आहे.

सांगली कार्यालयात कार्यरत असलेल्या चार कर्मचाºयांची अन्यत्र बदली करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आता केवळ दोन कर्मचाºयांवर अवलंबून आहे. रेशीम विकास अधिकारी या पदाचाही कारभार कोल्हापूरच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यात रेशीम शेती करणाºया शेतकºयांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.

विपरित नैसर्गिक परिस्थिती व बाजारपेठेचा भरोसा नसल्याने शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालनाकडे वळला आहे. त्यातच गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी करून दाखवित आहेत. अत्यंत कमी खर्चात व शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून रेशीम शेती करता येते. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. कमी कालावधित जादा उत्पादनाची हमी असल्याने जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळासह संपूर्ण जिल्ह्यातच थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जाते.

गेल्यावर्षी ३०० शेतकºयांनी ३२७ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी १ लाख १५ हजार अंडीपुंजांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यातून ७० टन रेशीम कोशाचे उत्पादन झाले. याप्रकारे शेतकºयांना रेशीम शेतीचा फायदा होत असतानाच, रेशीम संचालनालयाने अचानक ९ पैकी ४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या, तर एका कर्मचाºयाने स्वेच्छानिवृत्ती घेतली.आता कार्यरत तीन कर्मचाºयांपैकी एकाकडे प्रशासन व ‘मनरेगा’चे कामकाज असते, तर उर्वरित दोन कर्मचाºयांकडेच जिल्ह्याचा कारभार आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकºयांपर्यंत पोहोचून काम करणे जिकिरीचे होणार आहे.

यंदा ३८२ एकरवर रेशीम शेतीचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, आता कर्मचारीच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरीही रेशीम उत्पादनास नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या चांगले काम केलेल्या कर्मचाºयांना पुन्हा नेमणूक देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.जिल्ह्यातील रेशीम शेती...एकूण लागवड क्षेत्र : ३२७ एक ररेशीम शेती करणारे शेतकरी : ३००अंडीकोशांचे वाटप : १ लाख १५ हजाररेशीम उत्पादन : ७० टन

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी