शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील दहा तलाव पडले कोरडे...

By admin | Updated: March 10, 2016 01:21 IST

भीषण पाणीटंचाई : पाच तलावांतील पातळी मृतसंचयापेक्षाही कमी; गावांमध्ये चिंतेचे वातावरण

गजानन पाटील -- संख --उन्हाची वाढती तीव्रता, कमी झालेला पाऊस, पाण्याचा अवाजवी उपसा, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचे दुर्लक्ष यामुळे जत तालुक्यात पाण्याची पातळी कमी झाल्याने २६ तलावांपैकी १० तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पांपैकी संख मध्यम प्रकल्प कोरडा, तर दोड्डनाला प्रकल्पासह ५ तलावांतील पातळी मृतसंचय पातळीपेक्षा कमी झाली आहे. जानेवारी महिन्यामध्ये ही स्थिती आहे, तर येत्या दोन महिन्यामध्ये पश्चिम भागातील तलाव वगळता बाकीचे तलाव कोरडे पडणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत पाणीसाठा संपुष्टात येणार असल्याने एप्रिल-मे महिन्यामध्ये तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आतापर्यंतची भीषण टंचाई जाणवणार आहे. म्हैसाळ योजनेच्या आवर्तनावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागणार आहे. गेल्या चार वर्षापासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी १००० फुटापर्यंत गेली आहे. पावसाअभावी सलग दोन वर्षे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.दोड्डनाला मध्यम प्रकल्पाखाली उमदी, जाडरबोबलाद, उटगी, निगडी (बु), लमाण तांडा (उटगी) या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत. पाणीपुरवठा मध्यम प्रकल्पावर अवलंबून आहे. सध्याचा पाणीपातळी मृतसंचयाखाली गेल्याने व विंधन विहिरीची पाणी पातळी तळाशी गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावाचे नाव क्षमतासध्याचा पाणीसाठाकोसारी५१.१५२१.२७गुगवाड५६.०१कोरडाबिळूर५८.८५कोरडाखोजनवाडी७०.८४कोरडाउमराणी४०.१७कोरडाप्रतापूर५८.८८५१.३४रेवनाळ८३.६०३१.६६बिरनाळ८६.५६६३.६७तिप्पेहळ्ळी५५.९०९.३१शेगाव-२४१.०५५.०० (मृतसंचय)तलावाचे नाव क्षमतासध्याचा पाणीसाठावाळेखिंडी१४६.००४४.०५शेगाव-१२८५.३६६४.००मिरवाड५५.९६५.००डफळापूर ४९.२८कोरडाबेळुंखी७०.८४२०.१६भिवर्गी ५०३.५४२२.७८दरीबडची६६.३६कोरडामध्यम प्रकल्पसंख७०३.६५कोरडादोड्डनाला२७४.३५२.९० (मृतसंचयाखाली)द्राक्षे, डाळिंब या फळबागा पाण्यामुळे धोक्यात आल्या आहेत. सध्याच्या द्राक्षे, डाळिंब फळांच्या हंगामाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या पाणी पुरवठ्यावर द्राक्ष हंगाम पार पडणार आहे. पण यावर्षी खरड छाटणी होणार नाही. परिणामी काड्या तयार होणार नाहीत. तसेच पाण्याअभावी बागा काढून टाकाव्या लागणार आहे.