शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांचे खत अप्रमाणित

By admin | Updated: October 26, 2016 00:21 IST

कृषी विभागाची कारवाई : येळावीतील क्लास वन अ‍ॅग्रोला नोटीस

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीचे नऊ लाख ९० हजार रुपये किमतीचे एक हजार ९८० पोती दुय्यम मूलद्रव्य (खत) नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खताला विक्री बंदचे आदेश दिले असून, खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये?, अशी नोटीसही बजाविली आहे.क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीच्या खतांच्या नमुन्यांची पूर्वीही तपासणी केली होती. यामध्ये १०५ टन दुय्यम मूलद्रव्य खत अप्रमाणित आल्यामुळे, त्यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विक्री बंदचे आदेश दिले होते. या कारवाईस महिना झाला आहे. तरीही कंपनीकडून पुन्हा उत्पादन चालूच होते. याबाबत जिल्हा परिषद विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी धनाजीराव पाटील यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने अचानक कंपनीला भेट देऊन तपासणी केली, तसेच खताचे पुन्हा नमुने घेतले. या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सल्फर हे घटक कमी आढळून आल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीने उत्पादित केलेल्या एक हजार ९८० पोती खताच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खत कंपनीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावून, तुमचा खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये, असे म्हटले आहे. या नोटिसीला खत कंपनीने सात दिवसात उत्तर दिले नाही, तर तुमचा परवाना निलंबित केला जाईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. या कारवाईबरोबरच अन्य खत निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नमुने अप्रमाणित : तरीही खताची निर्मितीकृषी विभागाच्या भरारी पथकाने जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करून, खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम १०, मॅग्नेशिअम ५ आणि सल्फरची १० मात्रा असण्याची गरज होती. परंतु, तपासणीमध्ये कॅल्शिअम ४.७६, तर मॅग्नेशिअमची ४.७४ मात्रा आढळून आली आहे. कॅल्शिअमची मात्रा बहुतांश नमुन्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे. यामध्ये ३२ कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांनी विक्रेत्यांकडे पाठविलेल्या दोनशे टन खत विक्रीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वी बंदी घातली आहे. मात्र या कंपन्यांकडून उत्पादन घेतले जात आहेच. या कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे.