शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दहा लाखांचे खत अप्रमाणित

By admin | Updated: October 26, 2016 00:21 IST

कृषी विभागाची कारवाई : येळावीतील क्लास वन अ‍ॅग्रोला नोटीस

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीचे नऊ लाख ९० हजार रुपये किमतीचे एक हजार ९८० पोती दुय्यम मूलद्रव्य (खत) नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खताला विक्री बंदचे आदेश दिले असून, खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये?, अशी नोटीसही बजाविली आहे.क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीच्या खतांच्या नमुन्यांची पूर्वीही तपासणी केली होती. यामध्ये १०५ टन दुय्यम मूलद्रव्य खत अप्रमाणित आल्यामुळे, त्यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विक्री बंदचे आदेश दिले होते. या कारवाईस महिना झाला आहे. तरीही कंपनीकडून पुन्हा उत्पादन चालूच होते. याबाबत जिल्हा परिषद विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी धनाजीराव पाटील यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने अचानक कंपनीला भेट देऊन तपासणी केली, तसेच खताचे पुन्हा नमुने घेतले. या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सल्फर हे घटक कमी आढळून आल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीने उत्पादित केलेल्या एक हजार ९८० पोती खताच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खत कंपनीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावून, तुमचा खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये, असे म्हटले आहे. या नोटिसीला खत कंपनीने सात दिवसात उत्तर दिले नाही, तर तुमचा परवाना निलंबित केला जाईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. या कारवाईबरोबरच अन्य खत निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नमुने अप्रमाणित : तरीही खताची निर्मितीकृषी विभागाच्या भरारी पथकाने जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करून, खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम १०, मॅग्नेशिअम ५ आणि सल्फरची १० मात्रा असण्याची गरज होती. परंतु, तपासणीमध्ये कॅल्शिअम ४.७६, तर मॅग्नेशिअमची ४.७४ मात्रा आढळून आली आहे. कॅल्शिअमची मात्रा बहुतांश नमुन्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे. यामध्ये ३२ कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांनी विक्रेत्यांकडे पाठविलेल्या दोनशे टन खत विक्रीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वी बंदी घातली आहे. मात्र या कंपन्यांकडून उत्पादन घेतले जात आहेच. या कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे.