शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीमध्ये ‘जलयुक्त’मधून टेंभूची कामे

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकसहभागातून कामाला प्राधान्य; जलसंपदाच्या खर्चात बचत

सांगली : कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आटपाडी तालुक्याला फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू योजनेची रखडलेली कामे ‘जलयुक्त शिवार योजने’तून पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. ‘जलयुक्त’मधून हे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करण्यास येणाऱ्या खर्चाच्या केवळ दहा टक्के खर्च होईल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, या कामामुळे आटपाडी तालुक्यातील ४६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेतील रखडलेली कामे व त्यामुळे आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या विपरित परिणामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आनंदराव पाटील, टेंभूचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. टेंभू योजनेचे आटपाडी तालुक्यातील काम रखडल्याने पाण्याचा उपयोग होत नसून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. रखडलेले काम जलयुक्त शिवार योजनेतून करण्याबाबत चर्चा झाली. यास तालुक्यातील पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी होकार दर्शवत काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग नोंदविण्यासही तयारी दर्शवली. तालुक्यात एकूण तीन ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेचा आधार घेऊन क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आटपाडीतून मुख्य कालव्याजवळून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे, नाल्यांमधून पाणी सोडण्यासाठी नाले प्रवाहित करण्याची कामे करण्याचा निर्णय यावेळी झाला. टेंभूच्या खरसुंडी येथील मुख्य कालव्यातून बाळेवाडी, मिटकी आणि अर्जुनवाडी परिसराला पाणी देण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. बाळेवाडी ओढ्यात पाणी सोडण्यात येणार असून, तेथून बनपुरी, करगणी, मानेवाडी, तडवळे, माळेवाडी या मार्गावरून शेटफळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे २८०० लाभार्थ्यांना फायदा होणार असून, ३६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या योजनेनुसार कचरेवस्ती तलाव ते आटपाडीचा काही भाग लेंगरेवाडी याभागात नाल्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेंगरेवाडी येथे वापरात नसलेला कालवा असून, त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरले. या कामातून एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही कामांतून एकूण साडेपाच हजार हेक्टरवर क्षेत्राला लाभ होणार आहे.आटपाडी तालुक्यात टेंभूच्या मुख्य कालव्यातून पोटकालव्यांची सोय नाही. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतून काम पूर्ण होणार आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, याबाबत पाटबंधारे विभागाकडून आठ दिवसात कामाचे नियोजन व अंदाजपत्रक सादर केले जाणार असून, त्यानंतर लगेचच कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने अग्रणीपाठोपाठ आता हा उपक्रम हाती घेतल्याने दुष्काळी भागात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीला अण्णासाहेब पत्की, विजय पाटील, अंकुश यमगर, गणपती खरात, शंकर गिड्डे, बाळासाहेब माळी, मुरलीधर पाटील, दगडू बाबर, पतंगराव गायकवाड, महादेव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)