शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

आटपाडीमध्ये ‘जलयुक्त’मधून टेंभूची कामे

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकसहभागातून कामाला प्राधान्य; जलसंपदाच्या खर्चात बचत

सांगली : कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आटपाडी तालुक्याला फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू योजनेची रखडलेली कामे ‘जलयुक्त शिवार योजने’तून पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. ‘जलयुक्त’मधून हे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करण्यास येणाऱ्या खर्चाच्या केवळ दहा टक्के खर्च होईल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, या कामामुळे आटपाडी तालुक्यातील ४६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेतील रखडलेली कामे व त्यामुळे आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या विपरित परिणामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आनंदराव पाटील, टेंभूचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. टेंभू योजनेचे आटपाडी तालुक्यातील काम रखडल्याने पाण्याचा उपयोग होत नसून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. रखडलेले काम जलयुक्त शिवार योजनेतून करण्याबाबत चर्चा झाली. यास तालुक्यातील पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी होकार दर्शवत काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग नोंदविण्यासही तयारी दर्शवली. तालुक्यात एकूण तीन ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेचा आधार घेऊन क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आटपाडीतून मुख्य कालव्याजवळून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे, नाल्यांमधून पाणी सोडण्यासाठी नाले प्रवाहित करण्याची कामे करण्याचा निर्णय यावेळी झाला. टेंभूच्या खरसुंडी येथील मुख्य कालव्यातून बाळेवाडी, मिटकी आणि अर्जुनवाडी परिसराला पाणी देण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. बाळेवाडी ओढ्यात पाणी सोडण्यात येणार असून, तेथून बनपुरी, करगणी, मानेवाडी, तडवळे, माळेवाडी या मार्गावरून शेटफळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे २८०० लाभार्थ्यांना फायदा होणार असून, ३६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या योजनेनुसार कचरेवस्ती तलाव ते आटपाडीचा काही भाग लेंगरेवाडी याभागात नाल्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेंगरेवाडी येथे वापरात नसलेला कालवा असून, त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरले. या कामातून एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही कामांतून एकूण साडेपाच हजार हेक्टरवर क्षेत्राला लाभ होणार आहे.आटपाडी तालुक्यात टेंभूच्या मुख्य कालव्यातून पोटकालव्यांची सोय नाही. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतून काम पूर्ण होणार आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, याबाबत पाटबंधारे विभागाकडून आठ दिवसात कामाचे नियोजन व अंदाजपत्रक सादर केले जाणार असून, त्यानंतर लगेचच कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने अग्रणीपाठोपाठ आता हा उपक्रम हाती घेतल्याने दुष्काळी भागात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीला अण्णासाहेब पत्की, विजय पाटील, अंकुश यमगर, गणपती खरात, शंकर गिड्डे, बाळासाहेब माळी, मुरलीधर पाटील, दगडू बाबर, पतंगराव गायकवाड, महादेव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)