शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आटपाडीमध्ये ‘जलयुक्त’मधून टेंभूची कामे

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकसहभागातून कामाला प्राधान्य; जलसंपदाच्या खर्चात बचत

सांगली : कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आटपाडी तालुक्याला फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू योजनेची रखडलेली कामे ‘जलयुक्त शिवार योजने’तून पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. ‘जलयुक्त’मधून हे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करण्यास येणाऱ्या खर्चाच्या केवळ दहा टक्के खर्च होईल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, या कामामुळे आटपाडी तालुक्यातील ४६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेतील रखडलेली कामे व त्यामुळे आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या विपरित परिणामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आनंदराव पाटील, टेंभूचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. टेंभू योजनेचे आटपाडी तालुक्यातील काम रखडल्याने पाण्याचा उपयोग होत नसून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. रखडलेले काम जलयुक्त शिवार योजनेतून करण्याबाबत चर्चा झाली. यास तालुक्यातील पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी होकार दर्शवत काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग नोंदविण्यासही तयारी दर्शवली. तालुक्यात एकूण तीन ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेचा आधार घेऊन क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आटपाडीतून मुख्य कालव्याजवळून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे, नाल्यांमधून पाणी सोडण्यासाठी नाले प्रवाहित करण्याची कामे करण्याचा निर्णय यावेळी झाला. टेंभूच्या खरसुंडी येथील मुख्य कालव्यातून बाळेवाडी, मिटकी आणि अर्जुनवाडी परिसराला पाणी देण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. बाळेवाडी ओढ्यात पाणी सोडण्यात येणार असून, तेथून बनपुरी, करगणी, मानेवाडी, तडवळे, माळेवाडी या मार्गावरून शेटफळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे २८०० लाभार्थ्यांना फायदा होणार असून, ३६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या योजनेनुसार कचरेवस्ती तलाव ते आटपाडीचा काही भाग लेंगरेवाडी याभागात नाल्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेंगरेवाडी येथे वापरात नसलेला कालवा असून, त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरले. या कामातून एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही कामांतून एकूण साडेपाच हजार हेक्टरवर क्षेत्राला लाभ होणार आहे.आटपाडी तालुक्यात टेंभूच्या मुख्य कालव्यातून पोटकालव्यांची सोय नाही. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतून काम पूर्ण होणार आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, याबाबत पाटबंधारे विभागाकडून आठ दिवसात कामाचे नियोजन व अंदाजपत्रक सादर केले जाणार असून, त्यानंतर लगेचच कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने अग्रणीपाठोपाठ आता हा उपक्रम हाती घेतल्याने दुष्काळी भागात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीला अण्णासाहेब पत्की, विजय पाटील, अंकुश यमगर, गणपती खरात, शंकर गिड्डे, बाळासाहेब माळी, मुरलीधर पाटील, दगडू बाबर, पतंगराव गायकवाड, महादेव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)