शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

आटपाडीमध्ये ‘जलयुक्त’मधून टेंभूची कामे

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकसहभागातून कामाला प्राधान्य; जलसंपदाच्या खर्चात बचत

सांगली : कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आटपाडी तालुक्याला फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू योजनेची रखडलेली कामे ‘जलयुक्त शिवार योजने’तून पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. ‘जलयुक्त’मधून हे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करण्यास येणाऱ्या खर्चाच्या केवळ दहा टक्के खर्च होईल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, या कामामुळे आटपाडी तालुक्यातील ४६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेतील रखडलेली कामे व त्यामुळे आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या विपरित परिणामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आनंदराव पाटील, टेंभूचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. टेंभू योजनेचे आटपाडी तालुक्यातील काम रखडल्याने पाण्याचा उपयोग होत नसून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. रखडलेले काम जलयुक्त शिवार योजनेतून करण्याबाबत चर्चा झाली. यास तालुक्यातील पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी होकार दर्शवत काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग नोंदविण्यासही तयारी दर्शवली. तालुक्यात एकूण तीन ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेचा आधार घेऊन क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आटपाडीतून मुख्य कालव्याजवळून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे, नाल्यांमधून पाणी सोडण्यासाठी नाले प्रवाहित करण्याची कामे करण्याचा निर्णय यावेळी झाला. टेंभूच्या खरसुंडी येथील मुख्य कालव्यातून बाळेवाडी, मिटकी आणि अर्जुनवाडी परिसराला पाणी देण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. बाळेवाडी ओढ्यात पाणी सोडण्यात येणार असून, तेथून बनपुरी, करगणी, मानेवाडी, तडवळे, माळेवाडी या मार्गावरून शेटफळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे २८०० लाभार्थ्यांना फायदा होणार असून, ३६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या योजनेनुसार कचरेवस्ती तलाव ते आटपाडीचा काही भाग लेंगरेवाडी याभागात नाल्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेंगरेवाडी येथे वापरात नसलेला कालवा असून, त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरले. या कामातून एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही कामांतून एकूण साडेपाच हजार हेक्टरवर क्षेत्राला लाभ होणार आहे.आटपाडी तालुक्यात टेंभूच्या मुख्य कालव्यातून पोटकालव्यांची सोय नाही. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतून काम पूर्ण होणार आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, याबाबत पाटबंधारे विभागाकडून आठ दिवसात कामाचे नियोजन व अंदाजपत्रक सादर केले जाणार असून, त्यानंतर लगेचच कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने अग्रणीपाठोपाठ आता हा उपक्रम हाती घेतल्याने दुष्काळी भागात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीला अण्णासाहेब पत्की, विजय पाटील, अंकुश यमगर, गणपती खरात, शंकर गिड्डे, बाळासाहेब माळी, मुरलीधर पाटील, दगडू बाबर, पतंगराव गायकवाड, महादेव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)