शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:41 IST

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.

ठळक मुद्देरुढी, परंपरांना फाटा : आहेर न स्वीकारता येणाऱ्या पाहुणे, मित्रमंडळींना पुस्तक देऊन केले सन्मानित

अविनाश कोळी ।सांगली : लग्न म्हणजे दोन हृदयांच्या, दोन कुटुंबांच्या मीलनाचा क्षण... या आनंदाच्या क्षणांना रुढी-परंपरांचे बंधन बांधले गेले आहे. मात्र हेच धागे तोडत परिवर्तनवादी विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत या क्षणाला लोकप्रबोधनाचे माध्यम बनविण्याची नवी परंपरा एका मुस्लिम दाम्पत्याने सांगलीतून सुरू केली. लोकांकडून आहेर स्वीकारण्याऐवजी पाहुण्यांनाच पुस्तकरूपी आहेर देण्याचा पायंडाही या लग्नात पाडण्यात आला.

कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील हारुण मुल्ला यांनी ही मुहूर्तमेढ रोवली. परिवर्तनवादी चळवळीत काम करणाºया मुल्ला यांनी आचरणातून या चळवळीला बळ दिले. त्यांच्या मुलीचे म्हणजेच तस्लिमाचे लग्न शाहनवाज या तरुणाशी ठरल्यानंतर, त्यांनी या विवाहाला परिवर्तनवादी विचारांनी भारीत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. शाहनवाज यांचे आई-वडीलही याच विचाराचे आहेत. चिंचणी-अंबकला ३ नोव्हेंबररोजी हा विवाहसोहळा पार पडला. स्वागताला कमान उभी करून, प्रत्येक फुटावर एका महापुरुषाची प्रतिमा आणि त्याखाली त्यांचे कार्य, विचार यांचा उल्लेख केला होता. उपस्थितांसाठी हे प्रेरणादायी ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, राजे उमाजीराव नाईक अशा महापुरुषांच्या सुमारे १५ फलकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.विश्वजित कदम भारावलेलग्नसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आ. विश्वजित कदम यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांनीही हजेरी लावली. त्यांचे स्वागतही पुष्पहार घालून न करता पुस्तके भेट देऊन करण्यात आले. फलकांची रचना, लग्नसोहळ्यातील विचारांचा थाट आणि पुस्तकरूपी भेटीतून मांडलेली प्रबोधनाची संकल्पना त्यांना भावली. त्यांनीही या सोहळ्याचे कौतुक केले.

  • एक हजार पुस्तकांचे वाटप

पाहुणे मंडळींना जी पुस्तके भेट देण्यात आली, त्यामध्ये कॉ. गोविंद पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता?’, महात्मा फुले यांची ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचे आसूड’, नरेंद्र दाभोलकर यांचे ‘प्रश्न तुमचा, उत्तर आमचे’ अशा पुस्तकांचा समावेश होता. अशी एक हजार पुस्तके वाटण्यात आली. 

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न