शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:41 IST

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.

ठळक मुद्देरुढी, परंपरांना फाटा : आहेर न स्वीकारता येणाऱ्या पाहुणे, मित्रमंडळींना पुस्तक देऊन केले सन्मानित

अविनाश कोळी ।सांगली : लग्न म्हणजे दोन हृदयांच्या, दोन कुटुंबांच्या मीलनाचा क्षण... या आनंदाच्या क्षणांना रुढी-परंपरांचे बंधन बांधले गेले आहे. मात्र हेच धागे तोडत परिवर्तनवादी विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत या क्षणाला लोकप्रबोधनाचे माध्यम बनविण्याची नवी परंपरा एका मुस्लिम दाम्पत्याने सांगलीतून सुरू केली. लोकांकडून आहेर स्वीकारण्याऐवजी पाहुण्यांनाच पुस्तकरूपी आहेर देण्याचा पायंडाही या लग्नात पाडण्यात आला.

कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील हारुण मुल्ला यांनी ही मुहूर्तमेढ रोवली. परिवर्तनवादी चळवळीत काम करणाºया मुल्ला यांनी आचरणातून या चळवळीला बळ दिले. त्यांच्या मुलीचे म्हणजेच तस्लिमाचे लग्न शाहनवाज या तरुणाशी ठरल्यानंतर, त्यांनी या विवाहाला परिवर्तनवादी विचारांनी भारीत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. शाहनवाज यांचे आई-वडीलही याच विचाराचे आहेत. चिंचणी-अंबकला ३ नोव्हेंबररोजी हा विवाहसोहळा पार पडला. स्वागताला कमान उभी करून, प्रत्येक फुटावर एका महापुरुषाची प्रतिमा आणि त्याखाली त्यांचे कार्य, विचार यांचा उल्लेख केला होता. उपस्थितांसाठी हे प्रेरणादायी ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, राजे उमाजीराव नाईक अशा महापुरुषांच्या सुमारे १५ फलकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.विश्वजित कदम भारावलेलग्नसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आ. विश्वजित कदम यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांनीही हजेरी लावली. त्यांचे स्वागतही पुष्पहार घालून न करता पुस्तके भेट देऊन करण्यात आले. फलकांची रचना, लग्नसोहळ्यातील विचारांचा थाट आणि पुस्तकरूपी भेटीतून मांडलेली प्रबोधनाची संकल्पना त्यांना भावली. त्यांनीही या सोहळ्याचे कौतुक केले.

  • एक हजार पुस्तकांचे वाटप

पाहुणे मंडळींना जी पुस्तके भेट देण्यात आली, त्यामध्ये कॉ. गोविंद पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता?’, महात्मा फुले यांची ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचे आसूड’, नरेंद्र दाभोलकर यांचे ‘प्रश्न तुमचा, उत्तर आमचे’ अशा पुस्तकांचा समावेश होता. अशी एक हजार पुस्तके वाटण्यात आली. 

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न