शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दुष्काळ मुक्तीसाठी तासगावचे कारभारी उदासीन , खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:00 IST

तासगाव : तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून दुष्काळ मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे.

ठळक मुद्देपानी फौंडेशन वॉटर कप स्पर्धा :

दत्ता पाटील ।तासगाव : तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून दुष्काळ मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. गावागावातील दुष्काळ हटवण्यासाठी लोकांनी चंग बांधला आहे. जनतेच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंबर कसून काम सुरु केले आहे. मात्र खासदार, आमदारांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींची मात्र उदासीन भूमिका असल्याने जनतेत रोष आहे.

तासगाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत ४९ गावांनी सहभाग घेतला. मात्र स्पर्धा सुरु होण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण केले नसल्यामुळे २० गावे स्पर्धेतून बाहेर पडली. तालुक्यात सद्यस्थिती २९ गावांत पाणी फौंडेशनचे काम मोठ्या उत्साहाने सुरु आहे. प्रत्येक गावात लोक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करण्यासाठी सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या निकषानुसार काम करण्यासाठी अहोरात्र कार्यरत दिसत आहेत.

पानी फौंडेनशच्या कामाने प्रेरित होऊन तासगाव शहर, सांगली, मिरज शहरातील नागरिकही या गावांतील कामात सहभाग घेत आहेत. कोणी श्रमदान करून, तर कोणी आर्थिक मदत करून या कामाला चालना देत आहे.दुष्काळाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सुरु असलेल्या या स्पर्धेत काम करण्यासाठी लोकांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर एक पाऊल पुढे टाकून तालुक्यातील प्रशासनाचे काम सुरु आहे. केवळ प्रशासकीय कामच नव्हे, तर गावागावात जाऊन श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

केवळ घड्याळी तास मोजून नोकरी करणाºया प्रवृत्तीसमोर नवा आदर्श ठेवून आॅनड्युटी चोवीस तास काम करुन जनतेशी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरुण जाधव, तालुका कृषी अधिकार आर. बी. शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गावे पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. अधिकाºयांच्या उत्साहाने तालुक्यातील जनताही प्रेरित झाली आहे.एकीकडे प्रशासन दुप्पट कार्यक्षमतेने दुष्काळ मुक्तीच्या मोहिमेत सहभागी झाले असताना, दुसरीकडे तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र आहे. २९ गावात पानी फौंडेनशचे तुफान आले आहे. अनेक संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र खासदार आणि आमदारांनी मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील पाणी योजनांसाठी श्रेयवाद घेताना नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून चढाओढ केल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र पानी फौंडेशनसाठी पुढाकार घेण्यात चढाओढ दूरच, सहभागदेखील नामधारी दिसून येत आहे.तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करणाºया कारभाºयांचीही पानी फौंडेशनच्या कामात उदासीन भूमिका आहे. अपवाद वगळता बहुतांश कारभाऱ्यांचा या कामात सक्रिय सहभाग नाही. सहभाग घेतलाच, तर दिखावू स्वरुपाचाच असतो. एरव्ही कामांचा ठेका आणि ठेकेदारीसाठी सरसावणारे कारभारी पानी फाऊंडेशनच्या कामात केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहेत. २२ मे पर्यंत वॉटर कप स्पर्धा आहे. या कालावधित किमान येणाºया काळात लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेऊन तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मुंबईच्या आमदारांचा तासगावात पुढाकारमंबई येथील आमदार योगेश सागर यांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे आणि सावळज ही दोन गावे पानी फौंडेशनसाठी दत्तक घेतली आहेत. वास्तविक जिल्ह्याशी कोणताही संबंध नसतानादेखील केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत आमदार सागर यांनी या दोन गावात स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून जलसंधारणाच्या कामासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. तर बीजेएस संस्थेच्या माध्यमातूनही दुष्काळमुक्तीसाठी तालुक्यातील १४ गावात यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा