शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेचे राजकारण बदलणार

By admin | Updated: May 12, 2016 00:13 IST

थेट नगराध्यक्ष निवडीने नेत्यांची कसोटी; आरक्षणाची उत्सुकता; संगीत खुर्ची थांबणार

दत्ता पाटील ---तासगाव  -नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी, थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. थेट नगराध्यक्ष पाच वर्षांसाठी असल्याने संगीत खुर्चीचा खेळ थांबणार असून, नेत्यांची कसरतही थांबणार आहे. मात्र थेट नगराध्यक्ष होण्यासाठी प्रभावी उमेदवाराचे समीकरण जुळवून आणावे लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. खुल्या गटातील इच्छुकांची आतापासूनच चर्चा होत आहे. मात्र आरक्षणाच्या निर्णयावरच पुढील वाटचाल निश्चित होणार आहे. तासगाव नगरपालिकेत गेल्या काही वर्षांत नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची झाली आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेत आघाडी, तडजोडीने गटा-तटांची सत्ता आली. सहा महिन्यांपूर्वी भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र सत्ता कोणाचीही असली तरी, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेसाठी नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची करावी लागली. हा खेळ अद्यापही कायम आहे. इच्छुकांच्या मनसुब्यापुढे नेतृत्व हतबल झाल्याचे चित्र तासगावकरांना पाहायला मिळाले. किंंबहुना भाजपची सत्ता आल्यापासून तर नगराध्यक्ष पदासाठी पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचेच पाहायला मिळत आहे.नगराध्यक्ष पदाच्या संगीत खुर्चीमुळे गेल्या काही वर्षातील एकाही नगराध्यक्षाचे काम लक्षणीय झाल्याचे पाहायला मिळाले नाही. यापूर्वी तासगावात दोन थेट नगराध्यक्ष झाले होते. दोघांचेही काम उल्लेखनीय होते. मात्र आताच्या नगराध्यक्षांकडून नावापुढे माजी जोडण्यापलीकडे फारसे काही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तासगावकरांना अपेक्षित विकास होत नसल्याची खंत आहे. आता थेट निवडीने संगीत खुर्चीचा खेळ थांबून पाच वर्षासाठी एकच नगराध्यक्ष राहणार असल्याने, येणाऱ्या काळात विकासात्मक चित्र पाहायला मिळेल, अशी जनतेची भावना आहे. तसेच या निर्णयामुळे निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदासाठी होणारे नाराजीनाट्य, कुरघोड्यांचे राजकारण आणि यामुळे नेतृत्वाला करावी लागणारी कसरत थांबणार आहे. त्यामुळे तासगावचा नगराध्यक्ष पदाचा इतिहास पाहिल्यास, नेत्यांनाही दिलासा देणारा हा निर्णय म्हणावा लागेल.सहा महिन्यांत पालिकेची निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष निवडीचे भवितव्य शहरातील सुमारे पंचवीस हजार मतदार ठरविणार आहेत. त्यामुळे या पदासाठी निवडणूक लढवणारा उमेदवार सर्व शहरात प्रभाव असणारा असायला हवा. सद्यस्थिती सर्व शहरात छाप पडेल, असा उमेदवार दिसून येत नाही. खुले आरक्षण पडल्यास इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत दोन-चार नावांची चर्चादेखील सुरु झाली आहे. भाजपमधून बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, राष्ट्रवादीतून अमोल शिंंदे, अजय पाटील यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरु आहे. तर काँग्रेससाठी तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांना स्वत: उभा राहण्याशिवाय पर्याय नसेल, तर अन्य आरक्षण पडल्यास उमेदवाराच्या प्रतिमेसोबत, नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. एकंदरीत खमक्या उमेदवारावरच नगराध्यक्षपदाचे समीकरण अवलंबून असल्याने, आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार, हे निश्चित.आरक्षण : निर्णयाकडे लक्षनगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत तासगावच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. नव्या निर्णयामुळे हे आरक्षण कायम राहणार की बदलणार, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आरक्षण काय असेल, यावरच नगराध्यक्षपदाचे राजकीय गणित निश्चित होणार आहे. मात्र या निर्णयाने तासगावातील राजकीय वातावरण ढवळले असून, तूर्तास तरी खुल्या गटातील उमेदवारांच्याबाबतीतच चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे येथील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.