शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेचा बेलगाम कारभार

By admin | Updated: March 17, 2017 23:36 IST

नगराध्यक्षांकडून बदलाची अपेक्षा : निकृष्ट कामे, टक्केवारीचा पायंडा, भाजपकडून ४0 कोटींच्या कामांचे मार्के टिंग

दत्ता पाटील ल्ल तासगावतासगाव नगरपालिकेत मागील पाच वर्षात कोट्यवधींची विकासकामे झाली. सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या काळात या कामांचे मार्केटिंग करण्यात आले. मात्र या कामांचा प्रभाव उलटा झाला. विकासापेक्षा टक्केवारी आणि निकृष्ट कामांनी विकास डागाळला गेला. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत तब्बल सव्वादोन कोटीच्या नवीन कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र पालिकेतील टक्केवारीच्या बेलगाम कारभारामुळे कामाच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत आहे. हा कारभार बदलण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्याकडून बदलाची अपेक्षा असून, निकृष्ट कामे आणि टक्केवारीचा पायंडा मोडीत निघून पारदर्शी कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.तासगाव नगरपालिकेचे नाव चर्चेत आले की, विकास कामांपेक्षा टक्केवारी आणि कारभाऱ्यांची ठेकेदारी असेच चित्र यापूर्वीच्या काळात पाहायला मिळाले आहे. सत्ता कोणाचीही असली तरी, मक्ता मात्र कारभाऱ्यांचाच, असाच कारभार सातत्याने झाला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कामे वाटून ‘मिल बांट के खाओ’च्या कारभाराचे अनेक नमुने यापूर्वी चव्हाट्यावर आले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर, खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कारभारी सत्तेत आले. त्यानंतर तर कामे घेण्यावरुन आणि टक्केवारीवरुन भाजपांतर्गत महाभारतापासून मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत अनेक घडामोडी झाल्या.पालिकेच्या निवडणुकीच्या काळात भाजपकडून ४० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यात आले होते. मात्र या कामांपेक्षा, कामातून झालेल्या बदनामीमुळे, विकास कामांचे श्रेय घेऊनदेखील त्याचा नकारात्मक परिणाम मतपेटीतून पाहायला मिळाला. निकृष्ट दर्जाची विकासकामे, रखडलेली कामे, ठेकेदार नगरसेवक, टक्केवारीसाठी कुरघोड्या अशा एक ना अनेक भानगडींमुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून पालिकेची लक्तरे वेशीवर मांडण्याचे काम झाले. पण कोट्यवधींचा खर्च होऊनही प्रत्यक्ष विकासात अपयश आले.बऱ्याच उलथापालथीनंतर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. नव्या कारभाऱ्यांच्या काळात चार दिवसांपूर्वी झालेल्या सभेत तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यांचा कारभारही पुन्हा ये रे माझ्या मागल्या असाच राहील. नगराध्यक्ष डॉ. सावंत यांच्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. किंंबहुना नव्याने होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला असावा, कारभार पारदर्शी असावा, अशा अपेक्षा आहेत. टक्केवारी, ठेकेदारी मोडीत काढून कारभार झाला तरच गुणवत्तापूर्ण विकास होणे शक्य आहे.