शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
7
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
8
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
9
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
10
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
11
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
12
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
13
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
14
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
15
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
16
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
17
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
18
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
19
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

३६ गावे, २७९ वाड्यांवर टँकर

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

जत तालुक्याचा आराखडा : दीड कोटींची गरज

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील ३६ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर ४९ टँकरद्वारे १ लाख ९७ हजार ८० नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जत तालुक्याची लोकसंख्या २ लाख ८० हजार असून, १२३ गावे व २७६ वाड्या आहेत. सध्या जानेवारी महिन्यात २९ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे एक लाखापेक्षा जादा नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत तालुक्यातील १२३ पैकी ११५ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. असा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर जत शहर व परिसरातील आठ गावे वगळता संपूर्ण तालुक्यातील गावे आणि तेथील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे, असे येथील प्रशासनाचे मत आहे.३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. संभाव्य टंचाई कृती आराखड्यात ११५ गावे आणि त्याखालील ११६ वाड्या-वस्त्यांवर ११६ विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ३२ लाख रुपये खर्च प्रास्तावित करण्यात आला आहे. ४९ गावे व त्याखालील ५६ वाड्या-वस्त्यांवरील ८२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना तात्पुरता पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी २८ लाख ५६ हजार रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणारे बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलाव वगळता तालुक्यात इतरत्र कोठेही यापुढील सहा महिन्यांत पाणी पुरवठा करू शकेल व पाणीसाठा उपलब्ध असणारे तलाव येथे सध्या उपलब्ध नाही. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हैसाळ-उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉलमधून बिरनाळ साठवण तलावात पाणी सोडून तेथून टँकरद्वारे पाणी उचलून यापुढील पाच-सहा महिन्यांत नागरिकांना पाणी पुरवठा करता येणार आहे. तालुक्यातील सुमारे ३८ ते ४२ हजार नागरिकांचे ऊसतोडणी कामगार म्हणून येथून प्रतिवर्षी स्थलांतर होत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ऊस गाळप हंगाम समाप्त झाल्यानंतर ते सर्वजण परत येतात. ते आल्यानंतर त्यांच्या हाताला काम देताना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या ४५ खासगी व ४ शासकीय अशा एकूण ४९ टँकरद्वारे माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या हिवाळा असला तरी उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत आहे. थंडी गायब झाली आहे. टँकरद्वारे मिळणाऱ्या वीस लिटर पाण्यात नागरिकांची दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी केला आहे.काराजनगी व गुगवाड येथील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. त्या गावांचे आणि इतर गावातून टँकरची मागणी आल्यास तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यकता असेल तेथे टँकर सुरू केला जाईल, अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.‘म्हैसाळ’चे पाणी बिरनाळ तलावामध्ये सोडावे लागणारजत तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून बिरनाळ तलावात पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही केली आहे. येत्या आठवड्यात यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.पाणी टंचाई वाढली : ११५ गावांना टँकरची गरजजत तालुक्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत आहे. १८ जानेवारी ते ३१ मार्च २०१६ अखेर एक कोटी ३२ लाख ८८ हजार रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ११५ गावे, त्याखालील ६६३ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.