शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

टाकळी, बोलवाड, सुभाषनगरची भारत निर्माण योजना धोक्यात!

By admin | Updated: November 22, 2014 00:01 IST

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती : ग्रामस्थांमध्ये नाराजी

टाकळी : टाकळी, बोलवाड व सुभाषनगरच्या भारत निर्माण योजनेची चौकशी व आरोपांच्या फेऱ्यातून सुटका होत नसल्याने, ही योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांचा पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार, की ही योजना मृगजळ ठरणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.टाकळी, बोलवाड, सुभाषनगरची संयुक्त असलेली भारत निर्माण योजना चौकशी, आरोप-प्रत्यारोप व राजकीय साठमारीत अडकली आहे. केवळ राजकारणासाठी वापर होत असल्याने या योजनेचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे. योजना आज-उद्या पूर्ण करण्याची ग्वाही हवेत विरत चालल्याने या तीनही गावांतील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे. भारत निर्माण योजना लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलने केली, ग्रामसभेमध्ये पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र याचा परिणाम शून्यच.गेल्या आठ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव व खाबूगिरी वृत्तीने योजनेची कामे पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. आम्हीच ही योजना पूर्ण करु, असे ग्रामस्थांना आवाहन करीत विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवडणूकही जिंकली. मात्र या कामाकडे त्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.सुमारे आठ वर्षांपासून टाकळी, बोलवाड, सुभाषनगर येथील ग्रामस्थ भारत निर्माण पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पाच किलोमीटर मिरजेला जावे लागते. कुणी सायकलने, तर कुणी दुचाकी वाहनाने पाण्याची वाहतूक करीत असताना दिसतात. पाणी आले, मात्र ते पाणी उचलण्यासाठी लागलेले वीज बिल कोण भरणार, यावरही काही काळ चर्चा रंगली. भारत निर्माण योजनेच्या मुद्द्यावर गाजणारी टाकळीची ग्रामसभा आता शांततेत पार पडत असल्याने, ग्रामस्थांतून भारत निर्माण योजनेच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भारत निर्माण समिती भारत निर्माणची सर्व कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे दिल्याचे सांगत आहे. मात्र याबाबत कोणीही पुढाकार घेऊन भारत निर्माण पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा आरोप सुभाषनगर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. (वार्ताहरकामाची चौकशी करा मध्यंतरी प्रशासनाने त्रयस्थ यंत्रणेकडून या तीन गावांच्या योजनेचा चौकशी यादीत समावेश होता, त्या चौकशीचे नेमके काय झाले, चौकशी झाली का, याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी, या योजनेच्या कामाची कसून चौकशी झाल्यास, ग्रामस्थांच्या सोयीच्या असणाऱ्या या योजनेतून कोणाची सोय झाली? ठेकेदार, तांत्रिक सल्लागार की पाणी पुरवठा समिती, हे उघडकीस आलेच पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.