शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:02 IST

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ...

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांमुळे शेतीची झालेली नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेती पिकाचे नुकसान रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या विषयी चर्चा करताना केली.देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बिबट्या, गव्हा, अजगर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी व वन्यजीव यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. दि.१६ रोजी पेठ शिराळा रस्त्यावरती रेठरे धरण गावाजवळ सर्जेराव खबाले (मु.पो.कापरी तालुका शिराळा) यांच्या वरती प्रवासादरम्यान बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच गव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे तसेच मोकळे पडून राहत आहे.

कार्यवाही करावीशेतीचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून गुढे ते बांबरवाडी खुंदलापूर ते मिरुखेवाडी, तसेच रिळे, तडवळे यासह आवश्यक असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा मोठी चर मारणे अत्यावश्यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनshirala-acशिराळाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखforest departmentवनविभागFarmerशेतकरी