शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:02 IST

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ...

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांमुळे शेतीची झालेली नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेती पिकाचे नुकसान रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या विषयी चर्चा करताना केली.देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बिबट्या, गव्हा, अजगर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी व वन्यजीव यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. दि.१६ रोजी पेठ शिराळा रस्त्यावरती रेठरे धरण गावाजवळ सर्जेराव खबाले (मु.पो.कापरी तालुका शिराळा) यांच्या वरती प्रवासादरम्यान बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच गव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे तसेच मोकळे पडून राहत आहे.

कार्यवाही करावीशेतीचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून गुढे ते बांबरवाडी खुंदलापूर ते मिरुखेवाडी, तसेच रिळे, तडवळे यासह आवश्यक असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा मोठी चर मारणे अत्यावश्यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनshirala-acशिराळाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखforest departmentवनविभागFarmerशेतकरी