शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘स्वाइन’चे तीन बळी?

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

मृतांत दोन महिला : एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

सांगली : ‘स्वाइन फ्लू’ संशयित आणखी तीन रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. एका दिवसात तिघांचा बळी गेल्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात डॉक्टरांसह रुग्णांचे नातेवाईक आता तोंडाला मास्क लावून फिरू लागले आहेत. सुजाता अशोक जोशी (वय ४८, रा. सीतारामनगर, सांगली), निर्मला अशोक पाटील (५०, पद्मावती कॉलनी, धामणी रस्ता, सांगली) व प्रतापसिंह बाळासाहेब पाटील (२९, वारणाली, विश्रामबाग) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे सुजाता जोशी व निर्मला पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते; पण तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. प्रतापसिंह पाटील यांना शनिवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू केल्यानंतर दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांच्याही रक्ताचे नमुने घेऊन तपासणीला पाठविण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरात स्वाइन संशयित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन रुग्णांच्या तपासणीच्या अहवालात त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे रुग्ण दानोळी (ता. शिरोळ) व वायफळे (ता. तासगाव) येथील होते. सध्या रुग्णालयात स्वाइनची लागण झालेले तीन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी) वर्षभरात १८ बळी गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूचे ६८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ रुग्णांचा बळी गेला आहे. उर्वरित ५० रुग्ण उपचार होऊन बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. महिन्यापासून स्वाइन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडक ऊन असतानाही या आजाराचा झपाट्याने फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.