शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी सौंदर्यापेक्षा शब्दातील गोडवा अधिक महत्त्वाचा : विजयकुमार काळम-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:27 IST

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

ठळक मुद्देशब्दांचा वापर जपून करायला हवा

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

सांगली : गोड बोलणे ही एक कला असून, ती प्रत्येकाला जमेलच असे अजिबात नाही. चांगले बोलणे व गोड बोलणे यात काहीजण पारंगत असतात. आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी विचार केल्यास कोणाच्याही बाह्यरूपापेक्षा त्याचे सकारात्मक विचार व भाषेतील गोडवा अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, नेहमी गोडच बोलले पाहिजे, याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी स्वत: फार गोड बोलत नाही. पण मला कुठे गोड बोलायचे व कुठे तिखट याची जाणीव आहे. प्रशासन बघताना काहीवेळा तिखट बोलायलाच लागते. काही लोक गोड बोलण्यात खूपच पारंगत असतात. जगाच्या पाठीवर असणाऱ्या सहज प्रवृत्तीमध्ये चांगले बोलण्यामुळेच व्यक्तिमत्त्व बनत असते.

बहुतांशवेळा अशक्य कामही गोड बोलण्यामुळेच शक्य होत असते. चेहरा सुंदर नसतानाही अनेक चित्रपट कलाकार, व्यक्ती जनमानसावर अधिराज्य गाजवित असतात. त्यांची सुंदरता बाह्यसौंदर्यात नसते, तर विचारात, गोड बोलण्यात असते. तिखट बोलणे आणि शस्त्रात काहीही फरक नाही. जखमेचा घाव भरून येऊ शकतो; पण माणसाने शब्दाने केलेले वार खोलवर राहतात, दु:ख देतात. मला अनेकजण म्हणतात की, तुम्ही ८० टक्के गोड बोलता आणि २० टक्के तिखट बोलता. याबद्दल एक शेर आवर्जून मी त्यांना सांगतो. ‘मेरे बोलने का अंदाज थोडा तिखा है, लेकीन मैने ये अंदाज मिठी जबान वालोंसेही सिखा है’.

कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आपली भाषा गोडच असायला हवी. कोणताही माणूस दोन गोष्टीमुळे ओळखला जातो. एक त्याची वाणी आणि दुसरे त्याचे कर्म. माणसाचे कर्म बºयाचदा महत्त्वाचे ठरते. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखादी व्यक्ती खूप आत्मियतेने आपले म्हणणे मांडत असते, त्यावेळी त्यास कठोर बोलणे म्हणजे पाप आहे, असे मी समजतो. विविध देशांच्या धर्मग्रंथात गोड वाणीचे वर्णन करण्यात आले आहे. यशस्वी होण्यासाठी गोड शब्द, सकारात्मक प्रवृत्ती, चांगले विचार व समाजाप्रती चांगली भावना आवश्यक आहे, असे मी आवर्जून सांगतो. त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्त्व घडत असते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी