शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी सौंदर्यापेक्षा शब्दातील गोडवा अधिक महत्त्वाचा : विजयकुमार काळम-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:27 IST

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

ठळक मुद्देशब्दांचा वापर जपून करायला हवा

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

सांगली : गोड बोलणे ही एक कला असून, ती प्रत्येकाला जमेलच असे अजिबात नाही. चांगले बोलणे व गोड बोलणे यात काहीजण पारंगत असतात. आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी विचार केल्यास कोणाच्याही बाह्यरूपापेक्षा त्याचे सकारात्मक विचार व भाषेतील गोडवा अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, नेहमी गोडच बोलले पाहिजे, याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी स्वत: फार गोड बोलत नाही. पण मला कुठे गोड बोलायचे व कुठे तिखट याची जाणीव आहे. प्रशासन बघताना काहीवेळा तिखट बोलायलाच लागते. काही लोक गोड बोलण्यात खूपच पारंगत असतात. जगाच्या पाठीवर असणाऱ्या सहज प्रवृत्तीमध्ये चांगले बोलण्यामुळेच व्यक्तिमत्त्व बनत असते.

बहुतांशवेळा अशक्य कामही गोड बोलण्यामुळेच शक्य होत असते. चेहरा सुंदर नसतानाही अनेक चित्रपट कलाकार, व्यक्ती जनमानसावर अधिराज्य गाजवित असतात. त्यांची सुंदरता बाह्यसौंदर्यात नसते, तर विचारात, गोड बोलण्यात असते. तिखट बोलणे आणि शस्त्रात काहीही फरक नाही. जखमेचा घाव भरून येऊ शकतो; पण माणसाने शब्दाने केलेले वार खोलवर राहतात, दु:ख देतात. मला अनेकजण म्हणतात की, तुम्ही ८० टक्के गोड बोलता आणि २० टक्के तिखट बोलता. याबद्दल एक शेर आवर्जून मी त्यांना सांगतो. ‘मेरे बोलने का अंदाज थोडा तिखा है, लेकीन मैने ये अंदाज मिठी जबान वालोंसेही सिखा है’.

कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आपली भाषा गोडच असायला हवी. कोणताही माणूस दोन गोष्टीमुळे ओळखला जातो. एक त्याची वाणी आणि दुसरे त्याचे कर्म. माणसाचे कर्म बºयाचदा महत्त्वाचे ठरते. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखादी व्यक्ती खूप आत्मियतेने आपले म्हणणे मांडत असते, त्यावेळी त्यास कठोर बोलणे म्हणजे पाप आहे, असे मी समजतो. विविध देशांच्या धर्मग्रंथात गोड वाणीचे वर्णन करण्यात आले आहे. यशस्वी होण्यासाठी गोड शब्द, सकारात्मक प्रवृत्ती, चांगले विचार व समाजाप्रती चांगली भावना आवश्यक आहे, असे मी आवर्जून सांगतो. त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्त्व घडत असते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी