शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी सौंदर्यापेक्षा शब्दातील गोडवा अधिक महत्त्वाचा : विजयकुमार काळम-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:27 IST

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

ठळक मुद्देशब्दांचा वापर जपून करायला हवा

हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.

सांगली : गोड बोलणे ही एक कला असून, ती प्रत्येकाला जमेलच असे अजिबात नाही. चांगले बोलणे व गोड बोलणे यात काहीजण पारंगत असतात. आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी विचार केल्यास कोणाच्याही बाह्यरूपापेक्षा त्याचे सकारात्मक विचार व भाषेतील गोडवा अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, नेहमी गोडच बोलले पाहिजे, याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी स्वत: फार गोड बोलत नाही. पण मला कुठे गोड बोलायचे व कुठे तिखट याची जाणीव आहे. प्रशासन बघताना काहीवेळा तिखट बोलायलाच लागते. काही लोक गोड बोलण्यात खूपच पारंगत असतात. जगाच्या पाठीवर असणाऱ्या सहज प्रवृत्तीमध्ये चांगले बोलण्यामुळेच व्यक्तिमत्त्व बनत असते.

बहुतांशवेळा अशक्य कामही गोड बोलण्यामुळेच शक्य होत असते. चेहरा सुंदर नसतानाही अनेक चित्रपट कलाकार, व्यक्ती जनमानसावर अधिराज्य गाजवित असतात. त्यांची सुंदरता बाह्यसौंदर्यात नसते, तर विचारात, गोड बोलण्यात असते. तिखट बोलणे आणि शस्त्रात काहीही फरक नाही. जखमेचा घाव भरून येऊ शकतो; पण माणसाने शब्दाने केलेले वार खोलवर राहतात, दु:ख देतात. मला अनेकजण म्हणतात की, तुम्ही ८० टक्के गोड बोलता आणि २० टक्के तिखट बोलता. याबद्दल एक शेर आवर्जून मी त्यांना सांगतो. ‘मेरे बोलने का अंदाज थोडा तिखा है, लेकीन मैने ये अंदाज मिठी जबान वालोंसेही सिखा है’.

कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आपली भाषा गोडच असायला हवी. कोणताही माणूस दोन गोष्टीमुळे ओळखला जातो. एक त्याची वाणी आणि दुसरे त्याचे कर्म. माणसाचे कर्म बºयाचदा महत्त्वाचे ठरते. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखादी व्यक्ती खूप आत्मियतेने आपले म्हणणे मांडत असते, त्यावेळी त्यास कठोर बोलणे म्हणजे पाप आहे, असे मी समजतो. विविध देशांच्या धर्मग्रंथात गोड वाणीचे वर्णन करण्यात आले आहे. यशस्वी होण्यासाठी गोड शब्द, सकारात्मक प्रवृत्ती, चांगले विचार व समाजाप्रती चांगली भावना आवश्यक आहे, असे मी आवर्जून सांगतो. त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्त्व घडत असते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी