शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पळविला द्राक्षांचा गोडवा : देशांतर्गत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:45 IST

मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून खरेदीकडे पाठ

संजय माने

टाकळी (जि. सांगली) : अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यातून सावरलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी आता कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. द्राक्ष दरात घट होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.द्राक्षशेतीच्या यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा छटणी घेतली, ते आपल्या द्राक्षबागा अवकाळी पावसापासून वाचवू शकले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षशेती वाचविण्याचा प्रयत्न केला. द्राक्ष उत्पादन सर्वत्र कमी झाल्याने, चांगला दर मिळेल अशी शेतकºयांना आशा होती. काही प्रमाणात दर वाढतही होते. मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी १७० ते १८० रुपये चार किलोच्या द्राक्षपेटीचा दर होता. मात्र तो आता १२० ते १४० पर्यंत आला आहे. हा दर द्राक्ष उत्पादकांना परवडत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा बनवण्याकडे वळत आहे. आता महाराष्ट्र व कर्नाटकातील बाजारपेठाही बंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात आले आहेत. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांचा गोडवाही संपणार की काय, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.व्यापार ठप्पमिरज पूर्व भागातून दररोज १०० गाड्या द्राक्षे कर्नाटक, महाराष्ट्र, बेंगलोरसह इतर ठिकाणी पाठविण्यात येत होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. केवळ २० ते २५ गाड्या गेल्या दोन दिवसांपासून पाठविण्यात येत आहते. मात्र त्याही आता बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम द्राक्ष खरेदीवर होणार असल्याचे द्राक्ष व्यापारी युवराज सावंत यांनी सांगितले.बेदाणा करणारकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठा बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे द्राक्षांना मागणीही घटणार आहे. द्राक्ष खरेदीकडे व्यापाºयांनीही पाठ फिरवली आहे. पंधरा दिवसात द्राक्षांची बाजारपेठ पूर्ण ठप्प होणार आहे. त्यामुळे द्राक्षापासून बेदाणा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी विशाल पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस