शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

कोरोनाने पळविला द्राक्षांचा गोडवा : देशांतर्गत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:45 IST

मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून खरेदीकडे पाठ

संजय माने

टाकळी (जि. सांगली) : अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यातून सावरलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी आता कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. द्राक्ष दरात घट होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.द्राक्षशेतीच्या यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा छटणी घेतली, ते आपल्या द्राक्षबागा अवकाळी पावसापासून वाचवू शकले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षशेती वाचविण्याचा प्रयत्न केला. द्राक्ष उत्पादन सर्वत्र कमी झाल्याने, चांगला दर मिळेल अशी शेतकºयांना आशा होती. काही प्रमाणात दर वाढतही होते. मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी १७० ते १८० रुपये चार किलोच्या द्राक्षपेटीचा दर होता. मात्र तो आता १२० ते १४० पर्यंत आला आहे. हा दर द्राक्ष उत्पादकांना परवडत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा बनवण्याकडे वळत आहे. आता महाराष्ट्र व कर्नाटकातील बाजारपेठाही बंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात आले आहेत. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांचा गोडवाही संपणार की काय, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.व्यापार ठप्पमिरज पूर्व भागातून दररोज १०० गाड्या द्राक्षे कर्नाटक, महाराष्ट्र, बेंगलोरसह इतर ठिकाणी पाठविण्यात येत होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. केवळ २० ते २५ गाड्या गेल्या दोन दिवसांपासून पाठविण्यात येत आहते. मात्र त्याही आता बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम द्राक्ष खरेदीवर होणार असल्याचे द्राक्ष व्यापारी युवराज सावंत यांनी सांगितले.बेदाणा करणारकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठा बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे द्राक्षांना मागणीही घटणार आहे. द्राक्ष खरेदीकडे व्यापाºयांनीही पाठ फिरवली आहे. पंधरा दिवसात द्राक्षांची बाजारपेठ पूर्ण ठप्प होणार आहे. त्यामुळे द्राक्षापासून बेदाणा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी विशाल पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस