शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोरोनाने पळविला द्राक्षांचा गोडवा : देशांतर्गत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:45 IST

मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून खरेदीकडे पाठ

संजय माने

टाकळी (जि. सांगली) : अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यातून सावरलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी आता कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. द्राक्ष दरात घट होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.द्राक्षशेतीच्या यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा छटणी घेतली, ते आपल्या द्राक्षबागा अवकाळी पावसापासून वाचवू शकले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षशेती वाचविण्याचा प्रयत्न केला. द्राक्ष उत्पादन सर्वत्र कमी झाल्याने, चांगला दर मिळेल अशी शेतकºयांना आशा होती. काही प्रमाणात दर वाढतही होते. मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी १७० ते १८० रुपये चार किलोच्या द्राक्षपेटीचा दर होता. मात्र तो आता १२० ते १४० पर्यंत आला आहे. हा दर द्राक्ष उत्पादकांना परवडत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा बनवण्याकडे वळत आहे. आता महाराष्ट्र व कर्नाटकातील बाजारपेठाही बंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात आले आहेत. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांचा गोडवाही संपणार की काय, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.व्यापार ठप्पमिरज पूर्व भागातून दररोज १०० गाड्या द्राक्षे कर्नाटक, महाराष्ट्र, बेंगलोरसह इतर ठिकाणी पाठविण्यात येत होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. केवळ २० ते २५ गाड्या गेल्या दोन दिवसांपासून पाठविण्यात येत आहते. मात्र त्याही आता बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम द्राक्ष खरेदीवर होणार असल्याचे द्राक्ष व्यापारी युवराज सावंत यांनी सांगितले.बेदाणा करणारकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठा बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे द्राक्षांना मागणीही घटणार आहे. द्राक्ष खरेदीकडे व्यापाºयांनीही पाठ फिरवली आहे. पंधरा दिवसात द्राक्षांची बाजारपेठ पूर्ण ठप्प होणार आहे. त्यामुळे द्राक्षापासून बेदाणा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी विशाल पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस