शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चा चड्डी मोर्चा

By अशोक डोंबाळे | Updated: June 8, 2023 18:34 IST

२० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सांगली: द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर गुरुवारी चड्डी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी संचारबंदी असल्याचे सांगून मोर्चा रोखला. त्यानंतर आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत तळपत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन २० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सांगलीच्या विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढू नये, अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिली. त्यानुसार आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. चड्डी आणि बनियनवर शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले होते.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलकांना २० जूनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच लेखी पत्र पालकमंत्री खाडे यांचे प्रतिनिधी मोहन व्हनखंडे यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्याकडे दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात संजय खोलखुंबे, भरत चौगुले, उमेश मुळे, संजय बेले, राजेंद्र माने, रावसाहेब पाटील, सूरज पाटील,  सुरेश वासगडे, राजेंद्र पाटील, श्रीधर उदगावे, सुरेश घागरे, अनिल वाघ, नागेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, नागेश खामकर, रोहित वारे, जगन्नाथ भोसले, भरत पाटील, विनायक पवार, शांतीनाथ लिंबेकाई आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते. पोलिसांकडून बळाचा वापर - महेश खराडेमहेश खराडे म्हणाले, जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर सुरू आहे. पोलिसांनी पालक मंत्र्याच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारून संचारबंदीचा आदेश लागू केला. कितीही दहशतीचा वापर केला, तरी द्राक्ष व बेदाणा उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. द्राक्ष उत्पादकाला एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना प्रतिटन एक लाख अनुदान मिळालेच पाहिजे. पालकमंत्री खाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार, असे आश्वासन दिले आहे. २० जूनपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना