शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या व्यवहाराने संशयकल्लोळ जिल्हा बँक : लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:04 IST

वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय कारभार?; करारपत्रात बदल होण्याची शक्यता

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे करारपत्रात काही बदल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. जिल्हा बँकेने वसंतदादा कारखाना सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत दत्त कंपनीला भाड्याने दिला आहे.

यासंदर्भातील वर्षभरापूर्वी झालेला भाडेकरार आता पुन्हा चर्चेत आला आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लेखापरीक्षकांच्या अहवालाचा दाखला देत संचालक विक्रम सावंत यांनी ३० कोटी रुपयांच्या झालेल्या व्यवहारावर बोट ठेवले आहे. प्रशासकांचा कालावधी संपुष्टात येऊन नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर गेल्या काही वर्षात एकाही व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला नव्हता. सुरक्षा अनामत रकमेतील ३० कोटी वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया कंपनीस वापरण्यास देण्याची कृती बेकायदेशीरच असल्याचे मत लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद आहे. दुसरीकडे आता ही कृती कायदेशीरच असल्याचा दावा बँकेकडून केला जाऊ शकतो. बँकिंग क्षेत्रात नेहमीच लेखापरीक्षकांच्या शेऱ्याला सर्वात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्या मताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

लेखापरीक्षकांचा इशारा गांभीर्याने घेऊन काही सुधारणा जिल्हा बँकेला करता आल्या, तर कदाचित अडचणी दूर होऊ शकतात. तरीही बँक प्रशासन, संचालक मंडळ नेमका निर्णय काय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण राज्यात सांगली जिल्हा बँक सध्या आघाडीवर आहे. नफा आणि व्यवहाराच्या पातळीवर या बँकेची प्रतिष्ठा वाढली आहे. अशा परिस्थितीत या प्रतिष्ठेला एखाद्या व्यवहाराने धक्का बसत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. सांगली जिल्हा बँकेची आर्थिक सक्षमता आणखी वाढावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानीबाबतचे शेरे गांभीर्याने घ्यावे लागतील.

वसंतदादा कारखान्याचा भाडेतत्त्वावरील व्यवहारही राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. सर्वाधिक फायद्याची निविदा म्हणून याकडे पाहिले गेले आहे. त्यामुळे या व्यवहारालाही धक्का बसू नये म्हणून काही दुरुस्त्या आता बँकेला कराव्या लागणार आहेत. सध्या दत्त इंडिया कंपनीमार्फत वसंतदादा कारखानाही व्यवस्थित चालू आहे. अशा परिस्थितीत एखाद्या चुकीमुळे सर्व गोष्टींना बाधा पोहोचू शकते. सुरक्षा अनामत व्यवहारातून फायदा झाला असेल, तर तशा बाबी सर्वांसमोर मांडायला हव्यात, अन्यथा हा संशयकल्लोळ वाढण्याची दाट शक्यता आहे.असा झाला व्यवहार...वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याने ९३ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्च २०१७ मध्ये वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली होती. १८ मे २०१७ रोजी दत्त इंडियाने दहा वर्षे मुदत आणि प्रतिटन गाळपासाठी २६१ रुपये दराची निविदा सादर केल्याने व त्यांची सर्वाधिक दराची निविदा ठरल्याने कारखाना त्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५ जुलै २०१७ रोजी याबाबतचा निर्णय झाला. निविदेतील अटीप्रमाणे ६० कोटी रुपये सुरक्षा अनामत जिल्हा बँकेकडे जमा केल्यानंतरच अंतिम करार झाला.संचालक मंडळ सतर्कबँकेतील कोणत्याही चुकीच्या व्यवहाराचे खापर आपल्यावर फोडले जाऊ नये, म्हणून अनेक संचालक सतर्क झाले आहेत. यापूर्वीच्या बºयाच संचालकांना अशा प्रकरणांचा त्रास झाला होता. त्यामुळे वेळीच दुरुस्ती होऊन बँकेच्या नुकसानीचा शेरा फायद्यात परावर्तित करण्यासाठी काहीजण युध्दपातळीवर प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :bankबँकPoliticsराजकारणSangliसांगली